शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

‘मंगल भवन अमंगल हारी’... पुन्हा गुंजले तेच मधूर स्वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2020 4:03 PM

‘रामायण’चा पहिला ऐपिसोड सादर झाला आणि अनेक वस्त्या सुनसान झाल्या होत्या. जे सरकारच्या आवाहनाला जमले नाही, ते या मालिकेच्या पहिल्या भागाने करून दाखवले, हे विशेष.

ठळक मुद्दे‘रामायण’ने केले ‘लॉकडाऊन’पुन: प्रसारणाला रसिकांचा उदंड प्रतिसाद

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ऐंशी-नव्वदच्या काळात अघोषित संचारबंदी करणाऱ्या दूरचित्रवाहिनीवरील ज्या मालिकांचे नावे घेतले जाते, त्यात रामायण व महाभारत या दोन पौराणिक गाथांचा क्रम पहिला लागतो. या दोन्ही मालिकांची जादू अशी काही होती की लोक टीव्हीलाच हार घालक, दिव्यांची ओवाळणी घालत असत. या मालिकांची लोकप्रियता बघता आणि वर्तमानातील लॉकडाऊनचा काळ बघता दूरदर्शनने या दोन्ही मालिकांचे पुन: प्रसारण करण्याचा निर्णय घेतला आणि ऐंशी-नव्वदच्या दशकातील तिच जादू पुन्हा अनुभवता आली.  ‘रामायण’चा पहिला ऐपिसोड सादर झाला आणि अनेक वस्त्या सुनसान झाल्या होत्या. जे सरकारच्या आवाहनाला जमले नाही, ते या मालिकेच्या पहिल्या भागाने करून दाखवले, हे विशेष.पंतप्रधानांनी २१ दिवसाचा लॉकडाऊन पुकारल्यानंतर वर्दळीत राहायची सवय असलेल्या भारतीयांना एकांतवास सहन होणार नाही, याची जाणिव होतीच. केबलवर सिनेमे बघून बघून किती बघणार आणि घरातील वेळ कसा घालविणार, असा प्रश्न अनेकांच्या मनात निर्माण झाला. त्याला उत्तर म्हणून दूरदर्शनने रामायण, व्योमकेश बक्षी, महाभारत, देख भाई देख अशा प्रचंड गाजलेल्या आणि आजही तिच क्रेझ असलेल्या मालिकांचे पुन: प्रसारण करण्याचा निर्णय घेतला. त्याअनुषंगाने २८ मार्च रोजी रामायण व व्योमकेश बक्षी या मालिकांचे प्रसारण झाले आणि नागरिकांनी या मालिकांचा रसास्वाद घेतला. विशेष म्हणजे रामायण व महाभारत नागरिकांच्या विशेष आकर्षणाचे केंद्र कायम राहिले आहे. त्यामुळे रामायणाच्या प्रसारणाच्या वेळी शहरात अघोषित संचारबंदी दिसून आली. दुपारी १२ वाजता ‘महाभारत’चे प्रसारण होईल, या आशेने अनेकांनी टीव्ही सोडला नव्हता. मात्र, ती अपेक्षा फोल ठरल्याने अनेक नागरिक नाराज झाले.केबल, सेटटॉप बॉक्सवाल्यांची दुकानदारी: कोनोराच्या संक्रमणापासून समाजाला वाचविण्यासाठी सरकारकडून बरेच प्रयत्न केले जात आहेत. रामायण, महाभारतचे पुन: प्रसारण हा त्याच प्रयत्नाचा एक भाग आहे. मात्र, अशावेळी केबल आॅपरेटर्स व वेगवेगळ्या कंपन्यांचे सेटटॉप बॉक्सवाल्यांनी यावरही दुकानदारी सुरू केल्याच्या तक्रारी अनेक नागरिकांनी केल्या. केबल वाहिनी व सेटटॉप बॉक्समधून दुरदर्शन गायब झाल्याचे दिसून येत होते.दूरदर्शन नि:शुल्क वाहिनी: विशेष म्हणजे नव्या मापदंडानुसार सरकारकडून शंभर वाहिन्या नि:शुल्क प्रदान केल्या जात आहेत. त्यात दूरदर्शन व संलग्नित बºयाच वाहिन्या आहेत. त्यामुळे, हे चॅनल दाखविणे आवश्यक आहे. मात्र, रामायण व महाभारत मुळे इतर वाहिन्या कुणी बघणार नाही, या हेतूने खाजगी केबलचालकांनी व सेटटॉप बॉक्सवाल्यांनी दुरदर्शन गायब केल्याचे स्पष्ट होत आहे. अशांवर कारवाई होणे गरजेचे आहे............

 

टॅग्स :ramayanरामायण