शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
4
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
5
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
6
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
7
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
8
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
9
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
10
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
11
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
13
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
14
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
15
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
16
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
17
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
18
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
20
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग

नागपुरात  झेंडू फुलला, भाव वाढला  : उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2020 20:11 IST

Marigold blooms , Nagpur News नवरात्रोत्सवात सप्तमी, अष्टमी, नवमीसह दसऱ्याला झेंडू आणि शेवंती फुलांना चांगली मागणी असते. सीताबर्डी येथील ठोक फूल बाजारात आवक कमी असल्याने दहा दिवसांपूर्वी २० रुपये किलो भावात मिळणारे झेंडू २०० रुपये आणि शेवंतीचे भाव ४०० रुपये किलोवर गेले आहेत.

ठळक मुद्दे नवरात्रोत्सव व दसऱ्यानिमित्त जास्त मागणी

लोकमत  न्यूज  नेटवर्क 

नागपूर : नवरात्रोत्सवात सप्तमी, अष्टमी, नवमीसह दसऱ्याला झेंडू आणि शेवंती फुलांना चांगली मागणी असते. सीताबर्डी येथील ठोक फूल बाजारात आवक कमी असल्याने दहा दिवसांपूर्वी २० रुपये किलो भावात मिळणारे झेंडू २०० रुपये आणि शेवंतीचे भाव ४०० रुपये किलोवर गेले आहेत. त्यामुळे उत्पादकांना दिलासा मिळाला आहे. भाव मिळाल्याने उत्पादक शेतकरी आनंदी आहेत.

कोरोना महामारीत नागपूर जिल्ह्यासह अन्य भागातील फूल उत्पादकांना विक्री बंद असल्याने फुले फेकून द्यावी लागली होती. कोरोनाचे संकट किती दिवस राहील, या भीतीने उत्पादकांनी लागवड कमी केली. लग्नसमारंभ नसल्याने शेतकऱ्यांनी सजावटीच्या फुलांवर भर न देताना पूजेच्या फुलांची लागवड केली. आता नवरात्रोत्सव आणि दसऱ्याला भाव मिळत असल्याने उत्पादक शेतकरी उत्साही आहेत.

ठोक फूल बाजार असोसिएशनचे अध्यक्ष जयंत रणनवरे म्हणाले, दहा दिवसापूर्वीच्या तुलनेत झेंडू आणि शेवंती फुलाला भाव मिळत आहे. यंदा नवरात्रोत्सवात हव्या त्या प्रमाणात आवक झाली नाही. त्यामुळे भाव वाढले आहेत. शनिवारी अष्टमी आणि नवमी एकाच दिवशी आली आहे. त्यामुळे कोरोनाची भीती न बाळगता लोकांनी बाजारात गर्दी केली. रणनवरे म्हणाले, सीताबर्डी येथील मुख्य ठोक बाजारात गुरुवारपासून दररोज दीड टनाच्या ५० ते ६० गाड्यांमध्ये फूल येत आहेत. शनिवारी सकाळी ७० ते ८० रुपये किलो भाव होते. मागणी वाढताच भाव १५० रुपयांवर गेले. अखेर २०० रुपये किलो भावाने विक्री झाली. झेंडू तीन प्रकारात येतो. झेंडू मोठा हायब्रीड, कोलकाता कुडी, छोटा नवरंग आदींचे भाव १५० ते २०० रुपयांदरम्यान होते. याशिवाय पांढऱ्या शेवंतीला शनिवारी सकाळी २०० रुपये भाव होते. चांगल्या प्रतीच्या फुलाचे भाव ४०० रुपये किलोवर पोहोचले होते. रविवारी दसऱ्याला भाववाढीची शक्यता आहे.

अवकाळी पावसाने हैदराबाद, बेंगळुरू, औरंगाबाद, कोल्हापूर आणि नागपूर जिल्ह्यातील फुले खराब झाली. सध्या बाजारात नागपूर जिल्हा, हिंगोली, नांदेड, अमरावती, अकोला येथील झेंडू व शेवंती बाजारात विक्रीसाठी येत आहेत. दरदिवशी ५० ते ६० गाड्यांची (प्रत्येक गाडी दीड टन) आवक आहे. तीन दिवसात जास्त उलाढाल झाली. शेतकऱ्यांनी दसऱ्यानंतर दिवाळीची वाट पाहावी लागेल. मधल्या काळात किमती कमी होतील, त्यानंतर दिवाळीत पुन्हा किमती वाढतील, असे रणनवरे यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :DasaraदसराMarketबाजार