शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

अवयवदानात मेयो इस्पितळाचीही पडणार भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2018 22:40 IST

अवयव दात्यांच्या प्रतीक्षेत असलेल्या रुग्णांसाठी दिलासा देणारी बातमी आहे. इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाला (मेयो) ‘नॉन ट्रान्सप्लांट आॅर्गन रिट्रायेवल सेंटर’ (एनटीओआरसी) म्हणजे मेंदूमृत दात्याकडून अवयव काढण्याच्या प्रक्रियेला आरोग्य विभागाने अखेर बुधवारी मंजुरी दिली आहे. या सेंटरसाठी रुग्णालयाच्या न्यायवैद्यकशास्त्र विभागाने घेतलेल्या पुढाकाराचे कौतुक होत आहे.

ठळक मुद्देआॅर्गन रिट्रायव्हल सेंटरला मिळाली मंजुरी : न्यायवैद्यकशास्त्र विभागाचा पुढाकार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अवयव दात्यांच्या प्रतीक्षेत असलेल्या रुग्णांसाठी दिलासा देणारी बातमी आहे. इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाला (मेयो) ‘नॉन ट्रान्सप्लांट आॅर्गन रिट्रायेवल सेंटर’ (एनटीओआरसी) म्हणजे मेंदूमृत दात्याकडून अवयव काढण्याच्या प्रक्रियेला आरोग्य विभागाने अखेर बुधवारी मंजुरी दिली आहे. या सेंटरसाठी रुग्णालयाच्या न्यायवैद्यकशास्त्र विभागाने घेतलेल्या पुढाकाराचे कौतुक होत आहे.आज भारतात हजारो लोक अवयव दानासाठी दात्यांच्या प्रतीक्षेत आयुष्याचे अखेरचे क्षण मोजत आहेत. देशभरात सुमारे पाच लाख रुग्ण मूत्रपिंड, ५० हजार रुग्ण यकृत आणि दोन हजाराहून अधिक रुग्ण विविध अवयवांच्या प्रतीक्षेत आहेत. यामुळे शासनाकडून अवयवदान चळवळीची व्यापक जनजागृती व चोख व्यवस्थापन होणे महत्त्वाचे झाले आहे. अवयवदानाचे महत्त्व ओळखत मेयोच्या न्यायवैद्यकशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. मकरंद व्यवहारे यांनी पुढाकार घेत ‘एनटीओआरसी’चा प्रस्ताव सार्वजनिक आरोग्य विभागाकडे पाठविला होता. या प्रस्तावाला घेऊन आरोग्य विभागाच्या चमूने गेल्याच आठवड्यात रुग्णालयाची पाहणी करून १४ मार्च रोजी मंजुरी दिली. काय आहे ‘एनटीओआरसी’अपघातात डोक्याला मार लागल्याने, मेंदूत रक्तस्राव झाल्याने किंवा मेंदूला कायमस्वरूपी इजा झाल्याने त्या व्यक्तीचा मेंदू मृत (ब्रेन डेड) होऊ शकतो. अशावेळी कृत्रिम श्वासोच्छवास प्रणालीवर (व्हेंटिलेटर) त्या व्यक्तीला ठेवून इतर अवयवांचे कार्य सुरू ठेवले जाते. एखादा रुग्ण ‘ब्रेन डेड’ घोषित झाल्यानंतर, त्याचे अवयव इतर रुग्णांमध्ये प्रत्यारोपीत करण्यासाठी अवयव काढण्याच्या मंजुरीप्राप्त विभागाला ‘नॉन ट्रान्सप्लांट आॅर्गन रिट्रायेवल सेंटर’ म्हटले जाते.रस्ता अपघातात वर्षाला ५०० वर ब्रेनडेड रुग्णडॉ. व्यवहारे म्हणाले, मेयोमध्ये वर्षाला सुमारे १८०० शवविच्छेदन होतात. यात रस्ता अपघातात गंभीर जखमी झालेले ९०० रुग्ण असतात. यातील साधारण ५०० वर रुग्ण ‘ब्रेन डेड’ असतात. ‘ब्रेन डेड’ घोषित करण्यासाठी तज्ज्ञाची समिती असते. त्यांच्या मंजुरीनंतर व रुग्णाच्या नातेवाईकांनी अवयवदानाला परवानगी दिल्यावरच अवयव काढण्याची प्रक्रिया सुरू होते.एक मेंदूमृत व्यक्ती १० रुग्णांंना जीवनदान देऊ शकतेमेंदूमृत दात्याला हृदय, हृदयाच्या झडपा, फुफ्फुस, मूत्रपिंड, त्वचा, डोळे, यकृत, स्वादूपिंड, आतडी, कानाचे ड्रम आदी अवयव दान करता येतात. यामुळे एक मेंदूमृत व्यक्ती साधारण १० रुग्णांना जीवनदान देऊ शकतो. यामुळे मेयोतील ‘एनटीओआरसी’चे महत्त्व वाढणार आहे.-डॉ. मकरंद व्यवहारेविभाग प्रमुख, न्यायवैद्यकशास्त्र विभाग

टॅग्स :nagpurनागपूरOrgan donationअवयव दान