शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार विधानसभा निवडणुकीचा फैसला; ५ कोटी मतांच्या मोजणीकडे देशाचे लक्ष! मतमोजणीची वेळ काय?
2
वाचवा, वाचवा..! ट्रक क्लिनरची मदतीसाठी याचना, कार पूर्णपणे जळून खाक
3
नवले पूल पुन्हा 'डेथ स्पॉट'; कंटेनर अपघातातील ९ मृतांमध्ये एका कुटुंबाचा समावेश
4
गोळ्या झाडून व्यावसायिकाचा खून करणाऱ्या संशयितांच्या शोधात पाच पथके रवाना
5
नवले पुलावर मृत्यूचा तांडव..! कंटेनर ट्रॅव्हलवर पलटी, कार पेटली, आठ जणांचे बळी
6
दिल्ली कार बॉम्बस्फोटानंतर अल-फलाह विद्यापीठावर कारवाई, सदस्यत्व रद्द
7
इराणच्या जनतेत पसरलीये संतापाची लाट! खामेनींकडे फिरवली पाठ; नेमकं कारण काय?
8
लाल किल्ला ब्लास्ट : एक-दोन नव्हे, तब्बल 32 कारचा होणार होता वापर; दहशतवाद्यांनी आखला होता 'बाबरीचा' बदला घेण्याचा भयंकर कट
9
कारमधील सीएनजीचा स्फोट...? दोन कंटेनरमध्ये कार सापडून लागली आग 
10
अजून किती निष्पाप लोकांचे बळी घेणार? प्रशासन ठोस उपाययोजना कधी करणार? स्थानिकांचा सवाल
11
'माझ्या मृत्युला आईच जबाबदार, तिला कडक शिक्षा करा', सोलापुरात वकील तरुणाने बेडरुममध्येच संपवले आयुष्य
12
भाजपाला वनमंत्री गणेश नाईकांच्या जनता दरबाराचे बळ;  शिंदेसेनेच्या मंत्री सरनाईकना रोखण्यासाठी नाईक मैदानात 
13
दिल्लीनंतर आता मुंबईच्या आकाशावर जीपीएस स्पूफिंगचे सावट; सिग्नलमध्ये बिघाडबाबत एएआयने दिला इशारा
14
बिहारमध्ये NDA कडून मुख्यमंत्रीपदाची शपथ कोण घेणार? मतमोजणीपूर्वीच चिराग पासवान यांच्या पक्षाचा मोठा दावा!
15
'इलेक्ट्रिक व्हेईकल्सना प्रोत्साहन देण्यासाठी पेट्रोल-डिझेलवरील लग्झरी वाहनांवर...', सर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला सल्ला
16
Pune Accident : नवले पुलावर भीषण अपघात; अनेक वाहनं पेटली..! बचावकार्य सुरू
17
Travel : भरपूर फिरा, फोटो काढा अन् धमाल करा! 'या' देशात जाताच १० हजार भारतीय रुपये होतात ३० लाख!
18
'आम्ही अशी शिक्षा देणार की जग बघत बसेल’; दिल्ली स्फोटांवर अमित शहांचा गंभीर इशारा
19
पुलवामा हल्ल्याच्या मास्टरमाईंडची पत्नी डॉक्टर शाहीनच्या संपर्कात; जैशच्या 'महिला ब्रिगेड' मोठं कनेक्शन उघड!
20
5 लाख सॅलरी अन्...! हनिमूनला जाण्याच्या तयारीत बसलेली डॉक्टर रुकैया कोण? दहशतवादी आदिलच्या लग्नात सहभागी झालेले सगळेच रडारवर
Daily Top 2Weekly Top 5

मे महिन्यात राज्यातील ४०० वर डॉक्टर बसणार घरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2018 09:57 IST

वैद्यकीय अधिकारी व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कमतरतेमुळे रुग्णांना वेळेत योग्य आरोग्य सुविधा पुरविणे अडचणीचे होत असल्याने २०१५ मध्ये वैद्यकीय अधिकारी व वरिष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्यांचे निवृत्ती वय ५८ वरून ६० करण्याचा अध्यादेश सार्वजनिक आरोग्य विभागाने काढला.

