शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
3
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
4
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
5
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
6
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
7
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
8
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
9
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
10
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
11
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
12
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
13
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
14
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
15
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
16
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
17
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
18
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
19
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
20
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा

आर्थिक संकटामुळे अनेक प्रकल्प रखडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2019 10:29 IST

महापालिकेच्या माध्यमातूनही शहरात विविध विकास प्रकल्प राबविले जात असल्याचा दावा केला जात आहे. परंतु मागील काही वर्षापासून महापालिका आर्थिक संकटाचा सामना करीत असल्याने महत्त्वाचे प्रकल्प रखडले आहेत.

ठळक मुद्देगांधीसागरसाठी आलेला निधी पडून एसटीपी, शॉपिंग मॉल, बुधवार बाजार, आरेंज सिटी स्ट्रीटचे भवितव्य अंधारात

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहराचा चौफेर विकास होत आहे. महापालिकेच्या माध्यमातूनही शहरात विविध विकास प्रकल्प राबविले जात असल्याचा दावा केला जात आहे. परंतु मागील काही वर्षापासून महापालिका आर्थिक संकटाचा सामना करीत असल्याने महत्त्वाचे प्रकल्प रखडले आहेत. विशेष म्हणजे ज्या प्रकल्पासाठी शासनाकडून निधी प्राप्त झालेला आहे, अशाही प्रकल्पांचा यात समावेश आहे.शहराचा ऐतिहासिक वारसा असलेल्या गांधीसागर तलाव संवर्धनासाठी शासनाने १९ कोटींचा निधी मंजूर केला आहे. त्यानतंरही हा प्रकल्प रखडला आहे. एवढेच नव्हे तर महापालिकेच्या पैशातून उभारण्यात आलेल्या खाऊ गल्लीवरील ८० लाखांचा खर्च पाण्यात गेला आहे. बाजूला सिमेंट रोडचे काम सुरू असल्याने आता खाऊ गल्लीचा पर्यायी मार्ग म्हणून वापर केला जात आहे.शहरातील प्रस्तावित प्रकल्पांना गती देण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी महापालिका प्रशासनाला वेळोवेळी निर्देश दिले. अधिकाऱ्यांना यासाठी धारेवर धरले. परंतु त्यानंतरही परिस्थितीत फारसा बदल झालेला नाही. महाल व सक्करदरा येथील बुधवार बाजाराचा बीओटी तत्त्वावरील विकासाचे प्रकल्प वर्षानुवर्ष रखडलेले आहेत. सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प, पुणे शहराच्या धर्तीवर मोक्षधाम घाटाचा विकास, आयसोलेशन हॉस्पिटलचा विकास, मौजा बाभूळखेडा रामेश्वरी येथे भाजीपाला मार्केटचा विकास, मौजा वाठोडा येथे वाणिज्यिक संकुलाचे बांधकाम, अंबाझरी उद्यानाचा, श्रीमंत राजे रघुजी भोसले सभागृहाचे नवीन बांधकाम, नगरभवन सभागृहाचे बांधकाम, नंदग्राम पशु निवारा केंद्र, गांधीबाग येथील सोख्ता भवन यासह अन्य प्रकल्पावर अनेकदा चर्चा झाली. प्रकल्प मार्गी लावण्यासाठी प्रशासनाला वेळोवेळी निर्देश देण्यात आले. परंतु त्यानंतरही परिस्थितीत बदल झालेला नाही.तलावांचे संवर्धन कधी?नागपूर शहरात ११ तलाव आहेत. गांधीसागर, फुटाळा, पांढराबोडी, सक्करदरा, सोनेगाव, नाईक तलाव अशा प्रमुख तलावांच्या संवर्धनाची गरज आहे. तलावातील अनावश्यक गाळ काढून खोलीकरण करणे. पाण्याचे प्रदूषण रोखण्यासाठी उपाययोजना करणे. तलावाच्या किनाºयाचे सौंदर्यीकरण, हरित पट्टा विकसित करणे, यासाठी नियोजनाची गरज आहे. लक्ष्य निर्धारित करून अर्थसंकल्पात यासाठी तरतुदीची गरज आहे. परंतु याकडे वर्षानुवर्षे दुर्लक्ष होत आहे.अर्थसंकल्पात तरतूद नाहीमहापालिकेच्या आर्थिक स्थितीचा फटका शहरातील प्रस्तावित विकास प्रकल्पाना बसला आहे. पर्याय म्हणून प्रशासनाने काही प्रकल्प खासगी सहभागातून राबविण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु सर्वच प्रकल्प शंभर टक्के खासगी सहभागातून राबविणे योग्य नाही. याचा विचार करता रखडलेल्या प्रकल्पांसाठी अर्थसंकल्पात भरीव तरतूद करून आर्थिक बूस्टची देण्याची गरज आहे. मात्र आर्थिक स्थिती बिकट असल्याने महापालिकेच्या प्रस्तावित अर्थसंकल्पातही प्रकल्पासाठी पुरेशी तरतूद होण्याची शक्यता दिसत नाही.उद्यानांची निर्मिती कागदावरचशहरात १५१ उद्याने आहेत. यातील ९१ उद्याने महानगरपालिका, ६१ नागपूर सुधार प्रन्यास, ३ डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाची तर एक उद्यान वन विभागाच्या मालकीचे आहे. शहराचा विस्तार व विकास विचारात घेता शहरात नवीन उद्यानांची निर्मिती करणे गरजेचे आहे. १० नवीन उद्यानांची निर्मिती करण्याचा प्रस्ताव होता. परंतु याची अंमलबजावणी होताना दिसत नाही...

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिका