शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

माध्यमांवर अंकुशासाठी हवा माध्यमग्रस्तांचा दबावगट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2018 00:57 IST

आधुनिक काळात माध्यमांनी कळस गाठला आहे. काय दाखवावे, काय दाखवू नये, याची आचारसंहिता नाही. बातमी मूल्य धाब्यावर बसवून पत्रकारिता सुरू आहे. स्वातंत्र्याचा स्वैराचार झाला आहे. हे थांबविण्यासाठी या माध्यमांमुळे ग्रस्त झालेल्या माध्यमग्रस्तांचा दबावगट तयार होऊन तो कृतिशील व्हायला हवा, असे प्रतिपादन प्रसिद्ध कवी तथा पत्रकार सुनील शिनखेडे यांनी आज येथे केले.

ठळक मुद्देसुनील शिनखेडे यांचे प्रतिपादन : ‘माध्यमांचे जग व माध्यमग्रस्तांचे जग’ यावर व्याख्यान

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : आधुनिक काळात माध्यमांनी कळस गाठला आहे. काय दाखवावे, काय दाखवू नये, याची आचारसंहिता नाही. बातमी मूल्य धाब्यावर बसवून पत्रकारिता सुरू आहे. स्वातंत्र्याचा स्वैराचार झाला आहे. हे थांबविण्यासाठी या माध्यमांमुळे ग्रस्त झालेल्या माध्यमग्रस्तांचा दबावगट तयार होऊन तो कृतिशील व्हायला हवा, असे प्रतिपादन प्रसिद्ध कवी तथा पत्रकार सुनील शिनखेडे यांनी आज येथे केले.विदर्भ साहित्य संघाच्यावतीने विदर्भ साहित्य संघाच्या सांस्कृतिक संकुलात आयोजित गणेश व्याख्यानमालेत ‘माध्यमांचे जग व माध्यमग्रस्तांचे जग’ या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी विदर्भ साहित्य संघाचे कार्याध्यक्ष वामन तेलंग होते. शिनखेडे म्हणाले, माध्यमांचा रंजक प्रवास खूप काही शिकविणारा आहे. टीव्ही आल्यावर अनेक चांगले कार्यक्रम दाखविले जात. तेव्हाच्या मालिकांनी सांस्कृतिक, भावनिकदृष्ट्या देश जोडला. परंतु नंतर हे माध्यम बाजारपेठांनी काबीज केले. तेव्हापासून ते आज श्रीदेवीच्या मृत्यूपर्यंत माध्यम प्रगल्भ झाले का? हा प्रश्न आहे. टीव्ही, मोबाईल, व्हॉट्सअ‍ॅप अशा सर्वच माध्यमावर हा मॅसेज ११ जणांना पाठवा हा प्रकार घडला. हे माध्यमांना टाळता आले असते. इंग्लंडसह इतरही देशात हे घडले. परंतु तेथील माध्यमांच्या स्वातंत्र्याला मर्यादा आहेत. आपल्याकडे स्वातंत्र्याचा स्वैराचार झाला आहे. माध्यमांचे विविध उत्पादनात शेअर्स असल्यामुळे जाहिरातींचा भडीमार होऊन चांगले कार्यक्रम देणे ही बाब दुय्यम ठरते. राज्यकर्त्यांच्या हातात माध्यमे असल्यामुळे माध्यमे कशी हाताळावी, हे त्यांना कोण शिकविणार? माध्यमे जे दाखवितात त्याची उपयुक्तता आहे का, याचा विचार होत नाही. आरुषी खून प्रकरणात समाजातन्यायालयासारखी यंत्रणा आहे, याचाही विसर माध्यमांना पडला. प्रेक्षक मालिका, बातम्यांशी समरस होतात, याची पर्वा माध्यमांना नाही. मालिकेतही पुढे काय होणार हे लेखक नाही तर माध्यम ज्यांच्या हाती आहे ते ठरवितात. आज आपल्यावर राज्यकर्ते नाही तर माध्यमं राज्य करीत आहेत. माध्यमांशी समरस होऊन अनेक मानसिक रुग्ण तयार झाले आहेत. हे सामाजिक स्वास्थ्यासाठी धोक्याचे आहे. मराठी चॅनलमध्ये हिंदी अँकर काम करीत असल्याने मराठीचे विद्रुपीकरण होत आहे. याला विरोध करण्यासाठी आणि सांस्कृतिक वारसा जोपासण्यासाठी माध्यमांनी ग्रस्त झालेल्यांचा दबावगट तयार होणे गरजेचे असल्याचे शिनखेडे यांनी सांगितले. संचालन प्रकाश एदलाबादकर यांनी केले. व्याख्यानाला नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते..............

टॅग्स :Mediaमाध्यमेnagpurनागपूर