शहरं
Join us  
Trending Stories
1
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
2
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
3
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
4
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
5
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
6
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
7
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
8
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
9
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
10
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
11
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
12
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
13
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
14
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
15
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
16
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
17
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
18
Thane Fire: ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
19
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
20
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
Daily Top 2Weekly Top 5

मराठी भाषेच्या संवर्धनाची जबाबदारी मराठी माणसाचीच

By admin | Updated: February 28, 2017 02:11 IST

जागतिकीकरणात नवीन तंत्रज्ञानामुळे मराठी भाषेबरोबरच अन्य भाषांपुढेही मोठी आव्हाने उभी ठाकली आहेत.

मराठी भाषा गौरव दिन : माहिती केंद्राच्या कार्यक्रमात वक्त्यांचे प्रतिपादन नागपूर : जागतिकीकरणात नवीन तंत्रज्ञानामुळे मराठी भाषेबरोबरच अन्य भाषांपुढेही मोठी आव्हाने उभी ठाकली आहेत. अशा परिस्थितीत मराठी भाषेचे संवर्धन करण्याची जबाबदारी मराठी माणसांचीच आहे. मराठी भाषा समृद्ध करण्यासाठी सर्वांनीच प्रयत्न करू या, असे आवाहन मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात करण्यात आले.विभागीय माहिती केंद्र व मराठी भाषा विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी विभागीय माहिती केंद्राच्या सभागृहात कविवर्य वि.वा. शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करण्यात आला. यावेळी उपजिल्हाधिकारी मनीषा जायभाय, पत्रकार शैलेश पांडे, विभागीय सहायक भाषा संचालक हरेश सूर्यवंशी जिल्हा माहिती अधिकारी अनिल गडेकर, सहायक संचालक जगन्नाथ पाटील उपस्थित होते.यावेळी उपजिल्हाधिकारी मनीषा जायभाये म्हणाल्या, आपले मत, आपले विचार दुसऱ्या व्यक्तीपर्यंत पोहोचविण्याचे सशक्त माध्यम म्हणजे भाषा. कवी वि.वा. शिरवाडकरांचा जन्मदिवस मराठी गौरव दिन म्हणून साजरा करतो. हे ऋण फेडण्यासारखेच आहे. आपल्या संवादाची भाषा मराठी आहे. तिचा अभिमान बाळगला पाहिजे. तंत्रज्ञानाच्या युगात इंग्रजी भाषेचे महत्त्व वाढत असले तरी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना मराठी भाषेची निवड करू शकता. हरेश सूर्यवंशी म्हणाले, मराठी भाषा विभागातर्फे पर्यायी शब्द उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासन शब्दकोषासह विविध मराठीतील शब्दकोष विभागातर्फे प्रकाशित करण्यात आले आहे. इंग्रजीला पर्यायी शब्द उपलब्ध होत असल्यामुळे मराठी भाषा ही समृद्ध होण्यास मदत होत आहे. दैनंदिन व्यवहारात मराठीचा वापर करण्याची आवश्यकता आहे.अनिल गडेकर म्हणाले, सोशल मीडिया तसेच नवीन माध्यमांमध्ये इंग्रजीबरोबरच मराठीचा वापर करण्याची आवश्यकता आहे. मराठी भाषा ही अत्यंत समृद्ध भाषा असली तरी आज मराठीचा वापर फार कमी प्रमाणात होत आहे. भाषा ही व्यक्तिमत्त्वाला वळण देत असल्याने मायबोलीचा अभिमान सर्वांनीच बाळगायला हवा, असेही त्यांनी स्पष्ट केले. पत्रकार शैलेश पांडे म्हणाले, मराठी भाषा ही संस्कृतीची वाहक आहे. ती जेवढी समृद्ध तेवढीच संस्कृती अधिक समृद्ध बनत जाते. इंग्रजी येणं म्हणजे ज्ञानी असल्याचं लक्षण आहे, असे नाही. भाषा संवादाचे प्रभावी माध्यम आहे. भाषेच्या बळावरच माणूस जीवनात कितीही मोठा पल्ला गाठू शकतो, असेही ते म्हणाले.(प्रतिनिधी)