शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
4
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
5
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
6
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
7
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
8
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
9
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
10
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
11
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
12
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
13
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
14
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
15
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
16
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
17
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
18
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
19
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
20
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."

मास्क गायब, गर्दी कायम ट्रॅव्हल्समध्ये संसर्गाचा प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 04:23 IST

भिवापूर : ‘अनलॉक’ची प्रक्रिया राबविताना शासनाने मास्क, सॅनिटायझर व फिजिकल डिस्टन्सिंगची नियमावली यापुढेही प्रत्येकाला पाळावीच लागेल, अशा सूचना केली. ...

भिवापूर : ‘अनलॉक’ची प्रक्रिया राबविताना शासनाने मास्क, सॅनिटायझर व फिजिकल डिस्टन्सिंगची नियमावली यापुढेही प्रत्येकाला पाळावीच लागेल, अशा सूचना केली. काही दिवस त्याचे पालनही झाले. आता मात्र ट्रॅव्हल्स व एसटीचा प्रवास करताना प्रवाशांच्या तोंडावरील मास्क गायब आणि फिजिकल डिस्टन्सिंग कुठाय? या प्रश्नाचे उत्तरच मिळत नाही. एका सीटवर कुठे दोन, तर कुठे तीन प्रवासी बसल्याचे चित्र आहे. खंडित झालेली कोरोना संसर्गाची साखळी फेब्रुवारी महिन्यात पुन्हा जुळत आहे. महानगरात दररोज पॉझिटिव्ह रुग्ण वाढत आहे. सद्य:स्थितीत तालुक्यात कोरोना नियंत्रणात असला तरी वेळीच सुरक्षिततेचे नियम न पाळल्यास तालुक्यात संसर्गजन्य परिस्थीत निर्माण होऊ शकते. मात्र खासगी प्रवासी ट्रॅव्हल्ससह महामंडळाच्या एसटी बसमध्ये प्रवास करताना संसर्गाला रोखणारी नियमावली अक्षरश: पायदळी तुडविल्या जात आहे. ५० ते ५५ प्रवासी क्षमता असलेल्या ट्रॅव्हल्समध्ये चक्क ७०वर प्रवासी आढळत आहे. त्यातही एखादाच प्रवासी मास्क घातलेला असतो. एका सीटवर दोन, तर कुठे तीन प्रवासी बसत असल्यामुळे फिजिकल डिस्टन्सिंगचा बोजवारा उडाला आहे. सॅनिटायझर तर शोधूनही सापडत नाही. त्यामुळे प्रवासी वाहतूक करणाऱ्या ट्रॅव्हल्समधून कोरोना संसर्गाची वाहतूक होत आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

नियम कोण पाळणार?

प्रथमत: प्रत्येकाने स्वत:सह इतरांची काळजी घेणे आवश्यक आहे. मात्र प्रवासी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतात. महत्त्वाचे म्हणजे सुरक्षेची तेवढीच जबाबदारी ट्रॅव्हल्समालक व चालकाची आहे. नफा कमविण्याच्या प्रयत्नात सुरक्षेची नियमावली त्यांच्याकडूनही पायदळी तुडविल्या जात आहे. त्यामुळे अशा प्रवासी वाहनांवर तत्काळ कारवाई करणे आवश्यक आहे.