शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

मनसर-खवासाचे चौपदरीकरण होणार

By admin | Updated: November 15, 2014 02:48 IST

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्तीद्वय भूषण गवई व विनय देशपांडे यांनी आज, शुक्रवारी राज्य व केंद्र शासनाला महत्त्वपूर्ण आदेश दिल्यामुळे ...

नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्तीद्वय भूषण गवई व विनय देशपांडे यांनी आज, शुक्रवारी राज्य व केंद्र शासनाला महत्त्वपूर्ण आदेश दिल्यामुळे मनसर-खवासा महामार्गाच्या चौपदरीकरणापुढील अडथळे हटले आहेत. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणला या रस्त्याचे विकासकाम लवकरच सुरू करता येईल.सातव्या क्रमांकाच्या नागपूर-जबलपूर राष्ट्रीय महामार्गावरील मनसर ते खवासापर्यंतच्या ३७ किलोमीटर रोडचे चौपदरीकरण झाडे कापण्यासाठी राष्ट्रीय वन्यजीव मंडळ व हरित लवादाची परवानगी मिळाली नसल्यामुळे रखडले होते. हा नवीन महामार्ग नसून जुन्याच महामार्गाचे विस्तारीकरण करण्यात येणार आहे. त्याकरिता केवळ आजूबाजूची झाडे कापावी लागणार आहे. अशा प्रकल्पांसाठी राष्ट्रीय वन्यजीव मंडळाच्या परवानगीची गरज नसल्याचे केंद्रीय पर्यावरण व वन मंत्रालयाने स्पष्ट केले. तसेच, हरित लवादाच्या परवानगीची अट उच्च न्यायालयाने हटविली. परिणामी रखडलेल्या चौपदरीकरणाचा मार्ग मोकळा झाला. उच्च न्यायालयाने राज्य शासनाला यासंदर्भातील प्रस्ताव एक आठवड्यात केंद्र शासनाकडे पाठविण्याचे व केंद्र शासनाने या अहवालावर पुढील तीन आठवड्यांत निर्णय घेऊन अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. यानंतर महामार्ग प्राधिकरणला काम सुरू करता येणार आहे. उच्च न्यायालयाने मनसर ते खवासापर्यंतच्या खराब रस्त्याची स्वत:हून दखल घेऊन जनहित याचिका दाखल केली आहे. माजी आमदार आशिष जयस्वाल यांनी याप्रकरणात मध्यस्थी अर्ज केला आहे. मध्यंतरी न्यायालयाने याचिकेचा विस्तार करून त्यात कोंढाळी उड्डाणपूल व पांढरकवड्याजवळच्या खराब रोडचाही समावेश केला. अ‍ॅड. निखिल पाध्ये न्यायालयीन मित्र असून मध्यस्थातर्फे अ‍ॅड. मोहित खजांची, तर प्राधिकरणतर्फे अ‍ॅड. अनिश कठाणे यांनी बाजू मांडली.(प्रतिनिधी)