शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

माओवादी करताहेत अनुसूचित जातीला ‘टार्गेट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2018 00:38 IST

माओवाद्यांचे मूळ ध्येय हे देशातील संविधानाला उलथून स्वत:चे साम्राज्य प्रस्थापित करण्याचे आहे. संविधान निर्मितीच्या वेळी १९४९ साली डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी माओवादी हे संविधानासाठी सर्वात मोठा धोका ठरु शकतात, असा इशारा दिला होता. त्यांचेच नाव पुढे करुन माओवादी अनुसूचित जातीमध्ये शिरण्याचा प्रयत्न करत आहेत. संविधानाला न मानणारे हे माओवादी आपल्या फायद्यासाठी उपयोग करण्याच्या उद्देशाने अशाप्रकारे ‘टार्गेट’ करत असल्याचे प्रतिपादन माओवादी अभ्यासक कॅ.स्मिता गायकवाड यांनी केले. जन संघर्ष समितीतर्फे आयोजित ‘शहरी नक्षलवादाचे आव्हान’ या विषयावर त्यांनी शनिवारी व्याख्यान दिले.

ठळक मुद्देस्मिता गायकवाड : शहरी नक्षलवादाच्या आव्हानावर टाकला प्रकाश

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : माओवाद्यांचे मूळ ध्येय हे देशातील संविधानाला उलथून स्वत:चे साम्राज्य प्रस्थापित करण्याचे आहे. संविधान निर्मितीच्या वेळी १९४९ साली डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी माओवादी हे संविधानासाठी सर्वात मोठा धोका ठरु शकतात, असा इशारा दिला होता. त्यांचेच नाव पुढे करुन माओवादी अनुसूचित जातीमध्ये शिरण्याचा प्रयत्न करत आहेत. संविधानाला न मानणारे हे माओवादी आपल्या फायद्यासाठी उपयोग करण्याच्या उद्देशाने अशाप्रकारे ‘टार्गेट’ करत असल्याचे प्रतिपादन माओवादी अभ्यासक कॅ.स्मिता गायकवाड यांनी केले. जन संघर्ष समितीतर्फे आयोजित ‘शहरी नक्षलवादाचे आव्हान’ या विषयावर त्यांनी शनिवारी व्याख्यान दिले.कविवर्य सुरेश भट सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला जन संघर्ष समितीचे अध्यक्ष दत्ता शिर्के प्रामुख्याने उपस्थित होते. समाज अस्वस्थ रहावा यासाठी माओवादी सामाजिक द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतात.अनुसूचित जातीला हक्क देण्याच्या नावाखाली ते त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवत आहेत. माओवाद्यांच्या बैठकांमध्ये याबाबत नियोजनबद्ध रणनीतीदेखील तयार करण्यात आली असून याचे पुरावे तपास यंत्रणांनादेखील सापडले आहेत, असे कॅ.गायकवाड यांनी सांगितले. आतापर्यंत दहशतीमुळेच माओवादी टिकले आहेत. शहरी नक्षलवाद हा नवीन नाही. माओवादी चळवळीला रसद पुरविणे, आर्थिक मदत करणे, प्रपोगंडा करणे इत्यादी कामे या शहरी नक्षलवादातूनच होतात. शहरी नक्षलवाद हा देशासमोरील मोठे आव्हानच असून त्यांची ओळख करणे कठीण बाब आहे. असेदेखील त्या म्हणाल्या. माओवादामुळे देशातील अनेक भाग प्रभावित झाला असून आदिवासींच्या तर दोन पिढ्या यात जळाल्या आहेत. माओवाद्यांना विकास नको असून आदिवासींच्या रक्षणाच्या नावाखाली ते त्यांच्यावरच अन्याय करत आहेत, असेदेखील गायकवाड यांनी सांगितले. दत्ता शिके यांनी प्रास्ताविकादरम्यान गडचिरोलीतील नक्षलवाद्यांची दहशत व जन संघर्ष समितीच्या कार्यावर प्रकाश टाकला.चौथ्या पिढीच्या युद्धतंत्राचा उपयोगमाओवाद्यांना मतपेटी नव्हे तर हिंसेच्या आधारावर देशाची सत्ता हवी आहे. शहरी नक्षलवाद्यांकडून थेट न लढता चौथ्या पिढीच्या युद्धतंत्राचा उपयोग करण्यात येत आहे. युद्धतंत्र, द्वेष, राजकारण यांची सरमिसळ करुन जनतेत याद्वारे फूट पाडली जात आहे. आपल्याच देशातील लोकांना कळत-नकळतपणे देशाच्याच विरोधात वापरले जात आहे. भीमा कोरेगाव येथील घटना याचेच उदाहरण असून सुरक्षा यंत्रणांनी याचा पर्दाफाश केला असल्याची माहिती कॅ. स्मिता गायकवाड यांनी दिली.‘आयसिस’, अलकायदाच्या रांगेत माओवादी‘सीपीआय’ (एम) वर देशात बंदी घालण्यात आली आहे. माओवादामुळे होणारा हिंसाचार हे जगात पाचव्या क्रमांकावर आहे. अमेरिकेच्या दहशातवादाचा अभ्यास करणाऱ्या संस्थेनुसार २००० ते २०१४ या कालावधीत माओवाद्यांनी ३३७ हल्ले केले. धोकादायक संघटनांच्या यादीत ‘‘आयसिस’, ‘बोको हरम’, तालिबान व ‘अल कायदा’ नंतर माओवादी ‘सीपीआय’ (एम)चा पाचवा क्रमांक आहे, असा दावा कॅ.गायकवाड यांनी केला.

टॅग्स :naxaliteनक्षलवादीnagpurनागपूर