शहरं
Join us  
Trending Stories
1
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
2
Pahalgam attack latest: पर्यटकांची हत्या करणाऱ्या तीन दहशतवाद्यांची ओळख पटली, 'या' दहशतवादी संघटनेशी कनेक्शन
3
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
4
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
5
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
6
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
7
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
8
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
9
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
10
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'
11
नशीब बलवत्तर! फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; घटनास्थळापासून १५ मिनिटांवर होतं कुटुंब
12
पाकिस्तानी नागरिकांनी ४८ तासांत भारत न सोडल्यास काय कारवाई होणार? असा आहे गुप्तचर यंत्रणांचा ॲक्शन प्लॅन   
13
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
14
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन
15
काश्मीरमध्ये तणाव असतानाच छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांवर मोठी कारवाई, १००० नक्षल्यांना जवानांनी घेरले, ५ ठार  
16
पहलगाम दहशतवादी हल्लाः पाकिस्तानी उच्चायोगात मागवण्यात आला केक; बॉक्स पाहून एकच प्रश्न, हे 'सेलिब्रेशन' कसलं?
17
पाकिस्तान पुरता अडकणार? पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा एक निर्णय अन् शेअर बाजार धडाम
18
Elphinstone Bridge: तारीख निश्चित! एल्फिन्स्टन ब्रिज २५ एप्रिलपासून वाहतुकीसाठी बंद, मुंबईकरांची कोंडी होणार
19
Pahalgam Terror Attack : "माझ्या शुभमला परत आणा, मी माझं दुःख कोणाला सांगू, त्याने कोणाचं काय नुकसान केलं होतं?"
20
या सरकारी बँकेनं सुरू केलं लोन कॅम्पेन; कमी व्याजदर आणि शून्य चार्जेसवर मिळणार कर्ज, अखेरची तारीख कधी?

मानवजन्म युद्धासाठी नव्हे, प्रेम आणि शांतीसाठी : भिक्खू संघसेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2021 21:42 IST

Nagpur News मानवी जन्म युद्धासाठी नाही, तर प्रेम आणि शांतीच्या मार्गाने एकत्रित राहण्यासाठी आहे. हाच संदेश देण्यासाठी ‘लाेकमत’च्या परिषदेत आम्ही सर्व आलाे आहे, अशी भावना महाबाेधी आंतरराष्ट्रीय ध्यानसाधना केंद्र, लद्दाखचे संस्थापक भिक्खू संघसेना यांनी व्यक्त केली.

नागपूर : भगवान बुद्ध म्हणतात युद्धामुळे विनाश आणि दु:खाशिवाय काहीच प्राप्त हाेत नाही. आजच्या परिस्थितीतही तेच सत्य आहे. मानवी जन्म युद्धासाठी नाही, तर प्रेम आणि शांतीच्या मार्गाने एकत्रित राहण्यासाठी आहे. हाच संदेश देण्यासाठी ‘लाेकमत’च्या परिषदेत आम्ही सर्व आलाे आहे, अशी भावना महाबाेधी आंतरराष्ट्रीय ध्यानसाधना केंद्र, लद्दाखचे संस्थापक भिक्खू संघसेना यांनी व्यक्त केली.

परिषदेत सहभागी हाेण्यासाठी शनिवारी त्यांचे नागपूरला आगमन झाले. ‘लाेकमत’शी बाेलताना भिक्खू संघसेना म्हणाले, वर्तमान काळात नकारात्मकता, द्वेषातून हिंसात्मक परिस्थिती मानवाने तयार केली आहे. एकमेकांकडे दुर्लक्ष करणे, एकमेकांना समजून न घेणे, यामुळेच ही समस्या निर्माण झाली आहे. हिंसा किंवा द्वेष हे काेणत्याही समस्येचे समाधान नाही. यामुळे केवळ विनाशाचा अग्नी पेटतो. ही परिस्थिती बदलून शांती, साैहार्द, बंधुभाव, सर्व समानभाव निर्माण हाेणे गरजेचे आहे. सर्व मानवांच्या जन्माची प्रक्रिया एक आहे, शारीरिक रचना एक आहे आणि सर्वांना शांततामय वातावरण हवे आहे. लाेकांच्या मनात हा प्रकाश पेटविण्यासाठी आम्ही सर्व धर्मीय एकत्र आलाे असल्याचे भिक्खू संघसेना म्हणाले.

शिक्षण धाेरणात बदल करून त्यात विश्वशांतीचा, साैहार्दाचा अंतर्भाव करणे आवश्यक आहे. युवा पिढी माेठी ताकद आहे. मात्र, साेशल मीडियामुळे त्यांच्या मनात नकारात्मक विचार टाकले जात आहेत. त्यांना सत्य माहिती पुरवून सकारात्मक मार्गावर नेणे गरजेचे आहे. यासाठी ‘लाेकमत’सारख्या विश्वसनीय माध्यमांवर माेठी जबाबदारी आहे, अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.

टॅग्स :National Inter-Religious Conferenceराष्ट्रीय आंतरधर्मीय परिषद