शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
2
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
3
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
4
भयंकर! बॉयफ्रेंडसाठी नवऱ्यासह मुलाला सोडलं, 'त्याने'च तिला संपवलं, अंगावर काटा आणणारी घटना
5
"विवाहित महिलांनी घरात...", विजयाच्या नशेत केरळच्या सीपीएम नेत्याचं वादग्रस्त विधान; उडाला गोंधळ
6
महालक्ष्मी रेसकोर्सवर साकारणार भव्यदिव्य सेंट्रल पार्क; आराखड्याचे महापालिकेकडून सादरीकरण
7
"मतदार याद्यांमधले घोळ आम्हीही दाखवले, पण..."; महापालिका निवडणुकांच्या घोषणेवर CMचे विधान
8
रेखा झुनझुनवालांकडे या कंपनीचे तब्बल ५ कोटींहून अधिक शेअर; ₹३०० पार जाणार स्टॉक, एक्सपर्ट्सचा दावा
9
Photo: 'या' वर्षातील बेस्ट बजेट स्मार्टफोन, किंमत १५ हजारांपेक्षा कमी, यादीत मोठे ब्रँड्स
10
Wedding Ritual: लग्नाआधीची विचित्र प्रथा, वरच्या कुटुंबाचं रक्षण करण्यासाठी वधूला करावं लागतं 'हे' काम
11
Municipal Election 2026 Dates: 'महा'संग्रामाचा शंखनाद! BMCसह राज्यातील २९ महापालिकांसाठी १५ जानेवारीला मतदान, १६ जानेवारीला निकाल
12
"हा प्रकार केवळ बेजबाबदारपणा नसून..."; उद्धवसेनेचं राज्य निवडणूक आयुक्तांना खरमरीत पत्र
13
पंतप्रधान मोदींमुळेच CBSE च्या पुस्तकात छत्रपतींचा २१ पानांचा जाज्वल्य इतिहास - देवेंद्र फडणवीस
14
सलग दुसऱ्या आठवड्याची सुरुवात घसरणीने! 'या' ३ कारणांमुळे बाजारात चांगली रिकव्हरी
15
IPL 2026 Mock Auction : CSK ची थट्टा? KKR नं ऑस्ट्रेलियन खेळाडूवर लावली ३०.५० कोटींची विक्रमी बोली!
16
भारतीय ऑटो बाजारातील सर्वात मोठी बातमी! फोक्सवॅगनची हजारो कर्मचाऱ्यांना व्हीआरएसची ऑफर, फोर्डच्याच वाटेवर?
17
पुतिन मायदेशी परतताच भारताने तयार केली ३०० वस्तूंची यादी, काय आहे केंद्र सरकारचा प्लॅन
18
१६ डिसेंबर पासून सुरु होत आहे धनुर्मास; आहार, आरोग्य, लक्ष्मी उपासनेसाठी महत्त्वाचा महिना!
19
Shaheen Afridi: शाहीन आफ्रिदीचा अपमान; बिग बॅश लीगमध्ये गोलंदाजी करण्यापासून रोखलं! नेमकं प्रकरण काय?
20
भारताच्या निर्यातीला मोठा 'बूस्ट'! नोव्हेंबरमध्ये १९.३७% ची वाढ; व्यापार तुटीतही मोठा दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

माओवादी करताहेत अनुसूचित जातीला ‘टार्गेट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2018 00:38 IST

माओवाद्यांचे मूळ ध्येय हे देशातील संविधानाला उलथून स्वत:चे साम्राज्य प्रस्थापित करण्याचे आहे. संविधान निर्मितीच्या वेळी १९४९ साली डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी माओवादी हे संविधानासाठी सर्वात मोठा धोका ठरु शकतात, असा इशारा दिला होता. त्यांचेच नाव पुढे करुन माओवादी अनुसूचित जातीमध्ये शिरण्याचा प्रयत्न करत आहेत. संविधानाला न मानणारे हे माओवादी आपल्या फायद्यासाठी उपयोग करण्याच्या उद्देशाने अशाप्रकारे ‘टार्गेट’ करत असल्याचे प्रतिपादन माओवादी अभ्यासक कॅ.स्मिता गायकवाड यांनी केले. जन संघर्ष समितीतर्फे आयोजित ‘शहरी नक्षलवादाचे आव्हान’ या विषयावर त्यांनी शनिवारी व्याख्यान दिले.

