शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

नागपूरच्या मेयो रुग्णालयाला मिळालेल्या ३५ कोटींवर संक्रांत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2019 13:20 IST

श्री वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला (मेडिकल) श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था, शिर्डीमार्फत ‘एमआरआय’ खरेदी करण्यासाठी १३ कोटी दिले होते. परंतु हे यंत्र खरेदी न झाल्याने संस्थानने हा निधी जमा करण्याचे पत्र अधिष्ठात्यांना दिले आहे.

ठळक मुद्देएमआरआय, सिटीस्कॅन रखडणार ? श्री साईबाबा संस्थानने दिलेला निधी मागितला परत

सुमेध वाघमारे ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : श्री वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला (मेडिकल) सामाजिक जबाबदारी म्हणून श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था, शिर्डीमार्फत ‘एमआरआय’ खरेदी करण्यासाठी १३ कोटी दिले होते. परंतु हे यंत्र खरेदी न झाल्याने संस्थानने हा निधी जमा करण्याचे पत्र अधिष्ठात्यांना दिले आहे. विशेष म्हणजे, याच संस्थानने नागपूरच्या इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाला (मेयो) एमआरआयसह सिटीस्कॅन व डीएसए खरेदी करण्यासाठी ३५ कोटी २८ लाख रुपये दिले. परंतु सात महिन्यावर कालावधी होऊनही यंत्रसामुग्री खरेदी झाली नाही. यामुळे हा निधीही परत मागण्याची शक्यता वर्तविली जात आहे.मेयो प्रशासनाचे सलग पाच वर्षांपासून एमआरआय व सिटी स्कॅन खरेदी करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. नोव्हेंबर २०१६ रोजी एमआरआय व सिटीस्कॅन खरेदी करण्यासाठी १८ कोटींना प्रशासकीय मंजुरी मिळाली. २०१६ च्या हिवाळी अधिवेशनात या यंत्राला घेऊन चर्चाही झाली, परंतु आर्थिक तरतूद झाली नाही. यामुळे हे दोन्ही यंत्र कागदावरच राहिली. २०१७ मध्ये मेडिकल कौन्सिल आॅफ इंडियाने (एमसीआय) केलेल्या निरीक्षणात निकषाप्रमाणे एमआरआय व ‘१६ स्लाईस सिटीस्कॅन’ नसल्याची त्रुटी काढली. पदवी व पदव्युत्तर जागा धोक्यात आल्या. यासंदर्भातील पत्रही मेयोला प्राप्त झाले. याची गंभीर दखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतली. त्यांच्याच पुढाकारांमुळे श्री साईबाबा संस्थानने ३५ कोटी २८ लाख रुपयांचा निधी मे २०१८ ला दिला. मेयो प्रशासनाने हा निधी उपकरण खरेदीचे अधिकार असलेल्या ‘हाफकिन महामंडळा’कडे वळता केला.सुरुवातीला काही महिने या निधीतून यंत्रसामुग्री खरेदीला मंजुरीच मिळाली नव्हती. याचे सविस्तर वृत्त ‘लोकमत’ने १७ जूनच्या अंकात ‘३५ कोटी मिळूनही खरेदीच्या मंजुरीला ना’ या मथळ्याखाली प्रसिद्ध केले. याच दरम्यान संस्थानने निधी देऊनही ‘एमआरआय’ स्थापन करण्यात आले नसल्याबाबत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने राज्य सरकारला फटकारले. ‘एमआरआय’ यंत्र कुठे स्थापन करावे, याबाबतही गोंधळ उडाला आहे. यातच श्री साईबाबा संस्थानने यवतमाळ मेडिकलला एमआरआय खरेदीसाठी दिलेला १३ कोटींचा निधी खर्च झालेला नसल्याचे कारण समोर करीत निधी परत मागितला.तसे पत्र यवतमाळ मेडिकल अधिष्ठात्यांना प्राप्त झाले आहे. मेयोतही निधी देऊन महिनोन्महिने झाले असताना यंत्रसामग्रीची खरेदी झाली नाही. यामुळे श्री साईबाबा संस्थाही हा निधी परत मागण्याची शक्यता आहे. शासनाने आतातरी याला गंभीरतेने घेणे आवश्यक असल्याचे मत वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञानी व्यक्त केली आहे.

टॅग्स :Healthआरोग्य