शहरं
Join us  
Trending Stories
1
यश दयालसमोर धोनी ठरला फिका! नो बॉल.. फ्री हिट ट्विस्टनंतरही CSK नं गमावला सामना, RCB टॉपला
2
भारत-पाक सीमेवर मोठी कारवाई, राजस्थानात पाकिस्तानी रेंजर ताब्यात!
3
घरगुती वाद विकोपाला! अकोला येथे दुहेरी खून: पतीकडून पत्नी, सावत्र मुलीची गळा दाबून हत्या
4
रामराजे नाईक-निंबाळकर यांनाही उत्तरे द्यावीच लागणार, मुख्यमंत्र्यांचे यावर बारीक लक्ष- जयकुमार गोरे
5
आयपीएल २०२५ मध्ये युवा फलंदाजांचा दबदबा, आरसीबीविरुद्ध आयुष म्हात्रेचं सुपरफास्ट अर्धशतक
6
अँथनी अल्बानीज पुन्हा होणार ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान! ऐतिहासिक विजयानंतर PM मोदींनी केलं अभिनंदन
7
"भारताला कारवाईचा पूर्ण अधिकार...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर माजी अमेरिकन NSA जॉन बोल्टन स्पष्टच बोलले
8
२१ वर्षीय पोराची कडक फिफ्टी! कोण आहे किंग कोहलीचा नवा ओपनिंग पार्टनर Jacob Bethell?
9
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
10
IPL 2025 : कोहलीनं जिरवली! खलील अहमदनं दुसऱ्याच्या जीवावर असा काढला राग, मग... (VIDEO)
11
नवविवाहितेच्या खून प्रकरणात आरोपी पतीला जन्मठेपेची शिक्षा; १० हजारांचा दंड, लातुरातील घटना
12
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
13
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
14
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
15
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
16
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
17
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
18
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
19
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं
20
मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप

‘मामा’ च्या हत्याकांडातील सूत्रधार अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2019 22:12 IST

१५ हजार रुपयांसाठी झालेल्या वादातून रविवारी रात्री गुंडांनी २५ वर्षीय आनंद शिरपूरकर याची हत्या केली होती. या घटनेनंतर कोतवाली पोलिसांनी समीर शेंडे, यश गोस्वामी, प्रफुल्ल शिवरेकर व प्रदीप काळे यांना अटक केली होती. सोमवारी रात्री हत्येचा सूत्रधार रितेश शिवरेकर यालाही अटक करण्यात आली. पोलिसांनी बुधवारी आरोपींना न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने ३ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

ठळक मुद्दे३ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी : वस्तीमध्ये शोककळा

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : १५ हजार रुपयांसाठी झालेल्या वादातून रविवारी रात्री गुंडांनी २५ वर्षीय आनंद शिरपूरकर याची हत्या केली होती. या घटनेनंतर कोतवाली पोलिसांनी समीर शेंडे, यश गोस्वामी, प्रफुल्ल शिवरेकर व प्रदीप काळे यांना अटक केली होती. सोमवारी रात्री हत्येचा सूत्रधार रितेश शिवरेकर यालाही अटक करण्यात आली. पोलिसांनी बुधवारी आरोपींना न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने ३ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.मृत आनंदचे रितेश शिवरेकर याच्यावर ८ हजार रुपये होते तर रितेशचे वस्तीतील मनोज मेहर याच्यावर १५ हजार रुपये होते. त्यासाठी रितेश मनोजसोबत वाद घालत होता. त्यामुळे आनंदने रितेशला ८ हजार रुपये कापून मनोजकडून ७ हजार रुपये घेण्यास सांगितले. त्यामुळे रितेश संतप्त झाला. त्याने चर्चेसाठी आनंदला बोलावून मित्राच्या मदतीने त्याची हत्या केली.आनंद मूळचा उमरेड येथील रहिवासी होता. त्याची आई व बहीण उमरेडमध्ये राहते. आठ वर्षापूर्वी तो गुजरवाडी येथे आला होता. टाईल्स विक्रीचा व्यवसाय करीत होता. त्याचा स्वभाव मनमिळावू होता. अनेकांना तो आर्थिक मदतही करीत होता. गुजरवाडीतील सर्व लोक त्याला ‘मामा’ म्हणायचे. वस्तीतील सर्वांचाच तो मामा होता. वस्तीतील कुठल्याही कार्यक्रमात तो सक्रिय असायचा. वस्तीतील कुणालाही मदतीची गरज भासल्यास ते आनंदकडेच यायचे. त्याच्या स्वभावामुळे नेहमीच त्याच्या घरी, लोकांचा गोतावळा रहायचा. वस्तीच्या लोकांचे म्हणणे आहे की, आनंदबद्दल प्रत्येकाला आदर होता. आनंदने फक्त वाद निपटावा म्हणून रितेशला म्हटले होते. मदतीच्या भावनेतून आनंदला आपला जीव गमवावा लागला. वस्तीच्या लोकांनी आनंदची हत्या केलेल्या आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.आनंदवर असलेल्या प्रेमापोटी गुजरवाडी मित्र मंडळाचे कार्यकर्ते व नागरिक दु:खी आहे. त्यांनी होर्डींग, बॅनर लावून आनंदला श्रद्धांजली दिली आहे.रितेशच्या बहिणीला अटक करण्याची मागणीगुरजवाडीच्या लोकांनी या हत्याकांडासाठी रितेशच्या बहिणीला दोषी ठरविले आहे. त्यांचे म्हणणे आहे की, हल्ल्यातून रितेशच्या हातातून चाकू सुटल्यामुळे आनंद जीव वाचवून तेथून पळाला. तो मंगेश निनावे याच्या घरात लपून बसला होता. रितेशच्या बहिणीने आनंद लपून बसल्याचे सांगितले. त्यामुळे रितेशने घरात शिरून परत आनंदवर हल्ला केला. वस्तीच्या लोकांनी कोतवाली पोलीस ठाणे गाठून रितेशच्या बहिणीला अटक करण्याची मागणी केली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMurderखून