शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
2
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
3
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
4
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
5
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
6
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
7
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
8
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
9
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
10
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
11
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
12
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
13
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
14
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
15
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
16
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
17
कुंडमळा येथे क्षणात कोसळला पूल..! रांजणखळग्यांमुळे शोध मोहिमेत अडथळे
18
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
19
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
20
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर

मराठी साहित्याची मधली हजार वर्षे गायब - रवींद्र शोभणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2022 12:35 IST

महानुभाव साहित्य संशोधन संमेलनाचा समारोप

नागपूर : गाथा सप्तशंती ते महानुभाव साहित्य, असा मधला हजार वर्षाचा 'मराठीसाहित्यांचा प्रवास गायब असून त्या काळातील मराठीची लिखित परंपरा हातीच लागत नसल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक व विदर्भ साहित्य संघाचे कार्याध्यक्ष डॉ. रवींद्र शोभणे यांनी येथे केले.

श्री चक्रधर स्वामींच्या अष्टशताब्दी वर्षानिमित्त विदर्भ संशोधन मंडळाच्या वतीने वनामती येथे आयोजित द्वि दिवसीय महानुभाव साहित्य संशोधन संमेलनाचा समारोप बुधवारी करण्यात आला. त्यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी व्यासपीठावर संमेलनाध्यक्ष. डॉ. अविनाश मंडळाचे अध्यक्ष डॉ. मदन कुळकर्णी, कार्यवाह डॉ. राजेंद्र वाटाणे आणि प्राचार्या डॉ. शरयू तायवाडे उपस्थित होते.

मराठी प्रवाहाच्या मुळ स्त्रोताचे बदललेल्या परिस्थितीचे मूल्यमापन करण्याची संधी महानुभाव साहित्य संमेलनातून मिळाली आहे. सुमारे दोन हजार वर्षांपूर्वी म्हणजेच सातवाहन काळापासूनच मराठीचा वावर होता. गाथा सप्तशतीमुळे ते सिद्ध ही होते. त्यानंतर हजार वर्षानंतर थेट महानुभाव साहित्य आढळते.

या काळातील मराठीचा प्रवास सापडत नाही. संत ज्ञानेश्वर, संत तुकारामांचे साहित्यही मौखिक होते आणि मग ते लिहिले गेले. ज्ञानेश्वरी प्राकृतात असली तरी तेव्हाही ती सर्वसामान्यांसाठी कठीण होती. महानुभाव परंपरेतील साहित्य हे सर्वसामान्यांना कळणारे आणि त्यांच्या जगण्याशी संबंधित विचार मांडणारे होते, असे प्रतिपादन डॉ. रवींद्र शोभणे यांनी यावेळी केले.

डॉ. अविनाश आवलगावकर व डॉ. मदन कुळकर्णी यांनीही यावेळी आपले विचार मांडले. संचालन डॉ. राखी जाधव यांनी केले तर डॉ. राजेंद्र वाटाणे यांनी आभार मानले.

टॅग्स :literatureसाहित्यmarathiमराठीnagpurनागपूर