शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
2
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
3
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
4
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
5
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
6
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
7
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
8
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
9
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
10
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
11
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
12
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
13
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
14
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
15
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
16
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
17
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
18
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
19
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
20
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!

अर्थ अवर दिन; साैर ऊर्जा वापरात भारत ५ व्या स्थानी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 07:41 IST

Nagpur news अपारंपरिक ऊर्जा स्त्राेतामधील प्रमुख स्त्राेत असलेल्या साैर ऊर्जेचा वापर भारतात वाढला आहे. देशात २०१४ मध्ये २.६३ गिगावॅट साैर ऊर्जा निर्मिती हाेत हाेती, जी वाढून आज ३६ गिगावॅटवर पाेहचली आहे. साैर ऊर्जेच्या वापरात भारत जगात पाचव्या स्थानी पाेहोचला आहे.

ठळक मुद्देउत्पादन २.६३वरून ३६ गिगावॅटवर पाेहोचलेक्लायमेट चेंज इंडेक्समध्येही पहिल्या १०मध्ये

निशांत वानखेडे

लोकमत न्यूज नेटवर्क 

नागपूर : संपूर्ण जगात ऊर्जेचा वापरात आणि मागणीत मागील ५० वर्षांत १०० पटीपेक्षा अधिक प्रमाणात वाढ झाल्याचे सांगण्यात येत आहे. यामध्ये पारंपरिक ऊर्जा स्त्राेतापासून निर्मित ऊर्जेचे प्रमाण आजही ८० टक्के (वीज) आहे. मात्र आता समाधानकारक माहिती ऊर्जा विभागाकडून मिळत आहे. अपारंपरिक ऊर्जा स्त्राेतामधील प्रमुख स्त्राेत असलेल्या साैर ऊर्जेचा वापर भारतात वाढला आहे. देशात २०१४ मध्ये २.६३ गिगावॅट साैर ऊर्जा निर्मिती हाेत हाेती, जी वाढून आज ३६ गिगावॅटवर पाेहचली आहे. साैर ऊर्जेच्या वापरात भारत जगात पाचव्या स्थानी पाेहोचला आहे.

भारताने २०१६ मध्ये पॅरिस ॲग्रीमेंटवर हस्ताक्षर केले हाेते. त्याचा मुख्य उद्देश जगात हाेणारे जल वायू परिवर्तन राेखणे हा आहे. त्याची समाधानकारक अंमलबजावणी भारताकडून हाेत असून गेल्या सहा वर्षात भारताची साैर ऊर्जेची क्षमता १३ टक्क्यांनी वाढली आहे. दुसरीकडे पवन ऊर्जेतही भारत अग्रेसर हाेत असून, पवन ऊर्जा वापरामध्ये भारत जगात चाैथ्या स्थानी पाेहोचला आहे. उल्लेखनीय म्हणजे क्लायमेट चेंज इंडेक्समध्ये भारत जगातील पहिल्या दहा देशांमध्ये शामील झाला आहे.

अर्थ अवर म्हणजे काय

ऊर्जेचा प्रचंड वापर आणि हाेणारे जलवायू परिवर्तन राेखण्याचे पाऊल म्हणून २००४ पासून अर्थ अवर साजरा केला जाताे. दरवर्षी मार्च महिन्याच्या शेवटच्या शनिवारी हा दिवस साजरा हाेताे. भारतातही काही ठिकाणी ताे साजरा केला जाताे. त्यानुसार मार्चच्या शेवटच्या शनिवारी रात्री एक तास विद्युत बंद केली जाते. नागपुरातही गेली काही वर्षे रात्री ८ ते ९ वाजताच्या दरम्यान वीज बंद करून दिवस साजरा केला जात आहे. मात्र गेल्या वर्षीपासून काेराेना प्रकाेपामुळे यामध्ये खंड पडला आहे.

नागपुरात २०१४ पासून तत्कालीन महापाैर अनिल साेले यांच्या पुढाकाराने हा दिवस साजरा केला जात आहे. पहिल्या वर्षी पाैर्णिमेच्या दिवशी ताे साजरा करण्यात आला. यानुसार नागपूर महापालिका व ग्रीन व्हिजील फाउंडेशनद्वारे रात्री ८ ते ९ वाजतादरम्यान अनावश्यक वीज उपकरण बंद ठेवण्याचे आवाहन नागरिकांना केले जाते. या अभियानामुळे २,५०००० किलाे कार्बनचे उत्सर्जन थांबविण्यात यश आले आहे.

- काैस्तुभ चटर्जी, संस्थापक, ग्रीन व्हिजील.

टॅग्स :Earthपृथ्वी