शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

मेडिकलचे प्रवेशद्वार पाण्यात

By admin | Updated: June 22, 2015 02:50 IST

प्रवेशद्वारासमोरच पावसाचे पाणी साचल्याने रुग्णांना पाण्यातून वाट काढावी लागते. गेल्या दोन दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे येथे गुडघाभर पाणी साचून आहे.

आकस्मिक विभाग : उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना पाण्यातून काढावी लागते वाट नागपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचा (मेडिकल) बाह्यरुग्ण विभाग बंद झाल्यानंतर येणाऱ्या गंभीर आजाराच्या रुग्णांना एकाच ठिकाणी अद्ययावत सर्व उपचार मिळावे म्हणून दोन वर्षांपूर्वी तब्बल दोन कोटी रुपये खर्च करून आकस्मिक वैद्यकीय सेवा विभाग उभा केला. परंतु उद्घाटन होत नाही तोच नियोजनाअभावी हा विभाग अनेक समस्यांच्या विळख्यात सापडला आहे. विशेषत: प्रवेशद्वारासमोरच पावसाचे पाणी साचल्याने रुग्णांना पाण्यातून वाट काढावी लागते. गेल्या दोन दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे येथे गुडघाभर पाणी साचून आहे.मेडिकलमध्ये वाढलेली रुग्णसंख्या, अपुरी जागा व विविध चाचण्यांकरिता या विभागातून दुसऱ्या विभागात रुग्णांची होणारी धावपळ, यामुळे उपचार मिळण्यास होणारा उशीर यावर उपाय म्हणून २०११ मध्ये नव्या आकस्मिक वैद्यकीय सेवा विभागाचे बांधकाम हाती घेण्यात आले. हा विभाग तीन मजल्यांचा होणार होता. यातील तळमजल्यावर स्वागत कक्ष, नोंदणी कक्ष, मुख्य अपघात वैद्यकीय अधिकारी यांचे कक्ष, समन्वय कक्ष, २० खाटांची सोय, अतिदक्षता विभाग, शस्त्रक्रिया कक्ष, एक्स-रे कक्ष, प्रसुती विभाग, डॉक्टरांची खोली, डार्क रुम व परिचारिकांची खोली असणार होती. परंतु दोन कोटी रुपये खर्च करून हा विभाग केवळ तळमजल्यापुरताच मर्यादित राहिला. यातही अनेक विभाग आजही कुलूपात बंद आहेत. जुन्या आकस्मिक कक्षापेक्षा या कक्षात रुग्णांवर उपचार करणे दिवसेंदिवस कठीण जात होते. पुरुषोत्तम कडव या रुग्णांवरील उपचारात हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवत त्यांच्या नातेवाईकांनी तोडफोड केली होती. त्यानंतरही या विभागात आवश्यक सुधारणा झाल्या नाहीत. डॉ. अभिमन्यू निसवाडे यांनी अधिष्ठात्यांची जबाबदारी स्वीकारताच सहा महिन्यातच त्यांनी ‘सर्जरी’चा आकस्मिक विभाग वेगळा करून तो जुन्या आकस्मिक विभागात सुरू केला. यामुळे नव्या आकस्मिक विभागावरील भार कमी झाला. कामकाजात सुरळीतपणा आला. परंतु बांधकाम विभागाच्या चुकांचा फटका आजही रुग्णांना बसत आहे. नव्या कॅज्युल्टीच्या प्रवेशद्वारासमोरील परिसर उंच केल्याने आणि पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी नाल्या काढण्यात न आल्याने प्रवेशद्वाराजवळच पावसाचे पाणी साचून राहते. मुसळधार पावसामुळे येथे गुडघाभर पाणी साचले आहे.(प्रतिनिधी)