शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा नवा निर्णय; भारतीयांसाठी 'अमेरिकन ड्रीम' महागणार! Visa साठी भरावे लागणार ₹८८ लाख
2
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
3
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शाह यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
4
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
5
२२ दिवसांपासून बेपत्ता, शोधूनही सापडेना! नेमकी कुठे गेली साक्षी? आईने केले गंभीर आरोप
6
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
7
असा पैसा काय कामाचा? "मी कामावर जाण्यापूर्वी रोज रडते"; ४० लाख पगार, पण समाधान नाही
8
Asia Cup: संजू सॅमसनची धमाकेदार फटकेबाजी! एका खेळीने धोनीला टाकलं मागे, केला मोठा विक्रम
9
भारताविरुद्ध युद्ध झाल्यास 'हा' देश देणार पाकिस्तानला साथ? संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले...
10
प्रिया मराठेच्या निधनानंतर पती शंतनू मोघेची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, "मधल्या काळात..."
11
भारत, चीन की...., कंडोमच्या वापरात कुठला देश आहे नंबर १, कुठल्या देशात आहे अधिक मागणी?
12
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
13
ओबीसींच्या विकासासाठी योगी सरकारचा मजबूत 'प्लॅन', उचललं क्रांतिकारी पाऊल
14
ठाण्यातील अवजड वाहन बंदीचा ताप! मुंबई अहमदाबाद महामार्गावर देखील अवजड वाहनांना बंदी
15
Navratri Astro 2025: नवरात्रीत 'या' राशींवर होणार अंबाबाईची कृपा, धन-समृद्धी, आनंदाला नसेल तोटा
16
उधमपूरमध्ये काय घडलं? दहशतवाद्यांशी लढताना एक जवान शहीद, सुरक्षा दलांची मोठी कारवाई
17
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
18
बिग बजेट सिनेमांमधून दाखवला बाहेरचा रस्ता, दीपिका पादुकोणने सोडलं मौन; पोस्ट करत म्हणाली...
19
जीएसटीतील बदलानंतर स्कूटर आणि बाईकच्या किंमती १८ हजारांपर्यंत झाल्या कमी!
20
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत

अर्थ अवर दिन; साैर ऊर्जा वापरात भारत ५ व्या स्थानी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 07:41 IST

Nagpur news अपारंपरिक ऊर्जा स्त्राेतामधील प्रमुख स्त्राेत असलेल्या साैर ऊर्जेचा वापर भारतात वाढला आहे. देशात २०१४ मध्ये २.६३ गिगावॅट साैर ऊर्जा निर्मिती हाेत हाेती, जी वाढून आज ३६ गिगावॅटवर पाेहचली आहे. साैर ऊर्जेच्या वापरात भारत जगात पाचव्या स्थानी पाेहोचला आहे.

ठळक मुद्देउत्पादन २.६३वरून ३६ गिगावॅटवर पाेहोचलेक्लायमेट चेंज इंडेक्समध्येही पहिल्या १०मध्ये

निशांत वानखेडे

लोकमत न्यूज नेटवर्क 

नागपूर : संपूर्ण जगात ऊर्जेचा वापरात आणि मागणीत मागील ५० वर्षांत १०० पटीपेक्षा अधिक प्रमाणात वाढ झाल्याचे सांगण्यात येत आहे. यामध्ये पारंपरिक ऊर्जा स्त्राेतापासून निर्मित ऊर्जेचे प्रमाण आजही ८० टक्के (वीज) आहे. मात्र आता समाधानकारक माहिती ऊर्जा विभागाकडून मिळत आहे. अपारंपरिक ऊर्जा स्त्राेतामधील प्रमुख स्त्राेत असलेल्या साैर ऊर्जेचा वापर भारतात वाढला आहे. देशात २०१४ मध्ये २.६३ गिगावॅट साैर ऊर्जा निर्मिती हाेत हाेती, जी वाढून आज ३६ गिगावॅटवर पाेहचली आहे. साैर ऊर्जेच्या वापरात भारत जगात पाचव्या स्थानी पाेहोचला आहे.

भारताने २०१६ मध्ये पॅरिस ॲग्रीमेंटवर हस्ताक्षर केले हाेते. त्याचा मुख्य उद्देश जगात हाेणारे जल वायू परिवर्तन राेखणे हा आहे. त्याची समाधानकारक अंमलबजावणी भारताकडून हाेत असून गेल्या सहा वर्षात भारताची साैर ऊर्जेची क्षमता १३ टक्क्यांनी वाढली आहे. दुसरीकडे पवन ऊर्जेतही भारत अग्रेसर हाेत असून, पवन ऊर्जा वापरामध्ये भारत जगात चाैथ्या स्थानी पाेहोचला आहे. उल्लेखनीय म्हणजे क्लायमेट चेंज इंडेक्समध्ये भारत जगातील पहिल्या दहा देशांमध्ये शामील झाला आहे.

अर्थ अवर म्हणजे काय

ऊर्जेचा प्रचंड वापर आणि हाेणारे जलवायू परिवर्तन राेखण्याचे पाऊल म्हणून २००४ पासून अर्थ अवर साजरा केला जाताे. दरवर्षी मार्च महिन्याच्या शेवटच्या शनिवारी हा दिवस साजरा हाेताे. भारतातही काही ठिकाणी ताे साजरा केला जाताे. त्यानुसार मार्चच्या शेवटच्या शनिवारी रात्री एक तास विद्युत बंद केली जाते. नागपुरातही गेली काही वर्षे रात्री ८ ते ९ वाजताच्या दरम्यान वीज बंद करून दिवस साजरा केला जात आहे. मात्र गेल्या वर्षीपासून काेराेना प्रकाेपामुळे यामध्ये खंड पडला आहे.

नागपुरात २०१४ पासून तत्कालीन महापाैर अनिल साेले यांच्या पुढाकाराने हा दिवस साजरा केला जात आहे. पहिल्या वर्षी पाैर्णिमेच्या दिवशी ताे साजरा करण्यात आला. यानुसार नागपूर महापालिका व ग्रीन व्हिजील फाउंडेशनद्वारे रात्री ८ ते ९ वाजतादरम्यान अनावश्यक वीज उपकरण बंद ठेवण्याचे आवाहन नागरिकांना केले जाते. या अभियानामुळे २,५०००० किलाे कार्बनचे उत्सर्जन थांबविण्यात यश आले आहे.

- काैस्तुभ चटर्जी, संस्थापक, ग्रीन व्हिजील.

टॅग्स :Earthपृथ्वी