शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
2
'कशाला रोडमॅप? आजच अंमलबजावणी करा!'; जरांगे-मुख्यमंत्र्यांचे OSD यांच्यात काय चर्चा झाली?
3
कुठल्याही प्रोजेक्टमध्ये त्रुटी आढळल्यास संबंधितांवर कारवाई होणार, अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित केली जाणार - मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ
4
दिवाळीपूर्वी मोठी भेट! कपडे, खाद्यपदार्थांवरील GST ५% होणार? 'या' वस्तू आणि सेवांवरील टॅक्सही घटणार
5
जम्मूच्या दोडा येथे ढगफुटी; डोंगरावरून आलेल्या पुरात चार जणांचा मृत्यू, १० हून अधिक घरे वाहून गेली
6
Pune: लक्ष्मी रोडवरील थरार... गर्दीत बस येताच चालकाला ह्रदयविकाराचा झटका; पोलीस धावले अन्...
7
Atharva Sudame: पुण्याचा रीलस्टार ते थेट राज ठाकरेंशी मैत्री; कोण आहे अथर्व सुदामे?
8
बुधवारी गणपती २०२५: १ गोष्ट अर्पण करा, पूर्ण पूजा सफल होईल; वर्षभर पुण्य, बाप्पा शुभच करेल!
9
वाह! आयुष्य असावं तर 'या' क्रिकेटरसारखं...; ६ महिने आराम अन् पगार मिळतो २७ कोटी
10
तंत्रज्ञानाची किमया! इंटरनेटशिवाय WhatsApp कॉल; गुगलचा आश्चर्याचा धक्का, काय आहे प्लॅन?
11
Ganpati Puja 2025: घरी स्थापन केलेल्या बाप्पाची दररोज पूजा कशी करावी? ‘या’ गोष्टींचे पालन आवश्यकच
12
अर्जुन-सानिया यांच्या साखरपुड्यासंदर्भातील फिरकी घेणारा प्रश्न अन् सचिन तेंडुलकरचा 'स्ट्रेट ड्राइव्ह'
13
उकडीचे की तळणीचे मोदक? वाद मोठा जहाल, पण दोन्ही मोदक आरोग्याच्या हिताचे; वाचा फायदे
14
मेड इन इंडिया! मारुतीची पहिली इलेक्ट्रिक कार अखेर लॉन्च, परदेशातही निर्यात होणार
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा हट्टीपणा, अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ लागू; भारत 'चौफेर' पलटवार करणार?
16
गणेश चतुर्थी २०२५: गुरुजींना उशीर झाला? रेकॉर्डेट कंटेट नको? स्वतःच करा गणपती प्राणप्रतिष्ठा पूजाविधी
17
चीनमध्ये शक्तीप्रदर्शन; मोदी, पुतिन आणि जिनपिंग एकाच व्यासपीठावर, अमेरिकेला लागणार मिरची
18
गणपती २०२५: ६ मूलांकांना ८ राजयोग शुभ, दुपटीने चौफेर लाभ; धनलक्ष्मी-गणेश कृपेचा वरदहस्त!
19
पैसै घेऊन मूर्तीकार पळाला, कारखाना जैसे थे ठेवला; ऐनवेळी मूर्ती कुठून आणायची, गणेशभक्तांना चिंता
20
Nikki Murder Case : निक्कीला जाळणाऱ्या विपिनच्या कुटुंबाचं सर्वात मोठं खोटं पकडलं; तपासात 'अशी' झाली पोलखोल

मराठ्यांना आनंद मात्र ओबीसी नाराज

By admin | Updated: June 26, 2014 00:49 IST

राज्य शासनाने मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या निर्णयावर नागपुरात संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या. मराठा समाज संघटनांनी शासनाच्या निर्णयावर सावध प्रतिक्रिया व्यक्त करताना घोषणेची

आरक्षण निर्णयावर सावध प्रतिक्रियानागपूर : राज्य शासनाने मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या निर्णयावर नागपुरात संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या. मराठा समाज संघटनांनी शासनाच्या निर्णयावर सावध प्रतिक्रिया व्यक्त करताना घोषणेची तत्काळ अंमलबजावणी करण्याची मागणी केली आहे, तर ओबीसींनी या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे.मराठा समाजाचा दबाव आणि तोंडावर आलेल्या निवडणुका यामुळे शासनाने मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाची तत्काळ अंमलबजावणी करण्याची गरज आहे, अशी प्रतिक्रिया संभाजी ब्रिगेडचे प्रदेश कार्याध्यक्ष (प्रशिक्षण) सुधांशु मोहोड यांनी व्यक्त केली. खरे तर मराठा समाजाला इतर मागासवर्गीयांमध्ये समाविष्ट करून त्यांच्या आरक्षणाचा टक्का वाढविण्याची गरज होती. तसे झाले असते तर त्याचा सर्वांना फायदा झाला असता. यासाठी समाजजागृती करण्याची गरज होती. मात्र त्यासाठी वेळही नव्हता. निवडणुका जवळ आल्याने सरकारने घोषणा केली. पण अंमलबजावणी करण्यास विलंब नको. न्यायालयात या निर्णयाला आव्हान दिल्यास आणखी अडचणी येतात. या बाबींचा विचार करून शासनाने पावले उचलावीत, असे मोहोड म्हणाले.ओबीसी मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय संयोजक नितीन चौधरी यांनी शासनाच्या या निर्णयावर नाराजी व्यक्त केली. हा निर्णय मराठा समाजाची फसवणूक करणारा आणि घाईगडबडीत घेतलेला आहे. निर्णय घेताना कुठलीही कायदेशीर बाजू तपासण्यात आली नाही. त्यामुळे त्याला कायदेशीर आधार नाही. त्यामुळे कायद्यापुढे टिकणार नाही. नारायण राणे समितीने कुठल्याही कायदेशीर आधार नसलेल्या शिफारशी के ल्या आहेत. लोकसंख्येने ५२ टक्के असलेला आणि अनेक जातींचा समावेश असलेल्या ओबीसींना २७ टक्के आणि फक्त एका जातीला १६ टक्के आरक्षण हा अन्याय आहे, असे चौधरी म्हणाले. ओबीसी सेवा संघाचे दिनेश ठाकरे यांनीही या निर्णयावर टीका केली आहे. मराठ्यांना आरक्षण देण्यास विरोध नाही. पण शासनाचा निर्णय कायदेशीर चौकटीवर न टिकणारा असल्याने ती मराठ्यांची दिशाभूल ठरते, असे ठाकरे म्हणाले.(प्रतिनिधी)