शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
3
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
4
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
5
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
7
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
8
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
9
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
10
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
11
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
12
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
13
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
14
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
15
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
16
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
17
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
18
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
19
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
20
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!

नागपुरात  झेंडू फुलला, भाव वाढला  : उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2020 20:11 IST

Marigold blooms , Nagpur News नवरात्रोत्सवात सप्तमी, अष्टमी, नवमीसह दसऱ्याला झेंडू आणि शेवंती फुलांना चांगली मागणी असते. सीताबर्डी येथील ठोक फूल बाजारात आवक कमी असल्याने दहा दिवसांपूर्वी २० रुपये किलो भावात मिळणारे झेंडू २०० रुपये आणि शेवंतीचे भाव ४०० रुपये किलोवर गेले आहेत.

ठळक मुद्दे नवरात्रोत्सव व दसऱ्यानिमित्त जास्त मागणी

लोकमत  न्यूज  नेटवर्क 

नागपूर : नवरात्रोत्सवात सप्तमी, अष्टमी, नवमीसह दसऱ्याला झेंडू आणि शेवंती फुलांना चांगली मागणी असते. सीताबर्डी येथील ठोक फूल बाजारात आवक कमी असल्याने दहा दिवसांपूर्वी २० रुपये किलो भावात मिळणारे झेंडू २०० रुपये आणि शेवंतीचे भाव ४०० रुपये किलोवर गेले आहेत. त्यामुळे उत्पादकांना दिलासा मिळाला आहे. भाव मिळाल्याने उत्पादक शेतकरी आनंदी आहेत.

कोरोना महामारीत नागपूर जिल्ह्यासह अन्य भागातील फूल उत्पादकांना विक्री बंद असल्याने फुले फेकून द्यावी लागली होती. कोरोनाचे संकट किती दिवस राहील, या भीतीने उत्पादकांनी लागवड कमी केली. लग्नसमारंभ नसल्याने शेतकऱ्यांनी सजावटीच्या फुलांवर भर न देताना पूजेच्या फुलांची लागवड केली. आता नवरात्रोत्सव आणि दसऱ्याला भाव मिळत असल्याने उत्पादक शेतकरी उत्साही आहेत.

ठोक फूल बाजार असोसिएशनचे अध्यक्ष जयंत रणनवरे म्हणाले, दहा दिवसापूर्वीच्या तुलनेत झेंडू आणि शेवंती फुलाला भाव मिळत आहे. यंदा नवरात्रोत्सवात हव्या त्या प्रमाणात आवक झाली नाही. त्यामुळे भाव वाढले आहेत. शनिवारी अष्टमी आणि नवमी एकाच दिवशी आली आहे. त्यामुळे कोरोनाची भीती न बाळगता लोकांनी बाजारात गर्दी केली. रणनवरे म्हणाले, सीताबर्डी येथील मुख्य ठोक बाजारात गुरुवारपासून दररोज दीड टनाच्या ५० ते ६० गाड्यांमध्ये फूल येत आहेत. शनिवारी सकाळी ७० ते ८० रुपये किलो भाव होते. मागणी वाढताच भाव १५० रुपयांवर गेले. अखेर २०० रुपये किलो भावाने विक्री झाली. झेंडू तीन प्रकारात येतो. झेंडू मोठा हायब्रीड, कोलकाता कुडी, छोटा नवरंग आदींचे भाव १५० ते २०० रुपयांदरम्यान होते. याशिवाय पांढऱ्या शेवंतीला शनिवारी सकाळी २०० रुपये भाव होते. चांगल्या प्रतीच्या फुलाचे भाव ४०० रुपये किलोवर पोहोचले होते. रविवारी दसऱ्याला भाववाढीची शक्यता आहे.

अवकाळी पावसाने हैदराबाद, बेंगळुरू, औरंगाबाद, कोल्हापूर आणि नागपूर जिल्ह्यातील फुले खराब झाली. सध्या बाजारात नागपूर जिल्हा, हिंगोली, नांदेड, अमरावती, अकोला येथील झेंडू व शेवंती बाजारात विक्रीसाठी येत आहेत. दरदिवशी ५० ते ६० गाड्यांची (प्रत्येक गाडी दीड टन) आवक आहे. तीन दिवसात जास्त उलाढाल झाली. शेतकऱ्यांनी दसऱ्यानंतर दिवाळीची वाट पाहावी लागेल. मधल्या काळात किमती कमी होतील, त्यानंतर दिवाळीत पुन्हा किमती वाढतील, असे रणनवरे यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :DasaraदसराMarketबाजार