शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

पाश्चिमात्य प्रभावातून मराठी नाटक अधिक दर्जेदार : संयुक्ता थोरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2019 00:18 IST

जुन्या काळापासून मराठी रंगभूमीवर पाश्चिमात्य नाटकांचा प्रभाव राहिला आहे. १९६० ते ८० च्या दशकातील बहुतेक नाटक पाश्चात्त्याकडून घेतलेली आढळतात. मात्र ती घेताना भारतीय संस्कृतीनुसार लेखन शैली, कला आणि संवादात आवश्यक तो बदल करून प्रेक्षकांसमोर अधिक दर्जेदारपणे सादर केल्याचे मत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ ललित कला विभागाच्या डॉ. संयुक्ता थोरात यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देनाट्य परिषदेच्या नागपूर शाखेतर्फे मुक्तचर्चा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जुन्या काळापासून मराठी रंगभूमीवर पाश्चिमात्य नाटकांचा प्रभाव राहिला आहे. १९६० ते ८० च्या दशकातील बहुतेक नाटक पाश्चात्त्याकडून घेतलेली आढळतात. मात्र ती घेताना भारतीय संस्कृतीनुसार लेखन शैली, कला आणि संवादात आवश्यक तो बदल करून प्रेक्षकांसमोर अधिक दर्जेदारपणे सादर केल्याचे मत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ ललित कला विभागाच्या डॉ. संयुक्ता थोरात यांनी व्यक्त केले.जागतिक रंगभूमी दिनानिमित्त अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या नागपूर शाखेतर्फे ‘पाश्चिमात्य रंगभूमीचे बदलते प्रवाह आणि मराठी रंगभूमी’ या विषयावर राजाराम दीक्षित वाचनालय, धरमपेठ येथे मुक्तचर्चेचे आयोजन करण्यात आले. यावेळी वक्ता म्हणून डॉ. थोरात आणि प्रा. शिशिर वर्मा यांनी मनोगत मांडले. संकल्पना नागपूर शाखेचे अध्यक्ष सलीम शेख यांची होती. डॉ. संयुक्ता थोरात यांनी पाश्चात्त्य ‘डॉल्स हाऊस, घोस्ट’ व मराठीतील घराबाहेर, सत्वपरीक्षा अशा नाटकांचा उल्लेख करीत हा प्रभाव अधोरेखित केला. आधुनिक नाटकांचे जनक म्हणून ओळख असलेले हेन्रिक इबसन यांच्या नाटकांनी मराठी रंगभूमीला चांगलेच प्रभावित केले आहे. जुन्या नाटकांप्रमाणे लांबलचक संवाद न ठेवता परिस्थितीनुसार प्रेक्षकांची उत्कंठा वाढविण्याचे कौशल्य त्यांनी साधले होते. विरोध होऊनही स्त्रीस्वातंत्र्यासारखे नवीन विचार त्यांनी मांडले. याशिवाय रशियन नाटककार स्टॅनिसलेव्हिस्कीने दिलेले अभिनयाचे तंत्र आजही स्वीकारले जाते. शेक्सपियरने साऱ्या जगाला भुरळ घातली असताना मराठी रंगभूमी त्या प्रभावापासून दूर राहिली नाही, असे मनोगत त्यांनी मांडले.प्रा. शिशिर वर्मा यांनी १८५० पासून ऐतिहासिक परिस्थितीनुसार पाश्चात्त्य रंगभूमी आणि नाटके कशी बदलत गेली, यावर प्रकाश टाकला. आधी होणारे बदल हे संथ होते. पण यांत्रिकीकरणानंतर जगाच्या परिस्थितीत वेगवान बदल घडत गेले. पुढे साम्राज्यशाही, विविध देशांची आंतरिक स्पर्धा, पहिले व दुसरे महायुद्ध, निसर्गावर आक्रमण अशा गोष्टी झपाट्याने होत गेल्या व त्याचे पडसादरंगभूमीवरही पडले. कलेच्या क्षेत्रातही विज्ञान आणि भावनेचे द्वंद्व निर्माण झाले. धर्माच्या नावाने दाबल्या गेलेला स्त्रीस्वातंत्र्याचा विचार रंगभूमीतून बाहेर येऊ लागला. घडणाऱ्या परिस्थितीनुसार चांगले-वाईट बदल होत गेले, ज्याचा प्रभाव आजही बघायला मिळतो. हा इतिहास जाणून नाटकांची निर्मिती करण्याचे आवाहन प्रा. वर्मा यांनी केले. ज्येष्ठ नाटककार अनिल चणाखेकर, प्रा. सोपानदेव पिसे प्रामुख्याने उपस्थित होते. राजेश काळे यांनी आभार मानले.

 

टॅग्स :Natakनाटकmarathiमराठी