शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
4
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
5
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
6
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
7
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
8
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
9
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
10
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
11
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
12
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
13
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
14
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
15
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
16
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
17
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
18
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
19
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
20
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय

मराठी साहित्याची मधली हजार वर्षे गायब - रवींद्र शोभणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2022 12:35 IST

महानुभाव साहित्य संशोधन संमेलनाचा समारोप

नागपूर : गाथा सप्तशंती ते महानुभाव साहित्य, असा मधला हजार वर्षाचा 'मराठीसाहित्यांचा प्रवास गायब असून त्या काळातील मराठीची लिखित परंपरा हातीच लागत नसल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक व विदर्भ साहित्य संघाचे कार्याध्यक्ष डॉ. रवींद्र शोभणे यांनी येथे केले.

श्री चक्रधर स्वामींच्या अष्टशताब्दी वर्षानिमित्त विदर्भ संशोधन मंडळाच्या वतीने वनामती येथे आयोजित द्वि दिवसीय महानुभाव साहित्य संशोधन संमेलनाचा समारोप बुधवारी करण्यात आला. त्यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी व्यासपीठावर संमेलनाध्यक्ष. डॉ. अविनाश मंडळाचे अध्यक्ष डॉ. मदन कुळकर्णी, कार्यवाह डॉ. राजेंद्र वाटाणे आणि प्राचार्या डॉ. शरयू तायवाडे उपस्थित होते.

मराठी प्रवाहाच्या मुळ स्त्रोताचे बदललेल्या परिस्थितीचे मूल्यमापन करण्याची संधी महानुभाव साहित्य संमेलनातून मिळाली आहे. सुमारे दोन हजार वर्षांपूर्वी म्हणजेच सातवाहन काळापासूनच मराठीचा वावर होता. गाथा सप्तशतीमुळे ते सिद्ध ही होते. त्यानंतर हजार वर्षानंतर थेट महानुभाव साहित्य आढळते.

या काळातील मराठीचा प्रवास सापडत नाही. संत ज्ञानेश्वर, संत तुकारामांचे साहित्यही मौखिक होते आणि मग ते लिहिले गेले. ज्ञानेश्वरी प्राकृतात असली तरी तेव्हाही ती सर्वसामान्यांसाठी कठीण होती. महानुभाव परंपरेतील साहित्य हे सर्वसामान्यांना कळणारे आणि त्यांच्या जगण्याशी संबंधित विचार मांडणारे होते, असे प्रतिपादन डॉ. रवींद्र शोभणे यांनी यावेळी केले.

डॉ. अविनाश आवलगावकर व डॉ. मदन कुळकर्णी यांनीही यावेळी आपले विचार मांडले. संचालन डॉ. राखी जाधव यांनी केले तर डॉ. राजेंद्र वाटाणे यांनी आभार मानले.

टॅग्स :literatureसाहित्यmarathiमराठीnagpurनागपूर