ठळक मुद्दे६० वरून ५८ होणार निवृत्ती वय आरोग्य विभागाच्या तीन वर्षांसाठीच्या अध्यादेशाची मुदत संपणार

सुमेध वाघमारे ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वैद्यकीय अधिकारी व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कमतरतेमुळे रुग्णांना वेळेत योग्य आरोग्य सुविधा पुरविणे अडचणीचे होत असल्याने २०१५ मध्ये वैद्यकीय अधिकारी व वरिष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्यांचे निवृत्ती वय ५८ वरून ६० करण्याचा अध्यादेश सार्वजनिक आरोग्य विभागाने काढला.विशेष म्हणजे, हा निर्णय तीन वर्षांसाठी म्हणजे ३१ मे २०१८ पर्यंतच लागू आहे. यामुळे पुढील महिन्यात राज्यभरातील सुमारे ४०० वर डॉक्टर सेवानिवृत्त होणार आहेत. त्यांच्या जागी दुसरे अधिकारी येणार असलेतरी येणाऱ्यांच्या जागा रिक्त राहणार असल्याने तर काहींचे कामकाज प्रभारी अधिकाऱ्यांकडून चालविले जाणार असल्याने आरोग्य सेवेला याचा मोठा फटका बसणार आहे.नागरिकांना पुरेशी, गुणात्मक, प्रतिबंधात्मक व रोगनिवारक आरोग्य देखभाल सेवा देण्याची जबाबदारी सार्वजनिक आरोग्य विभागाची आहे. जिल्हा रुग्णालये, स्त्री रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालये, ग्रामीण रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्र सक्षमपणे चालविणे हे नवीन आव्हान सार्वजनिक आरोग्य विभागासमोर ठाकले आहे. यातच रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कमतरतेमुळे रुग्णांना वेळेत योग्य आरोग्य सुविधा पुरविण्यास अडचणी निर्माण झाल्या आहेत. वैद्यकीय अधिकारी व विशेषज्ञ पदासाठी प्रयत्न करूनदेखील पुरेशा प्रमाणात वैद्यकीय अधिकारी उपलब्ध होत नसल्याचे वास्तव आहे. उपलब्ध झाले तरी पसंतीच्या ठिकाणी पदस्थापना न मिळाल्यास सेवेत रुजू न होण्याचे प्रमाणही मोठे आहे.याबाबत आरोग्य विभागाने राज्यातील आरोग्य सेवा संचालनालयांतर्गत रुग्णालयातील ३१ मे २०१५ रोजी सेवानिवृत्त होणाऱ्यांचे वय वाढविण्याचा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर सादर करण्यात आला होता. याला मंजुरी मिळाल्यानंतर सेवानिवृत्तीचे वय ५८ ऐवजी ६० वर्षे करण्याचा शासन निर्णय निघाला.परंतु हा शासन निर्णय तीन वर्षांसाठीच लागू करण्यात आला.या निर्णयानुसार ३१ मे २०१८ रोजी राज्यभरातील ४००वर डॉक्टर सेवानिवृत्त होणार असल्याने आरोग्य सेवा अडचणीत येण्याची शक्यता आहे.तर संचालकांनाही पुढील महिन्यात घरी बसावे लागणार१५ दिवसांपूर्वी आरोग्य संचालकपदी नियुक्त झालेले डॉ. संजीव कांबळे हे २०१५च्या शासन निर्णयानुसार मे २०१८ रोजी सेवानिवृत्त होतील. केवळ दीड महिन्यांचा त्यांचा कार्यकाळ राहील. नागपुरात १० वर तर राज्यभरात अशा ४०० वर वरिष्ठांना घरी बसावे लागणार आहे. वय वाढू नये याला काही डॉक्टरांचा विरोध आहे. त्यांच्यानुसार शासनाने वय न वाढविता नियमानुसार रिक्त जागा भराव्यात.

७५ कोटींचा बसेल फटकाशासन निर्णयानुसार ६० झालेले वय पुन्हा ५८ होणार असल्याने याला तीन मोठ्या वैद्यकीय संघटनांनी विरोध केला आहे. डॉक्टरांचे वय कायम ६० करण्याची त्यांची मागणी आहे. विशेष म्हणजे, वय वाढविले नाही, तर शासनाला साधारण ७५ कोटींचा फटका बसण्याची शक्यता आहे, अशी माहिती संचालकांकडून शासनाकडे सादर करण्यात आल्याची माहिती आहे.

टॅग्स :Healthआरोग्यdoctorडॉक्टर