ठळक मुद्देस्मिता गायकवाड : शहरी नक्षलवादाच्या आव्हानावर टाकला प्रकाश

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : माओवाद्यांचे मूळ ध्येय हे देशातील संविधानाला उलथून स्वत:चे साम्राज्य प्रस्थापित करण्याचे आहे. संविधान निर्मितीच्या वेळी १९४९ साली डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी माओवादी हे संविधानासाठी सर्वात मोठा धोका ठरु शकतात, असा इशारा दिला होता. त्यांचेच नाव पुढे करुन माओवादी अनुसूचित जातीमध्ये शिरण्याचा प्रयत्न करत आहेत. संविधानाला न मानणारे हे माओवादी आपल्या फायद्यासाठी उपयोग करण्याच्या उद्देशाने अशाप्रकारे ‘टार्गेट’ करत असल्याचे प्रतिपादन माओवादी अभ्यासक कॅ.स्मिता गायकवाड यांनी केले. जन संघर्ष समितीतर्फे आयोजित ‘शहरी नक्षलवादाचे आव्हान’ या विषयावर त्यांनी शनिवारी व्याख्यान दिले.कविवर्य सुरेश भट सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला जन संघर्ष समितीचे अध्यक्ष दत्ता शिर्के प्रामुख्याने उपस्थित होते. समाज अस्वस्थ रहावा यासाठी माओवादी सामाजिक द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतात.अनुसूचित जातीला हक्क देण्याच्या नावाखाली ते त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवत आहेत. माओवाद्यांच्या बैठकांमध्ये याबाबत नियोजनबद्ध रणनीतीदेखील तयार करण्यात आली असून याचे पुरावे तपास यंत्रणांनादेखील सापडले आहेत, असे कॅ.गायकवाड यांनी सांगितले. आतापर्यंत दहशतीमुळेच माओवादी टिकले आहेत. शहरी नक्षलवाद हा नवीन नाही. माओवादी चळवळीला रसद पुरविणे, आर्थिक मदत करणे, प्रपोगंडा करणे इत्यादी कामे या शहरी नक्षलवादातूनच होतात. शहरी नक्षलवाद हा देशासमोरील मोठे आव्हानच असून त्यांची ओळख करणे कठीण बाब आहे. असेदेखील त्या म्हणाल्या. माओवादामुळे देशातील अनेक भाग प्रभावित झाला असून आदिवासींच्या तर दोन पिढ्या यात जळाल्या आहेत. माओवाद्यांना विकास नको असून आदिवासींच्या रक्षणाच्या नावाखाली ते त्यांच्यावरच अन्याय करत आहेत, असेदेखील गायकवाड यांनी सांगितले. दत्ता शिके यांनी प्रास्ताविकादरम्यान गडचिरोलीतील नक्षलवाद्यांची दहशत व जन संघर्ष समितीच्या कार्यावर प्रकाश टाकला.चौथ्या पिढीच्या युद्धतंत्राचा उपयोगमाओवाद्यांना मतपेटी नव्हे तर हिंसेच्या आधारावर देशाची सत्ता हवी आहे. शहरी नक्षलवाद्यांकडून थेट न लढता चौथ्या पिढीच्या युद्धतंत्राचा उपयोग करण्यात येत आहे. युद्धतंत्र, द्वेष, राजकारण यांची सरमिसळ करुन जनतेत याद्वारे फूट पाडली जात आहे. आपल्याच देशातील लोकांना कळत-नकळतपणे देशाच्याच विरोधात वापरले जात आहे. भीमा कोरेगाव येथील घटना याचेच उदाहरण असून सुरक्षा यंत्रणांनी याचा पर्दाफाश केला असल्याची माहिती कॅ. स्मिता गायकवाड यांनी दिली.‘आयसिस’, अलकायदाच्या रांगेत माओवादी‘सीपीआय’ (एम) वर देशात बंदी घालण्यात आली आहे. माओवादामुळे होणारा हिंसाचार हे जगात पाचव्या क्रमांकावर आहे. अमेरिकेच्या दहशातवादाचा अभ्यास करणाऱ्या संस्थेनुसार २००० ते २०१४ या कालावधीत माओवाद्यांनी ३३७ हल्ले केले. धोकादायक संघटनांच्या यादीत ‘‘आयसिस’, ‘बोको हरम’, तालिबान व ‘अल कायदा’ नंतर माओवादी ‘सीपीआय’ (एम)चा पाचवा क्रमांक आहे, असा दावा कॅ.गायकवाड यांनी केला.

टॅग्स :naxaliteनक्षलवादीnagpurनागपूर