शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
2
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
3
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
6
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
7
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
8
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
9
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
10
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
11
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
12
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
13
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
14
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
15
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
16
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
17
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
18
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
19
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
20
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!

आर्थिक संकटामुळे अनेक प्रकल्प रखडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2019 10:29 IST

महापालिकेच्या माध्यमातूनही शहरात विविध विकास प्रकल्प राबविले जात असल्याचा दावा केला जात आहे. परंतु मागील काही वर्षापासून महापालिका आर्थिक संकटाचा सामना करीत असल्याने महत्त्वाचे प्रकल्प रखडले आहेत.

ठळक मुद्देगांधीसागरसाठी आलेला निधी पडून एसटीपी, शॉपिंग मॉल, बुधवार बाजार, आरेंज सिटी स्ट्रीटचे भवितव्य अंधारात

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहराचा चौफेर विकास होत आहे. महापालिकेच्या माध्यमातूनही शहरात विविध विकास प्रकल्प राबविले जात असल्याचा दावा केला जात आहे. परंतु मागील काही वर्षापासून महापालिका आर्थिक संकटाचा सामना करीत असल्याने महत्त्वाचे प्रकल्प रखडले आहेत. विशेष म्हणजे ज्या प्रकल्पासाठी शासनाकडून निधी प्राप्त झालेला आहे, अशाही प्रकल्पांचा यात समावेश आहे.शहराचा ऐतिहासिक वारसा असलेल्या गांधीसागर तलाव संवर्धनासाठी शासनाने १९ कोटींचा निधी मंजूर केला आहे. त्यानतंरही हा प्रकल्प रखडला आहे. एवढेच नव्हे तर महापालिकेच्या पैशातून उभारण्यात आलेल्या खाऊ गल्लीवरील ८० लाखांचा खर्च पाण्यात गेला आहे. बाजूला सिमेंट रोडचे काम सुरू असल्याने आता खाऊ गल्लीचा पर्यायी मार्ग म्हणून वापर केला जात आहे.शहरातील प्रस्तावित प्रकल्पांना गती देण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी महापालिका प्रशासनाला वेळोवेळी निर्देश दिले. अधिकाऱ्यांना यासाठी धारेवर धरले. परंतु त्यानंतरही परिस्थितीत फारसा बदल झालेला नाही. महाल व सक्करदरा येथील बुधवार बाजाराचा बीओटी तत्त्वावरील विकासाचे प्रकल्प वर्षानुवर्ष रखडलेले आहेत. सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प, पुणे शहराच्या धर्तीवर मोक्षधाम घाटाचा विकास, आयसोलेशन हॉस्पिटलचा विकास, मौजा बाभूळखेडा रामेश्वरी येथे भाजीपाला मार्केटचा विकास, मौजा वाठोडा येथे वाणिज्यिक संकुलाचे बांधकाम, अंबाझरी उद्यानाचा, श्रीमंत राजे रघुजी भोसले सभागृहाचे नवीन बांधकाम, नगरभवन सभागृहाचे बांधकाम, नंदग्राम पशु निवारा केंद्र, गांधीबाग येथील सोख्ता भवन यासह अन्य प्रकल्पावर अनेकदा चर्चा झाली. प्रकल्प मार्गी लावण्यासाठी प्रशासनाला वेळोवेळी निर्देश देण्यात आले. परंतु त्यानंतरही परिस्थितीत बदल झालेला नाही.तलावांचे संवर्धन कधी?नागपूर शहरात ११ तलाव आहेत. गांधीसागर, फुटाळा, पांढराबोडी, सक्करदरा, सोनेगाव, नाईक तलाव अशा प्रमुख तलावांच्या संवर्धनाची गरज आहे. तलावातील अनावश्यक गाळ काढून खोलीकरण करणे. पाण्याचे प्रदूषण रोखण्यासाठी उपाययोजना करणे. तलावाच्या किनाºयाचे सौंदर्यीकरण, हरित पट्टा विकसित करणे, यासाठी नियोजनाची गरज आहे. लक्ष्य निर्धारित करून अर्थसंकल्पात यासाठी तरतुदीची गरज आहे. परंतु याकडे वर्षानुवर्षे दुर्लक्ष होत आहे.अर्थसंकल्पात तरतूद नाहीमहापालिकेच्या आर्थिक स्थितीचा फटका शहरातील प्रस्तावित विकास प्रकल्पाना बसला आहे. पर्याय म्हणून प्रशासनाने काही प्रकल्प खासगी सहभागातून राबविण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु सर्वच प्रकल्प शंभर टक्के खासगी सहभागातून राबविणे योग्य नाही. याचा विचार करता रखडलेल्या प्रकल्पांसाठी अर्थसंकल्पात भरीव तरतूद करून आर्थिक बूस्टची देण्याची गरज आहे. मात्र आर्थिक स्थिती बिकट असल्याने महापालिकेच्या प्रस्तावित अर्थसंकल्पातही प्रकल्पासाठी पुरेशी तरतूद होण्याची शक्यता दिसत नाही.उद्यानांची निर्मिती कागदावरचशहरात १५१ उद्याने आहेत. यातील ९१ उद्याने महानगरपालिका, ६१ नागपूर सुधार प्रन्यास, ३ डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाची तर एक उद्यान वन विभागाच्या मालकीचे आहे. शहराचा विस्तार व विकास विचारात घेता शहरात नवीन उद्यानांची निर्मिती करणे गरजेचे आहे. १० नवीन उद्यानांची निर्मिती करण्याचा प्रस्ताव होता. परंतु याची अंमलबजावणी होताना दिसत नाही...

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिका