शहरं
Join us  
Trending Stories
1
'BJP पटेलांच्या वारशाचा अपमान करत आहे; RSS वर पुन्हा बंदी घाला', खरगेंचा सरकारवर हल्लाबोल
2
ऑस्ट्रेलियानं ८० चेंडूत संपवला भारताविरुद्धचा सामना! 'पॉवर प्ले'मध्ये हेजलवूडचा जलवा, अभिषेक शर्मा एकटाच लढला!
3
'मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा…’, आजारी संजय राऊत यांच्यासाठी सुषमा अंधारे यांची खास पोस्ट
4
Mumbai Hostage Case: ‘त्याने फटाके वाजवले आणि बाहेर गोळीबार सुरू असल्याचे सांगितले’; रोहित आर्या प्रकरणी प्रत्यक्षदर्शी वृद्ध महिलेचा खुलासा
5
ट्रम्प यांनी अण्वस्त्र टेस्टिंगचा आदेश देताच रशियाची थेट प्रतिक्रिया, दिला अल्टीमेटम!
6
मित्रांचा आग्रह जीवावर बेतला, पार्टीत बॅक टूक बॅक पाजले पेग; २६ वर्षीय युवकाचा संशयास्पद मृत्यू
7
पवईतील आरोपी रोहित आर्यला दीपक केसरकरांनी इतकी मोठी रक्कम का दिली?; सामाजिक कार्यकर्त्यांचा सवाल
8
मुंबई विमानतळावर प्रवाशाच्या बॅगेत सापडली दोन सिल्वर गिबन; कस्टम अधिकारीही झाले अवाक्
9
वाघ अगदी जवळून पाहायचाय? मग, भारतातील 'या' ६ व्याघ्र प्रकल्पांना नक्की भेट द्या!
10
गोळीबार, आग आणि धमकीचं पत्र, फरार कैद्याने आणले पोलिसांच्या नाकी नऊ, नेमकं प्रकरण काय?
11
बाजारात सलग दुसऱ्या दिवशी मोठी घसरण! गुंतवणूकदारांचे २ लाख कोटी बुडाले; सर्वात जास्त कुठे?
12
Extra Marital Affairs:मुलाचं लग्न ठरलं आणि होणाऱ्या सूनेच्या बापावरच जडला महिलेचा जीव; लग्नाआधीच दोघे गेले पळून
13
Rain Alert: कमी दाबाचे क्षेत्र कायम, या राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; महाराष्ट्रात कुठे-कुठे पाऊस पडणार?
14
शेतकऱ्यांना न झुलवता तात्काळ कर्जमाफी करा; उद्धव ठाकरेंची राज्य सरकारकडे मागणी
15
धोनीची गुंतवणूक असलेली कंपनी बाजारात! ६ नोव्हेंबरला उघडणार IPO; प्राइस बँडसह तपशील जाणून घ्या
16
खात्यात ८ लाख जमा केले अन् प्राप्तिकर विभागाची 'टॅक्स' नोटीस; ६ वर्षांच्या लढ्यानंतर करदात्याचा विजय!
17
Viral Video: हत्तीला पाहून सिंह मंडळींची 'हवा टाइट'... झाडाखाली बसले असताना काय घडलं, पाहा
18
थेट मंत्र्यांच्या ताफ्यालाच पाठलाग करून अडवले, वादावादी, कारची तोडफोड करण्याचा प्रयत्न, कारण काय?
19
Powai Hostage: रोहित आर्या प्रकरणातील नवी माहिती, मुलांसोबत ऑडिशनसाठी गेलेले पालक म्हणाले...
20
Abhishek Sharma Record Breaking Fifty : जिथं सगळ्यांनी नांगी टाकली, तिथं अभिषेक शर्माची विक्रमी खेळी

मराठीची चळवळ राजकीय दृष्टीने अदखलपात्र : दीपक पवारांची खंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2019 23:07 IST

भाषेसाठी सरकारकडे होणारा पत्रव्यवहार डस्टबीन भरण्याचा प्रकार झाला आहे. त्यामुळे मराठीची चळवळ राजकीय दृष्टीने अदखलपात्रच आहे, अशी खंत मराठी अभ्यास केंद्राचे अध्यक्ष व राजकीय विश्लेषक डॉ. दीपक पवार यांनी व्यक्त केली.

ठळक मुद्देसाहित्य संस्थाही भाषाविषयी उदासीन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मराठी लोकांच्या संघटनांमध्ये ऊर्जा घालविण्यास कुणी तयार नाही. मराठी भाषेसाठी रस्त्यावर माणसे येतील असे ग्लॅमर, वलय आमच्या चळवळीत नाही, त्यामुळे माणसे रस्त्यावर येतील अशी स्थितीही नाही, तशी सक्रियताही नाही. माध्यमांना हवे असलेले व्हिज्युअल अपील मराठीच्या सनदशीर आंदोलनात नसल्याने तेही याकडे गांभीर्याने पाहत नाही. अशा परिस्थितीमध्ये भाषेसाठी सरकारकडे होणारा पत्रव्यवहार डस्टबीन भरण्याचा प्रकार झाला आहे. त्यामुळे मराठीची चळवळ राजकीय दृष्टीने अदखलपात्रच आहे, अशी खंत मराठी अभ्यास केंद्राचे अध्यक्ष व राजकीय विश्लेषक डॉ. दीपक पवार यांनी व्यक्त केली.महाराष्ट्र सांस्कृतिक आघाडी व राजाराम वाचनालय, धरमपेठ यांच्यावतीने ‘मराठी भाषा चळवळीचे वर्तमान आणि भविष्य’ या विषयावर डॉ. पवार यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले. अध्यक्षस्थानी सांस्कृतिक आघाडीचे संयोजक व अ.भा. मराठी साहित्य महामंडळाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी हे होते. डॉ. पवार यांनी महाराष्ट्राच्या स्थापनेपासून ते भाषेच्या नावाने शिवसेनेची स्थापना, राजकीय पक्षांची भूमिका आणि वर्तमानातील सोशल मीडियावरील सक्रियता, यावर भाष्य केले. मराठी चळवळीच्या नावाने राजकीय पक्ष उभा राहू शकतो, हे शिवसेनेवरून दिसून आले. पण त्यांनीही शहरी मध्यमवर्गीय व नोकरदारांवर लक्ष केंद्रित केले. आता तर मराठीचा मुद्दा त्यांनी केव्हाच सोडला असून, त्यांची हिंदुत्वाकडे वाटचाल सुरू झाली आहे. त्यांच्यापासून तयार झालेल्या मनसेचीही भूमिका हिंदुत्व वगळता फार वेगळी नाही. दोन्ही पक्ष मराठी माणसांवर भर देणारे आहेत, मराठी भाषेवर नाही. शिवसेनेच्या धडाक्यात डाव्यांनी मराठीच्या मुद्याकडे पूर्ण दुर्लक्ष केले. काँग्रेस-राष्ट्रवादीने मराठीसाठी महत्त्वाचे निर्णय घेतले, पण ते लावून धरले नाही. वर्तमान सरकारची मराठीसाठी काही करण्याची तयारी नाही. एकूणच २००९ पेक्षा २०१९ ची परिस्थिती विदारक असल्याची नोंद डॉ. पवार यांनी नमूद केली.त्यांनी मराठी साहित्य संस्थांवरही खरपूस टीका केली. साहित्य संस्थांना साहित्याचे प्रश्न भाषेचे वाटतात. येथे तरुणांना स्थान मिळत नाही. राजकीय संस्थांची प्रशासकीय माणसे हलतात, पण या संस्थांमधील माणसे वर्षानुवर्षे ठाण मांडून बसलेली असतात. साहित्य संमेलनात गंभीर प्रश्नांवर चर्चा होत नाही. सत्तेला अपेक्षित गोष्टी करण्यावरच भर अधिक असतो. अशा साहित्य संस्थांकडून भाषाविषयक जग बदलेल, हा भाबडा समज आहे.दुसरीकडे सध्याचे ऑनलाईन जग हे आभासी आहे. झेंडा पकडून फोटो टाकणारा स्वत:ला नेता म्हणतो. मग हॅशटॅगची चळवळ सुरू होते व सोशल मीडियावर चालते. यातील एखादाच माणूस मराठीसाठी गंभीरपणे रस्त्यावर यायला तयार होतो. याला व्हर्चुअल किंवा त्रयस्थ सक्रियता म्हणतात. यात भाषेचा काय फायदा होतो, हे सांगणे कठीण आहे. संभ्रमावस्था त्यांच्यात असते आणि शांततेच्या काळात मराठीवादी भूमिका निवडणुकीत कधी धार्मिक होते, तेही कळत नाही. धर्मासमोर भाषेचे राजकारण चालत नाही. या माध्यमाचा साधन म्हणून उपयोग महत्त्वाचा असल्याचे मत त्यांनी मांडले. परिस्थिती उदासीन असली तरी महाराष्ट्रात मराठी भाषेची राजकीय स्थिती सुधारणे शक्य आहे. पोटापाण्याचा प्रश्न सुटलेल्यांनी एकत्रितपणे पूर्णवेळ सक्रियपणे २० वर्षे कार्य केले तरच मराठी राजकीय केंद्रस्थानी येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

टॅग्स :marathiमराठी