शहरं
Join us  
Trending Stories
1
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
2
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
3
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
4
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
5
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
6
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
7
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
8
Travel : मन मोहून टाकतील असे भारतातील 'हिडन' हिल स्टेशन्स; ९०% लोकांना या जागांबद्दल माहितीच नाही!
9
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
10
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
11
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
12
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
13
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
14
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट
15
अरे बापरे! डोक सटकलं आणि गेम झोनच्या कर्मचाऱ्याचे नाक युवकाने हातोड्याने फोडले
16
११ कोटींची लॉटरी जिंकणारा 'तो' व्यक्ती अखेर सापडला! रस्त्यावर विकत होता कांदे-बटाटे अन्...
17
Smartphones: २४ जीबी रॅम, ७५०० mAh बॅटरी आणि सुपरफास्ट चार्जिंग; जबरदस्त फोन लॉन्च!
18
आता 'या' देशात पर्यटकही धूम्रपान करू शकणार नाहीत! सेलिब्रेटींमध्ये लोकप्रिय असणाऱ्या देशाचे नियम बदलले
19
भारताला डिवचण्याचा प्रयत्न; मोहम्मद युनूस यांनी पाकिस्ताननंतर तुर्कीला दिला वादग्रस्त नकाशा
20
Viral Video: लग्नात स्वयंपाक बनवताना तरुणाचं घाणेरडं कृत्य; व्हिडिओ समोर येताच अटक!

माथाडी मंडळामुळे स्टील उद्योग धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2018 00:12 IST

नागपूर व वर्धा जिल्हा माथाडी आणि असंरक्षित कामगार मंडळाच्या मनमानी कारभारामुळे स्टील उद्योग धोक्यात आला आहे. स्टील उद्योजकांना माथाडी कामगारांस अवाजवी मजुरी द्यावी लागत आहे. त्याचा फटका या उद्योगाच्या प्रगतीला बसत आहे अशी धक्कादायक माहिती अ‍ॅड. फिरदोस मिर्झा यांनी दिली. त्यांनी विविध पातळ्यांवर हा विषय हाताळला आहे. अर्थव्यवस्थेच्या भरभराटीसाठी उद्योग जगणे आवश्यक असल्यामुळे ‘लोकमत’ने त्यांना या विषयावर बोलते केले.

ठळक मुद्देअ‍ॅड. फिरदोस मिर्झा यांची लोकमतला खास मुलाखतअवाजवी मजुरीचा बसतोय फटका

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर व वर्धा जिल्हा माथाडी आणि असंरक्षित कामगार मंडळाच्या मनमानी कारभारामुळे स्टील उद्योग धोक्यात आला आहे. स्टील उद्योजकांना माथाडी कामगारांस अवाजवी मजुरी द्यावी लागत आहे. त्याचा फटका या उद्योगाच्या प्रगतीला बसत आहे अशी धक्कादायक माहिती अ‍ॅड. फिरदोस मिर्झा यांनी दिली. त्यांनी विविध पातळ्यांवर हा विषय हाताळला आहे. अर्थव्यवस्थेच्या भरभराटीसाठी उद्योग जगणे आवश्यक असल्यामुळे ‘लोकमत’ने त्यांना या विषयावर बोलते केले.प्रश्न :माथाडी मंडळामुळे स्टील उद्योग कसे अडचणीत आले आहेत?अ‍ॅड. मिर्झा :माथाडी कामगारांची अवाजवी मजुरी ही स्टील उद्योजकांना सर्वाधिक अडचणीत आणत आहे. जेएसडब्ल्यू कंपनीच्या प्रकरणामुळे यावर शिक्कामोर्तब झाले आहे. कंत्राटी पद्धतीवर १० ते १५ हजार रुपये महिन्याप्रमाणे मजुर उपलब्ध होतात. परंतु, माथाडी कामगारांना महिन्याला लाखामध्ये मजुरी द्यावी लागते. माल खाली उतरवणे व चढवणे ही कामे माथाडी कामगार करीत असतात. स्टील उद्योगांमध्ये यासाठी क्रेनचा वापर केला जातो. माथाडी कामगार केवळ क्रेनच्या आकुड्याला माल लटकविण्याचे काम करतात. त्यासाठी त्यांना ७८ रुपये प्रति टनप्रमाणे मजुरी द्यावी लागते. क्रेनमुळे ९० टनाच्या लोखंडी वस्तू १५ मिनिटात चढविल्या व उतरविल्या जातात. या कामाची माथाडी कामगारांना भरमसाठ मजुरी द्यावी लागते.प्रश्न:मजुरी निश्चितीबाबत कायद्यात काय तरतूद आहे?अ‍ॅड. मिर्झा:माथाडी कायद्यानुसार माथाडी मंडळामध्ये सरकार, उद्योजक व कामगार यांचे प्रतिनिधी असणे आवश्यक आहे. उद्योजक व कामगार प्रतिनिधींची संख्या सारखी असावी. कामगारांची मजुरी निश्चित करताना संबंधित उद्योजकाला किंवा उद्योजकांच्या संघटनेशी चर्चा करायला हवी. परंतु, सध्या तसे होत नाही. मंडळ मनमानी पद्धतीने कार्य करीत आहे. माथाडी कामगारांसाठी अवाजवी मजुरी निश्चित करण्यात आली आहे.प्रश्न :माथाडी मंडळ कायद्याचे पालन करीत आहे का?अ‍ॅड. मिर्झा: नक्कीच नाही. सर्वप्रथम या मंडळामध्ये कायद्यानुसार नियुक्त्या होणे गरजेचे आहे. ते झाल्यानंतर माथाडी कायदा कुठे लागू होतो, कोणत्या कामासाठी किती मजूर पाठविले पाहिजे, त्यांची किमान मजुरी किती असली पाहिजे इत्यादीसंदर्भात निर्णय घेता येतील. माथाडी कामगारांची मजुरी ठरवताना बाजारातील मजुरी विचारात घेतली जाणे गरजेचे आहे.प्रश्न:उद्योजकांना न्याय देण्यासाठी माथाडी मंडळाने काय करावे?अ‍ॅड. मिर्झा:माथाडी कामगारांना अवाजवी मजुरी द्यावी लागू नये यासाठी मंडळाने आवश्यक पावले उचलणे गरजेचे आहे. त्यानंतरच उद्योजकांना खरा न्याय मिळेल.प्रश्न:भारतीय स्पर्धा आयोग यामध्ये काय भूमिका वठवू शकतो?अ‍ॅड. मिर्झा:नोंदणीकृत उद्योजकांना माथाडी कामगारांची सेवा घेणे अनिवार्य आहे. त्यांच्याकडे दुसरा पर्याय नाही. त्यासाठी माथाडी मंडळ उद्योजकांना सेवा देते. ते करीत असताना मंडळ माथाडी कामगारांसाठी अवाजवी मजुरीही निश्चित करते. मजुरी ठरवताना उद्योजकांशी चर्चा केली जात नाही. या कृतीमुळे स्पर्धा कायद्याची पायमल्ली होते. अशा परिस्थितीत उद्योजकांनी या कायद्याच्या कलम २१ अंतर्गत मंडळाकडे तक्रार केल्यास ती तक्रार योग्य निर्णयासाठी भारतीय स्पर्धा आयोगाकडे पाठविणे आवश्यक आहे. त्यानंतर आयोगाची भूमिका सुरू होते. परंतु, उद्योजकांच्या तक्रारी आयोगाकडे पाठविल्या जात नाहीत असा अनुभव आहे.

टॅग्स :advocateवकिलinterviewमुलाखत