शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

नागपूर जिल्ह्यात मातृ वंदना योजना ठरतेय वरदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2020 20:19 IST

मातामृत्यू व बालमृत्यूचा दर कमी व्हावा, सृदृढ बाळ जन्मास यावे, यासाठी राज्यात १ जानेवारी २०१७ पासून आरोग्य विभागाच्यावतीने प्रधानमंत्री मातृवंदन योजना राबविण्यात येत आहे. नागपूर जिल्ह्यात ही योजना महिलांसाठी वरदान ठरत असून ६६०८३ गर्भवती महिलांनी याचा लाभ घेतला आहे.

ठळक मुद्दे२५ कोटी अनुदान वाटपाचा टप्पा गाठला : महिलांचा योजनेला प्रतिसाद

लोकमत  न्यूज  नेटवर्क नागपूर : मातामृत्यू व बालमृत्यूचा दर कमी व्हावा, सृदृढ बाळ जन्मास यावे, यासाठी राज्यात १ जानेवारी २०१७ पासून आरोग्य विभागाच्यावतीने प्रधानमंत्री मातृवंदन योजना राबविण्यात येत आहे. नागपूर जिल्ह्यात ही योजना महिलांसाठी वरदान ठरत असून ६६०८३ गर्भवती महिलांनी याचा लाभ घेतला आहे. त्यांना २५ कोटी ६० लाख रुपयांचे अनुदान वाटप करण्यात आले आहे.या योजनेला नागपूर जिल्ह्यात प्रचंड प्रतिसाद मिळतो आहे. शहरी भागातील (मनपा व नगरपालिका) हद्दीतील ३३ हजार ४७३ तर ग्रामीण भागातील ३२ हजार ६१० गर्भवती महिला व स्तनदा मातांनी योजनेचा लाभ घेतला आहे. ग्रामीण भागात बाळाचे पोषण होत नसल्याने कुपोषणाची समस्या आहे. ही बाब लक्षात घेऊन केंद्र सरकारने ‘प्रधानमंत्री मातृवंदना योजना’ सुरू केली. ही योजना राष्ट्रीय आरोग्य अभियानमार्फत राबविली जाते. केंद्र व राज्य पुरस्कृत ही योजना केवळ पहिल्याच अपत्यासाठी व सरकारने अधिसूचित केलेल्या संस्थेत नोंदणी झालेल्या स्त्रियांनाच लागू असून, लाभाची ५ हजार रुपयांची रक्कम तीन टप्प्यात संबंधित लाभार्थी महिलेच्या खात्यात जमा होते. या योजनेच्या लाभासाठी जातीची व उत्पन्नाची अट नसून, शासकीय सेवेत नसणाऱ्या सर्व महिलांना या योजनेचा लाभ मिळतो. आर्थिक साहाय्याचा पहिला हप्ता गर्भवती मातांनी शासकीय रुग्णालयात नोंद केल्यानंतर मिळतो. दुसरा हप्ता बाळंतपूर्व तपासणी करताना गर्भधारणेच्या ११० दिवसानंतर तर योजनेतील तिसरा आणि शेवटचा हप्ता हा ती स्त्री प्रसुत झाल्यानंतर बाळाला सर्व लसी दिल्याची खात्री केल्यानंतर मिळतो. 

४११९३ महिलांना तिन्ही टप्प्याचे अनुदान वाटपजिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये या योजनेची ऑक्टोबर २०१७ पासून तर शहरी भागात ऑक्टोबर २०१८ मध्ये अंमलबजावणी सुरू झाली. आजवर या योजनेसाठी जिल्ह्यात एकूण ६६ हजार ८३ गर्भवती मातांनी नोंदणी केली असून, यापैकी ५८ हजार ४२३ महिलांनी आजवर या योजनेंतर्गत पहिल्या टप्प्यातील लाभ घेतला आहे. ५७ हजार ६६७ गर्भवती मातांना योजनेचा दुसरा तर ४१ हजार १९३ महिलांना तिसऱ्या हप्त्याचे अनुदान वाटप केले आहे. योजनेचा उद्देश बालमृत्यू, मातामृत्यू दर कमी करण्याचा असून, सृदृढ बाळ जन्मास यावे हा आहे. योजनेला जिल्ह्यात मिळणारा प्रतिसाद उत्तम आहे. डॉ. दीपक सेलोकर, जिल्हा आरोग्य अधिकारी.

टॅग्स :prime ministerपंतप्रधानnagpurनागपूर