शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात  झेंडू फुलला, भाव वाढला  : उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2020 20:11 IST

Marigold blooms , Nagpur News नवरात्रोत्सवात सप्तमी, अष्टमी, नवमीसह दसऱ्याला झेंडू आणि शेवंती फुलांना चांगली मागणी असते. सीताबर्डी येथील ठोक फूल बाजारात आवक कमी असल्याने दहा दिवसांपूर्वी २० रुपये किलो भावात मिळणारे झेंडू २०० रुपये आणि शेवंतीचे भाव ४०० रुपये किलोवर गेले आहेत.

ठळक मुद्दे नवरात्रोत्सव व दसऱ्यानिमित्त जास्त मागणी

लोकमत  न्यूज  नेटवर्क 

नागपूर : नवरात्रोत्सवात सप्तमी, अष्टमी, नवमीसह दसऱ्याला झेंडू आणि शेवंती फुलांना चांगली मागणी असते. सीताबर्डी येथील ठोक फूल बाजारात आवक कमी असल्याने दहा दिवसांपूर्वी २० रुपये किलो भावात मिळणारे झेंडू २०० रुपये आणि शेवंतीचे भाव ४०० रुपये किलोवर गेले आहेत. त्यामुळे उत्पादकांना दिलासा मिळाला आहे. भाव मिळाल्याने उत्पादक शेतकरी आनंदी आहेत.

कोरोना महामारीत नागपूर जिल्ह्यासह अन्य भागातील फूल उत्पादकांना विक्री बंद असल्याने फुले फेकून द्यावी लागली होती. कोरोनाचे संकट किती दिवस राहील, या भीतीने उत्पादकांनी लागवड कमी केली. लग्नसमारंभ नसल्याने शेतकऱ्यांनी सजावटीच्या फुलांवर भर न देताना पूजेच्या फुलांची लागवड केली. आता नवरात्रोत्सव आणि दसऱ्याला भाव मिळत असल्याने उत्पादक शेतकरी उत्साही आहेत.

ठोक फूल बाजार असोसिएशनचे अध्यक्ष जयंत रणनवरे म्हणाले, दहा दिवसापूर्वीच्या तुलनेत झेंडू आणि शेवंती फुलाला भाव मिळत आहे. यंदा नवरात्रोत्सवात हव्या त्या प्रमाणात आवक झाली नाही. त्यामुळे भाव वाढले आहेत. शनिवारी अष्टमी आणि नवमी एकाच दिवशी आली आहे. त्यामुळे कोरोनाची भीती न बाळगता लोकांनी बाजारात गर्दी केली. रणनवरे म्हणाले, सीताबर्डी येथील मुख्य ठोक बाजारात गुरुवारपासून दररोज दीड टनाच्या ५० ते ६० गाड्यांमध्ये फूल येत आहेत. शनिवारी सकाळी ७० ते ८० रुपये किलो भाव होते. मागणी वाढताच भाव १५० रुपयांवर गेले. अखेर २०० रुपये किलो भावाने विक्री झाली. झेंडू तीन प्रकारात येतो. झेंडू मोठा हायब्रीड, कोलकाता कुडी, छोटा नवरंग आदींचे भाव १५० ते २०० रुपयांदरम्यान होते. याशिवाय पांढऱ्या शेवंतीला शनिवारी सकाळी २०० रुपये भाव होते. चांगल्या प्रतीच्या फुलाचे भाव ४०० रुपये किलोवर पोहोचले होते. रविवारी दसऱ्याला भाववाढीची शक्यता आहे.

अवकाळी पावसाने हैदराबाद, बेंगळुरू, औरंगाबाद, कोल्हापूर आणि नागपूर जिल्ह्यातील फुले खराब झाली. सध्या बाजारात नागपूर जिल्हा, हिंगोली, नांदेड, अमरावती, अकोला येथील झेंडू व शेवंती बाजारात विक्रीसाठी येत आहेत. दरदिवशी ५० ते ६० गाड्यांची (प्रत्येक गाडी दीड टन) आवक आहे. तीन दिवसात जास्त उलाढाल झाली. शेतकऱ्यांनी दसऱ्यानंतर दिवाळीची वाट पाहावी लागेल. मधल्या काळात किमती कमी होतील, त्यानंतर दिवाळीत पुन्हा किमती वाढतील, असे रणनवरे यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :DasaraदसराMarketबाजार