शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

मराठी भाषेच्या संवर्धनाची जबाबदारी मराठी माणसाचीच

By admin | Updated: February 28, 2017 02:11 IST

जागतिकीकरणात नवीन तंत्रज्ञानामुळे मराठी भाषेबरोबरच अन्य भाषांपुढेही मोठी आव्हाने उभी ठाकली आहेत.

मराठी भाषा गौरव दिन : माहिती केंद्राच्या कार्यक्रमात वक्त्यांचे प्रतिपादन नागपूर : जागतिकीकरणात नवीन तंत्रज्ञानामुळे मराठी भाषेबरोबरच अन्य भाषांपुढेही मोठी आव्हाने उभी ठाकली आहेत. अशा परिस्थितीत मराठी भाषेचे संवर्धन करण्याची जबाबदारी मराठी माणसांचीच आहे. मराठी भाषा समृद्ध करण्यासाठी सर्वांनीच प्रयत्न करू या, असे आवाहन मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात करण्यात आले.विभागीय माहिती केंद्र व मराठी भाषा विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी विभागीय माहिती केंद्राच्या सभागृहात कविवर्य वि.वा. शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करण्यात आला. यावेळी उपजिल्हाधिकारी मनीषा जायभाय, पत्रकार शैलेश पांडे, विभागीय सहायक भाषा संचालक हरेश सूर्यवंशी जिल्हा माहिती अधिकारी अनिल गडेकर, सहायक संचालक जगन्नाथ पाटील उपस्थित होते.यावेळी उपजिल्हाधिकारी मनीषा जायभाये म्हणाल्या, आपले मत, आपले विचार दुसऱ्या व्यक्तीपर्यंत पोहोचविण्याचे सशक्त माध्यम म्हणजे भाषा. कवी वि.वा. शिरवाडकरांचा जन्मदिवस मराठी गौरव दिन म्हणून साजरा करतो. हे ऋण फेडण्यासारखेच आहे. आपल्या संवादाची भाषा मराठी आहे. तिचा अभिमान बाळगला पाहिजे. तंत्रज्ञानाच्या युगात इंग्रजी भाषेचे महत्त्व वाढत असले तरी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना मराठी भाषेची निवड करू शकता. हरेश सूर्यवंशी म्हणाले, मराठी भाषा विभागातर्फे पर्यायी शब्द उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासन शब्दकोषासह विविध मराठीतील शब्दकोष विभागातर्फे प्रकाशित करण्यात आले आहे. इंग्रजीला पर्यायी शब्द उपलब्ध होत असल्यामुळे मराठी भाषा ही समृद्ध होण्यास मदत होत आहे. दैनंदिन व्यवहारात मराठीचा वापर करण्याची आवश्यकता आहे.अनिल गडेकर म्हणाले, सोशल मीडिया तसेच नवीन माध्यमांमध्ये इंग्रजीबरोबरच मराठीचा वापर करण्याची आवश्यकता आहे. मराठी भाषा ही अत्यंत समृद्ध भाषा असली तरी आज मराठीचा वापर फार कमी प्रमाणात होत आहे. भाषा ही व्यक्तिमत्त्वाला वळण देत असल्याने मायबोलीचा अभिमान सर्वांनीच बाळगायला हवा, असेही त्यांनी स्पष्ट केले. पत्रकार शैलेश पांडे म्हणाले, मराठी भाषा ही संस्कृतीची वाहक आहे. ती जेवढी समृद्ध तेवढीच संस्कृती अधिक समृद्ध बनत जाते. इंग्रजी येणं म्हणजे ज्ञानी असल्याचं लक्षण आहे, असे नाही. भाषा संवादाचे प्रभावी माध्यम आहे. भाषेच्या बळावरच माणूस जीवनात कितीही मोठा पल्ला गाठू शकतो, असेही ते म्हणाले.(प्रतिनिधी)