शहरं
Join us  
Trending Stories
1
'शेतकऱ्यांना १०० टक्के नुकसानभरपाई द्या, अन्यथा महाराष्ट्र बंद करू'; मनोज जरांगेंचा इशारा
2
लडाखच्या पूर्ण राज्याच्या दर्जासाठी लेह पेटले; सोनम वांगचूक म्हणाले, हा तरुणांचा राग होता, GenZ क्रांती...
3
उद्धव ठाकरेंचा दौरा ठरला; पुराचा फटका बसलेल्या 'या' पाच जिल्ह्यांत करणार पाहणी
4
शांत, सुंदर लडाख का पेटलं? पूर्ण राज्याच्या दर्जासह आंदोलकांच्या या आहेत ४ प्रमुख मागण्या  
5
रेल्वे कर्मचाऱ्यांची दिवाळी लवकरच होणार गोड, मिळणार ७८ दिवसांचा बोनस
6
Viral Video: ज्ञानाच्या मंदिरात मुख्याध्यापिकाच दारू पिऊन तर्राट; व्हिडीओ पाहून संतापले लोक!
7
VIRAL : परदेशी जोडपं फोटो काढत होतं, अचानक माकडं खांद्यावर आलं अन्... व्हिडीओ बघून खूश व्हाल!
8
Leh Protest: लेहमध्ये आंदोलनाला हिंसक वळण, भाजप कार्यालय पेटवले, सोनम वांगचुक १५ दिवसांपासून उपोषणावर
9
निवृत्तीनंतर दरमहा मिळेल १५,००० रुपये पेन्शन, एलआयसीच्या 'या' योजनेबद्दल तुम्हाला माहिती आहे का?
10
"एमबीबीएससाठी वेळ आणि पैसे खर्च करण्यापेक्षा मला...", अनुरागने घरातच स्वतःला संपवले, चिठ्ठीमध्ये काय?
11
"योगी स्वतःला पीएम मोदींचा उत्तराधिकारी समजतात...!"; CWC च्या बैठकीत खर्गेंचा मोठा हल्ला, नीतीश कुमारांसाठी असा शब्द वापरला
12
२०२७ पर्यंत युनायटेड अमेरिकेचं विभाजन? ट्रम्प ठरणार USAचे शेवटचे राष्ट्राध्यक्ष! मोठे भाकित...
13
मराठी अभिनेत्रीचं "न्यूड" फोटोशूट; सौंदर्य पाहून चाहते प्रेमात, करत आहेत कौतुक
14
नवरात्री २०२५: १२५ वर्ष जुने कोकणातले पंचमुखी गायत्री मंदिर पाहिले का? मंत्रमुग्ध करणारी मूर्ती आणि इतिहास 
15
अश्विनची लवकरच क्रिकेटमध्ये नवी इनिंग; आता पाकिस्तानी क्रिकेटरसोबत एकाच संघात खेळणार!
16
पुण्यातील रविवार पेठेत शुकशुकाट; ऐन नवरात्रीत घागरा, ड्रेस घ्यायला महिलावर्ग येईना..., व्यापाऱ्यांत कुजबुज...
17
Maharashtra Rain Update: पुढील चार दिवस विदर्भात वारे, विजांसह मुसळधार पावसाचा इशारा; बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा
18
15 मुलींची छेडछाड केल्याचा आरोप, स्वामी चैतन्यानंद सरस्वती फरार; Volvo कार जप्त
19
Volvo EX30: एका चार्जवर ४८० किमी धावणार; वोल्वोची बहुप्रतीक्षित इलेक्ट्रिक कार भारतात लॉन्च!
20
GST कपातीचा फायदा मिळत नाहीये? टोल-फ्री नंबर किंवा व्हॉट्सअॅपवर करू शकता थेट तक्रार

मे महिन्यात राज्यातील ४०० वर डॉक्टर बसणार घरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2018 09:57 IST

वैद्यकीय अधिकारी व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कमतरतेमुळे रुग्णांना वेळेत योग्य आरोग्य सुविधा पुरविणे अडचणीचे होत असल्याने २०१५ मध्ये वैद्यकीय अधिकारी व वरिष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्यांचे निवृत्ती वय ५८ वरून ६० करण्याचा अध्यादेश सार्वजनिक आरोग्य विभागाने काढला.

ठळक मुद्दे६० वरून ५८ होणार निवृत्ती वय आरोग्य विभागाच्या तीन वर्षांसाठीच्या अध्यादेशाची मुदत संपणार

सुमेध वाघमारे ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वैद्यकीय अधिकारी व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कमतरतेमुळे रुग्णांना वेळेत योग्य आरोग्य सुविधा पुरविणे अडचणीचे होत असल्याने २०१५ मध्ये वैद्यकीय अधिकारी व वरिष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्यांचे निवृत्ती वय ५८ वरून ६० करण्याचा अध्यादेश सार्वजनिक आरोग्य विभागाने काढला.विशेष म्हणजे, हा निर्णय तीन वर्षांसाठी म्हणजे ३१ मे २०१८ पर्यंतच लागू आहे. यामुळे पुढील महिन्यात राज्यभरातील सुमारे ४०० वर डॉक्टर सेवानिवृत्त होणार आहेत. त्यांच्या जागी दुसरे अधिकारी येणार असलेतरी येणाऱ्यांच्या जागा रिक्त राहणार असल्याने तर काहींचे कामकाज प्रभारी अधिकाऱ्यांकडून चालविले जाणार असल्याने आरोग्य सेवेला याचा मोठा फटका बसणार आहे.नागरिकांना पुरेशी, गुणात्मक, प्रतिबंधात्मक व रोगनिवारक आरोग्य देखभाल सेवा देण्याची जबाबदारी सार्वजनिक आरोग्य विभागाची आहे. जिल्हा रुग्णालये, स्त्री रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालये, ग्रामीण रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्र सक्षमपणे चालविणे हे नवीन आव्हान सार्वजनिक आरोग्य विभागासमोर ठाकले आहे. यातच रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कमतरतेमुळे रुग्णांना वेळेत योग्य आरोग्य सुविधा पुरविण्यास अडचणी निर्माण झाल्या आहेत. वैद्यकीय अधिकारी व विशेषज्ञ पदासाठी प्रयत्न करूनदेखील पुरेशा प्रमाणात वैद्यकीय अधिकारी उपलब्ध होत नसल्याचे वास्तव आहे. उपलब्ध झाले तरी पसंतीच्या ठिकाणी पदस्थापना न मिळाल्यास सेवेत रुजू न होण्याचे प्रमाणही मोठे आहे.याबाबत आरोग्य विभागाने राज्यातील आरोग्य सेवा संचालनालयांतर्गत रुग्णालयातील ३१ मे २०१५ रोजी सेवानिवृत्त होणाऱ्यांचे वय वाढविण्याचा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर सादर करण्यात आला होता. याला मंजुरी मिळाल्यानंतर सेवानिवृत्तीचे वय ५८ ऐवजी ६० वर्षे करण्याचा शासन निर्णय निघाला.परंतु हा शासन निर्णय तीन वर्षांसाठीच लागू करण्यात आला.या निर्णयानुसार ३१ मे २०१८ रोजी राज्यभरातील ४००वर डॉक्टर सेवानिवृत्त होणार असल्याने आरोग्य सेवा अडचणीत येण्याची शक्यता आहे.तर संचालकांनाही पुढील महिन्यात घरी बसावे लागणार१५ दिवसांपूर्वी आरोग्य संचालकपदी नियुक्त झालेले डॉ. संजीव कांबळे हे २०१५च्या शासन निर्णयानुसार मे २०१८ रोजी सेवानिवृत्त होतील. केवळ दीड महिन्यांचा त्यांचा कार्यकाळ राहील. नागपुरात १० वर तर राज्यभरात अशा ४०० वर वरिष्ठांना घरी बसावे लागणार आहे. वय वाढू नये याला काही डॉक्टरांचा विरोध आहे. त्यांच्यानुसार शासनाने वय न वाढविता नियमानुसार रिक्त जागा भराव्यात.

७५ कोटींचा बसेल फटकाशासन निर्णयानुसार ६० झालेले वय पुन्हा ५८ होणार असल्याने याला तीन मोठ्या वैद्यकीय संघटनांनी विरोध केला आहे. डॉक्टरांचे वय कायम ६० करण्याची त्यांची मागणी आहे. विशेष म्हणजे, वय वाढविले नाही, तर शासनाला साधारण ७५ कोटींचा फटका बसण्याची शक्यता आहे, अशी माहिती संचालकांकडून शासनाकडे सादर करण्यात आल्याची माहिती आहे.

टॅग्स :Healthआरोग्यdoctorडॉक्टर