शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
2
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
3
आता 'या' देशात पर्यटकही धूम्रपान करू शकणार नाहीत! सेलिब्रेटींमध्ये लोकप्रिय असणाऱ्या देशाचे नियम बदलले
4
भारताला डिवचण्याचा प्रयत्न; मोहम्मद युनूस यांनी पाकिस्ताननंतर तुर्कीला दिला वादग्रस्त नकाशा
5
Viral Video: लग्नात स्वयंपाक बनवताना तरुणाचं घाणेरडं कृत्य; व्हिडिओ समोर येताच अटक!
6
३०, ४० आणि ५० व्या वर्षी 'कोट्यधीश' व्हायचेय? तुमच्या वयानुसार निवडा गुंतवणुकीची योग्य स्ट्रॅटेजी!
7
Maharashtra Local Body Elections: २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतीसाठी निवडणूक जाहीर; 'असा' आहे कार्यक्रम, 'दुबार मतदार'ही समजणार
8
ICC Rankings : हातात विश्वचषकाचा 'दागिना'; पण जाता जाता लॉरानं 'वनडे क्वीन’ स्मृतीचा मुकूट हिसकावला!
9
दुबार मतदारांच्या नावासमोर 'डबल स्टार' येणार; राज्य निवडणूक आयोगाचं मोठं पाऊल, कशी असेल नवी मोहीम?
10
सलग चौथ्या दिवशी बाजारात घसरण! गुंतवणूकदारांचे २.६ लाख कोटी पाण्यात; 'ही' आहेत ५ कारणे
11
लग्नात का येताहेत समस्या? कोणत्या सुधारणा आवश्यक? न्यायालयानं स्पष्टच सांगितलं
12
मंदिराच्या गर्भगृहाची दुरुस्ती करताना सापडलं घबाड, कलशात होती सोन्याची एवढी नाणी...  
13
माणुसकीचा जमानाच राहीला नाही! ओला रायडरची मदत केली अन् तो तरुणीसोबत 'असा' वागला
14
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा शिंदेंना धक्का, रायगडमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेशी आघाडी
15
महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरणातील मुख्य आरोपी दुबईतून बेपत्ता, भारताच्या प्रत्यार्पणाच्या आशेला धक्का
16
'या' योजनेत गुंतवणूक केल्यास मिळेल दुहेरी फायदा आणि तगडा परतावा, निवृत्तीनंतरचे टेन्शन होईल 'गायब'!
17
सप्तपदीनंतर दोन तासांत लग्न मोडलं, वधू पक्षाने वराला झोड झोड झोडलं, नेमकं काय घडलं?  
18
कॅनडाने भारतीय विद्यार्थ्यांना दिला मोठा धक्का, ७४% विद्यार्थी व्हिसा अर्ज नाकारले
19
उद्योग जगताला मोठा धक्का! हिंदुजा ग्रुपचे अध्यक्ष गोपीचंद पी. हिंदुजा यांचे लंडनमध्ये निधन
20
चॅटजीपीटी आता तुम्हाला 'या' मुद्द्यांवर सल्ला देणार नाही! कंपनीने का बदलले नियम?

मानवजन्म युद्धासाठी नव्हे, प्रेम आणि शांतीसाठी : भिक्खू संघसेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2021 21:42 IST

Nagpur News मानवी जन्म युद्धासाठी नाही, तर प्रेम आणि शांतीच्या मार्गाने एकत्रित राहण्यासाठी आहे. हाच संदेश देण्यासाठी ‘लाेकमत’च्या परिषदेत आम्ही सर्व आलाे आहे, अशी भावना महाबाेधी आंतरराष्ट्रीय ध्यानसाधना केंद्र, लद्दाखचे संस्थापक भिक्खू संघसेना यांनी व्यक्त केली.

नागपूर : भगवान बुद्ध म्हणतात युद्धामुळे विनाश आणि दु:खाशिवाय काहीच प्राप्त हाेत नाही. आजच्या परिस्थितीतही तेच सत्य आहे. मानवी जन्म युद्धासाठी नाही, तर प्रेम आणि शांतीच्या मार्गाने एकत्रित राहण्यासाठी आहे. हाच संदेश देण्यासाठी ‘लाेकमत’च्या परिषदेत आम्ही सर्व आलाे आहे, अशी भावना महाबाेधी आंतरराष्ट्रीय ध्यानसाधना केंद्र, लद्दाखचे संस्थापक भिक्खू संघसेना यांनी व्यक्त केली.

परिषदेत सहभागी हाेण्यासाठी शनिवारी त्यांचे नागपूरला आगमन झाले. ‘लाेकमत’शी बाेलताना भिक्खू संघसेना म्हणाले, वर्तमान काळात नकारात्मकता, द्वेषातून हिंसात्मक परिस्थिती मानवाने तयार केली आहे. एकमेकांकडे दुर्लक्ष करणे, एकमेकांना समजून न घेणे, यामुळेच ही समस्या निर्माण झाली आहे. हिंसा किंवा द्वेष हे काेणत्याही समस्येचे समाधान नाही. यामुळे केवळ विनाशाचा अग्नी पेटतो. ही परिस्थिती बदलून शांती, साैहार्द, बंधुभाव, सर्व समानभाव निर्माण हाेणे गरजेचे आहे. सर्व मानवांच्या जन्माची प्रक्रिया एक आहे, शारीरिक रचना एक आहे आणि सर्वांना शांततामय वातावरण हवे आहे. लाेकांच्या मनात हा प्रकाश पेटविण्यासाठी आम्ही सर्व धर्मीय एकत्र आलाे असल्याचे भिक्खू संघसेना म्हणाले.

शिक्षण धाेरणात बदल करून त्यात विश्वशांतीचा, साैहार्दाचा अंतर्भाव करणे आवश्यक आहे. युवा पिढी माेठी ताकद आहे. मात्र, साेशल मीडियामुळे त्यांच्या मनात नकारात्मक विचार टाकले जात आहेत. त्यांना सत्य माहिती पुरवून सकारात्मक मार्गावर नेणे गरजेचे आहे. यासाठी ‘लाेकमत’सारख्या विश्वसनीय माध्यमांवर माेठी जबाबदारी आहे, अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.

टॅग्स :National Inter-Religious Conferenceराष्ट्रीय आंतरधर्मीय परिषद