शहरं
Join us  
Trending Stories
1
कॅचच्या निर्णयावरून भारतीय खेळाडूंचा अंपायरशी वाद; पाकिस्तानकडून वैभव सूर्यवंशीच्या संघाचा पराभव
2
दिल्ली ब्लास्ट : रोहतकची डॉक्टर प्रियंका शर्मा अनंतनागमधून ताब्यात, कुटुंबीयांनी काय सांगितंल?
3
IND A vs PAK A : भारत-पाक मॅचमध्ये Relay Catch वरुन वाद; नेमकं काय घडलं? चिटिंग झाली की...
4
ब्रेकिंग! मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईचा गॅस पुरवठा खंडित; पाईपलाईनचे मोठे नुकसान, घरगुती गॅस बंद, CNG स्टेशनवर तुटवडा
5
सैन्यभरतीसाठी गेलेल्या तरुणांच्या मोटरसायकलला उसाच्या ट्रकची धडक; दोघांचाही जागीच मृत्यू
6
भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज मॅच! वैभव सुर्यवंशीचा संघ ढेपाळला; एका मागोमाग एक १० विकेट, झालेत इतकेच रन्स...
7
मोठी बातमी! लाल किल्ला स्फोटाची जबाबदारी टीआरएफने स्वीकारली; 'पहलगाम' हल्ल्याशी जोडले स्फोटाचे धागेदोरे
8
दिल्ली ब्लास्ट प्रकरणात NIA ची मोठी कारवाई, उमरच्या जवळच्या सहकाऱ्याला अटक; याच्याच नावावर होती i-20 कार
9
'विशेष मतदार यादी सुधारणा' प्रक्रियेच्या कामाच्या ताणामुळे बीएलओ अधिकाऱ्याने आयुष्य संपविले; कर्मचारी वर्गात संताप
10
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
11
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
12
पाकिस्तानच्या गोळीबार गमावला पाय; आता 'गौरी'ला मिळाले नवीन आयुष्य
13
दिल्ली ब्लास्टचे बांग्लादेश कनेक्शन उघड; मुर्शिदाबाद मार्गे भारतात आणली स्फोटके
14
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
15
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
16
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
17
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
18
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
19
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
20
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
Daily Top 2Weekly Top 5

मराठी साहित्याची मधली हजार वर्षे गायब - रवींद्र शोभणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2022 12:35 IST

महानुभाव साहित्य संशोधन संमेलनाचा समारोप

नागपूर : गाथा सप्तशंती ते महानुभाव साहित्य, असा मधला हजार वर्षाचा 'मराठीसाहित्यांचा प्रवास गायब असून त्या काळातील मराठीची लिखित परंपरा हातीच लागत नसल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक व विदर्भ साहित्य संघाचे कार्याध्यक्ष डॉ. रवींद्र शोभणे यांनी येथे केले.

श्री चक्रधर स्वामींच्या अष्टशताब्दी वर्षानिमित्त विदर्भ संशोधन मंडळाच्या वतीने वनामती येथे आयोजित द्वि दिवसीय महानुभाव साहित्य संशोधन संमेलनाचा समारोप बुधवारी करण्यात आला. त्यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी व्यासपीठावर संमेलनाध्यक्ष. डॉ. अविनाश मंडळाचे अध्यक्ष डॉ. मदन कुळकर्णी, कार्यवाह डॉ. राजेंद्र वाटाणे आणि प्राचार्या डॉ. शरयू तायवाडे उपस्थित होते.

मराठी प्रवाहाच्या मुळ स्त्रोताचे बदललेल्या परिस्थितीचे मूल्यमापन करण्याची संधी महानुभाव साहित्य संमेलनातून मिळाली आहे. सुमारे दोन हजार वर्षांपूर्वी म्हणजेच सातवाहन काळापासूनच मराठीचा वावर होता. गाथा सप्तशतीमुळे ते सिद्ध ही होते. त्यानंतर हजार वर्षानंतर थेट महानुभाव साहित्य आढळते.

या काळातील मराठीचा प्रवास सापडत नाही. संत ज्ञानेश्वर, संत तुकारामांचे साहित्यही मौखिक होते आणि मग ते लिहिले गेले. ज्ञानेश्वरी प्राकृतात असली तरी तेव्हाही ती सर्वसामान्यांसाठी कठीण होती. महानुभाव परंपरेतील साहित्य हे सर्वसामान्यांना कळणारे आणि त्यांच्या जगण्याशी संबंधित विचार मांडणारे होते, असे प्रतिपादन डॉ. रवींद्र शोभणे यांनी यावेळी केले.

डॉ. अविनाश आवलगावकर व डॉ. मदन कुळकर्णी यांनीही यावेळी आपले विचार मांडले. संचालन डॉ. राखी जाधव यांनी केले तर डॉ. राजेंद्र वाटाणे यांनी आभार मानले.

टॅग्स :literatureसाहित्यmarathiमराठीnagpurनागपूर