शहरं
Join us  
Trending Stories
1
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
2
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
3
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
4
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
5
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
6
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
7
कुंडमळा येथे क्षणात कोसळला पूल..! रांजणखळग्यांमुळे शोध मोहिमेत अडथळे
8
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
9
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
10
Bridge Collapse: कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
11
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर
12
नवरी जोमात, नवरा कोमात! लग्नानंतर १० दिवसांनी शॉपिंगच्या नावाने पत्नी फरार, पती पाहतोय वाट
13
एका दिवसात किती भाविक हेलिकॉप्टरने केदारनाथला जातात? किती वेळ लागतो? जाणून घ्या...
14
कुंडमळा दुर्घटनेत पहिला बळी..! बचाव कार्यादरम्यान महिलेचा मृतदेह सापडला
15
शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा
16
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "मला बाबांशी बोलायचंय..."; विमान अपघातात ८ वर्षांच्या मुलाने गमावले वडील
17
तुमचा EMI कमी होणार! RBI च्या निर्णयानंतर 'या' बँका देतायत सर्वात स्वस्त कर्ज, पाहा संपूर्ण यादी!
18
पाठवणी होताच झालं नवरीचं अपहरण; शोधाशोध करताच समोर आलं धक्कादायक सत्य! नवराही शॉक
19
"महेश सापडेल अशी आशा..!" अहमदाबाद विमान दुर्घटनेत लोकप्रिय संगीतकार बेपत्ता, शेवटचं लोकेशन सापडलं, पण...
20
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक

नागपूर जिल्ह्यात मातृ वंदना योजना ठरतेय वरदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2020 20:19 IST

मातामृत्यू व बालमृत्यूचा दर कमी व्हावा, सृदृढ बाळ जन्मास यावे, यासाठी राज्यात १ जानेवारी २०१७ पासून आरोग्य विभागाच्यावतीने प्रधानमंत्री मातृवंदन योजना राबविण्यात येत आहे. नागपूर जिल्ह्यात ही योजना महिलांसाठी वरदान ठरत असून ६६०८३ गर्भवती महिलांनी याचा लाभ घेतला आहे.

ठळक मुद्दे२५ कोटी अनुदान वाटपाचा टप्पा गाठला : महिलांचा योजनेला प्रतिसाद

लोकमत  न्यूज  नेटवर्क नागपूर : मातामृत्यू व बालमृत्यूचा दर कमी व्हावा, सृदृढ बाळ जन्मास यावे, यासाठी राज्यात १ जानेवारी २०१७ पासून आरोग्य विभागाच्यावतीने प्रधानमंत्री मातृवंदन योजना राबविण्यात येत आहे. नागपूर जिल्ह्यात ही योजना महिलांसाठी वरदान ठरत असून ६६०८३ गर्भवती महिलांनी याचा लाभ घेतला आहे. त्यांना २५ कोटी ६० लाख रुपयांचे अनुदान वाटप करण्यात आले आहे.या योजनेला नागपूर जिल्ह्यात प्रचंड प्रतिसाद मिळतो आहे. शहरी भागातील (मनपा व नगरपालिका) हद्दीतील ३३ हजार ४७३ तर ग्रामीण भागातील ३२ हजार ६१० गर्भवती महिला व स्तनदा मातांनी योजनेचा लाभ घेतला आहे. ग्रामीण भागात बाळाचे पोषण होत नसल्याने कुपोषणाची समस्या आहे. ही बाब लक्षात घेऊन केंद्र सरकारने ‘प्रधानमंत्री मातृवंदना योजना’ सुरू केली. ही योजना राष्ट्रीय आरोग्य अभियानमार्फत राबविली जाते. केंद्र व राज्य पुरस्कृत ही योजना केवळ पहिल्याच अपत्यासाठी व सरकारने अधिसूचित केलेल्या संस्थेत नोंदणी झालेल्या स्त्रियांनाच लागू असून, लाभाची ५ हजार रुपयांची रक्कम तीन टप्प्यात संबंधित लाभार्थी महिलेच्या खात्यात जमा होते. या योजनेच्या लाभासाठी जातीची व उत्पन्नाची अट नसून, शासकीय सेवेत नसणाऱ्या सर्व महिलांना या योजनेचा लाभ मिळतो. आर्थिक साहाय्याचा पहिला हप्ता गर्भवती मातांनी शासकीय रुग्णालयात नोंद केल्यानंतर मिळतो. दुसरा हप्ता बाळंतपूर्व तपासणी करताना गर्भधारणेच्या ११० दिवसानंतर तर योजनेतील तिसरा आणि शेवटचा हप्ता हा ती स्त्री प्रसुत झाल्यानंतर बाळाला सर्व लसी दिल्याची खात्री केल्यानंतर मिळतो. 

४११९३ महिलांना तिन्ही टप्प्याचे अनुदान वाटपजिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये या योजनेची ऑक्टोबर २०१७ पासून तर शहरी भागात ऑक्टोबर २०१८ मध्ये अंमलबजावणी सुरू झाली. आजवर या योजनेसाठी जिल्ह्यात एकूण ६६ हजार ८३ गर्भवती मातांनी नोंदणी केली असून, यापैकी ५८ हजार ४२३ महिलांनी आजवर या योजनेंतर्गत पहिल्या टप्प्यातील लाभ घेतला आहे. ५७ हजार ६६७ गर्भवती मातांना योजनेचा दुसरा तर ४१ हजार १९३ महिलांना तिसऱ्या हप्त्याचे अनुदान वाटप केले आहे. योजनेचा उद्देश बालमृत्यू, मातामृत्यू दर कमी करण्याचा असून, सृदृढ बाळ जन्मास यावे हा आहे. योजनेला जिल्ह्यात मिळणारा प्रतिसाद उत्तम आहे. डॉ. दीपक सेलोकर, जिल्हा आरोग्य अधिकारी.

टॅग्स :prime ministerपंतप्रधानnagpurनागपूर