शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
3
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
4
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
5
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
6
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
7
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
8
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
9
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
10
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
11
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
12
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
13
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
14
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
15
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
16
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
17
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
18
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
19
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
20
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
Daily Top 2Weekly Top 5

पाश्चिमात्य प्रभावातून मराठी नाटक अधिक दर्जेदार : संयुक्ता थोरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2019 00:18 IST

जुन्या काळापासून मराठी रंगभूमीवर पाश्चिमात्य नाटकांचा प्रभाव राहिला आहे. १९६० ते ८० च्या दशकातील बहुतेक नाटक पाश्चात्त्याकडून घेतलेली आढळतात. मात्र ती घेताना भारतीय संस्कृतीनुसार लेखन शैली, कला आणि संवादात आवश्यक तो बदल करून प्रेक्षकांसमोर अधिक दर्जेदारपणे सादर केल्याचे मत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ ललित कला विभागाच्या डॉ. संयुक्ता थोरात यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देनाट्य परिषदेच्या नागपूर शाखेतर्फे मुक्तचर्चा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जुन्या काळापासून मराठी रंगभूमीवर पाश्चिमात्य नाटकांचा प्रभाव राहिला आहे. १९६० ते ८० च्या दशकातील बहुतेक नाटक पाश्चात्त्याकडून घेतलेली आढळतात. मात्र ती घेताना भारतीय संस्कृतीनुसार लेखन शैली, कला आणि संवादात आवश्यक तो बदल करून प्रेक्षकांसमोर अधिक दर्जेदारपणे सादर केल्याचे मत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ ललित कला विभागाच्या डॉ. संयुक्ता थोरात यांनी व्यक्त केले.जागतिक रंगभूमी दिनानिमित्त अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या नागपूर शाखेतर्फे ‘पाश्चिमात्य रंगभूमीचे बदलते प्रवाह आणि मराठी रंगभूमी’ या विषयावर राजाराम दीक्षित वाचनालय, धरमपेठ येथे मुक्तचर्चेचे आयोजन करण्यात आले. यावेळी वक्ता म्हणून डॉ. थोरात आणि प्रा. शिशिर वर्मा यांनी मनोगत मांडले. संकल्पना नागपूर शाखेचे अध्यक्ष सलीम शेख यांची होती. डॉ. संयुक्ता थोरात यांनी पाश्चात्त्य ‘डॉल्स हाऊस, घोस्ट’ व मराठीतील घराबाहेर, सत्वपरीक्षा अशा नाटकांचा उल्लेख करीत हा प्रभाव अधोरेखित केला. आधुनिक नाटकांचे जनक म्हणून ओळख असलेले हेन्रिक इबसन यांच्या नाटकांनी मराठी रंगभूमीला चांगलेच प्रभावित केले आहे. जुन्या नाटकांप्रमाणे लांबलचक संवाद न ठेवता परिस्थितीनुसार प्रेक्षकांची उत्कंठा वाढविण्याचे कौशल्य त्यांनी साधले होते. विरोध होऊनही स्त्रीस्वातंत्र्यासारखे नवीन विचार त्यांनी मांडले. याशिवाय रशियन नाटककार स्टॅनिसलेव्हिस्कीने दिलेले अभिनयाचे तंत्र आजही स्वीकारले जाते. शेक्सपियरने साऱ्या जगाला भुरळ घातली असताना मराठी रंगभूमी त्या प्रभावापासून दूर राहिली नाही, असे मनोगत त्यांनी मांडले.प्रा. शिशिर वर्मा यांनी १८५० पासून ऐतिहासिक परिस्थितीनुसार पाश्चात्त्य रंगभूमी आणि नाटके कशी बदलत गेली, यावर प्रकाश टाकला. आधी होणारे बदल हे संथ होते. पण यांत्रिकीकरणानंतर जगाच्या परिस्थितीत वेगवान बदल घडत गेले. पुढे साम्राज्यशाही, विविध देशांची आंतरिक स्पर्धा, पहिले व दुसरे महायुद्ध, निसर्गावर आक्रमण अशा गोष्टी झपाट्याने होत गेल्या व त्याचे पडसादरंगभूमीवरही पडले. कलेच्या क्षेत्रातही विज्ञान आणि भावनेचे द्वंद्व निर्माण झाले. धर्माच्या नावाने दाबल्या गेलेला स्त्रीस्वातंत्र्याचा विचार रंगभूमीतून बाहेर येऊ लागला. घडणाऱ्या परिस्थितीनुसार चांगले-वाईट बदल होत गेले, ज्याचा प्रभाव आजही बघायला मिळतो. हा इतिहास जाणून नाटकांची निर्मिती करण्याचे आवाहन प्रा. वर्मा यांनी केले. ज्येष्ठ नाटककार अनिल चणाखेकर, प्रा. सोपानदेव पिसे प्रामुख्याने उपस्थित होते. राजेश काळे यांनी आभार मानले.

 

टॅग्स :Natakनाटकmarathiमराठी