शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
4
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
5
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
6
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
7
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
8
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
9
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
10
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
11
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
12
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
13
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
14
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
15
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
16
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
17
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
18
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
19
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
20
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...

गुजरातच्या धर्तीवर होणार बोंडअळीचे व्यवस्थापन; अश्विन मुदगल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2018 20:26 IST

नागपुरातील बोंडअळीचे व्यवस्थापन आता गुजरातच्या धर्तीवर करण्यात येणार आहे. यासाठी शेतकऱ्यांपर्यंत आवश्यक माहिती पोहोचवण्याच्या दृष्टीने जगजागृतीवर भर दिला जाईल, अशी माहिती जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी दिली.

ठळक मुद्देजनजागृतीवर देणार भर

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपुरातील बोंडअळीचे व्यवस्थापन आता गुजरातच्या धर्तीवर करण्यात येणार आहे. यासाठी शेतकऱ्यांपर्यंत आवश्यक माहिती पोहोचवण्याच्या दृष्टीने जगजागृतीवर भर दिला जाईल, अशी माहिती जिल्हाधिकारीअश्विन मुदगल यांनी दिली.जिल्हा माहिती कार्यालयातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयातील छत्रपती सभागृहात बुधवारी आयोजित ‘संवाद माध्यम’ या कार्यक्रमाअंतर्गत जिल्हाधिकारी मुदगल यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी रवींद्र खजांजी आणि इंदू जाखड प्रामुख्याने उपस्थित होते.गुजरातमध्ये बोंडअळीचा प्रादुर्भाव झाला. तेव्हा त्यांनी त्याचे योग्य व्यवस्थापन करून पिकांवर बोंडअळीचा प्रादुर्भाव होऊ दिला नाही. यासंदर्भात माहिती देताना जिल्हाधिकारी मुदगल यांनी सांगितले की, गुजरातचे कृषी संचालकांची एक कार्यशाळा नुकतीच पार पडली. या कार्यशाळेत त्यांनी अनेक महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत. २५ ते ३० महत्त्वाचे पॉर्इंट आहेत. त्यावर काम केल्याने बोंडअळीचा प्रादुर्भाव कमी करता येऊ शकतो. उदाहरणार्थ त्या कार्यशाळेतच सांगण्यात आले की, बोंडअळीचे अंडीपासून तर अळीपर्यंतचे व्यवस्थापन कसे करायचे. त्याला मध्ये ब्रेक दिला तर अळीचा प्रादुर्भाव होणार नाही तसेच डिसेंबरनंतर कापसाचे पीक घेण्यास टाळण्यात आले. डिसेंबरनंतरचे वातावरण हे बोंडअळीसाठी अतिशय लाभदायक असल्याचे आढळून आले. त्या दरम्यान कापसाचे पीक घेण्यास टाळले तर नुकसान होणार नाही. तसेच कडूलिंबाच्या पाल्यांचा रासायनिक खताप्रमाणे शेतात फवारणी करणे या बाबी अतिशय महत्त्वपूर्ण आहेत. यासंदर्भात नागपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जागृत करण्यासाठी प्रचार-प्रसिद्धीवर भर दिला जाईल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.यासोबतच जलयुक्त शिवार यावर अधिक भर दिला जाईल, असेही त्यांनी सांगितले. जलयुक्त शिवारअंतर्गत धडक विहिरी योजना, मागेल त्याला शेततळी आदी कार्यक्रम प्राधान्याने पूर्ण केले जातील.२४८ बियाणे कंपन्या काळ्या यादीतबी-बियाणे व रासायनिक खते उपलब्ध करणाऱ्या २४८ कंपन्यांना काळ्या यादीत टाकण्यात आले आहेत. त्यांची नावे प्रकाशित करून त्याबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती केली जाईल. तसेच त्याच कंपन्या नवीन नावाने बाजारात येत असतील तर त्यावरही देखरेख ठेवली जाईल, असेही जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी स्पष्ट केले.मागेल त्या शेतकऱ्यांना मिळणार कर्जअनेक शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणे बाकी असला तरी मागेल त्या शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध करून देण्यात येईल, असेही जिल्हाधिकारी मुदगल यांनी सांगितले.एक हजार गावांच्या जमिनीचे होणार परीक्षणजिल्ह्यात २०१७-१८ पासून शेतकऱ्यांच्या जमिनीचे परीक्षण कार्यक्रम राबविण्यास सुरुवात करण्यात आली. या कार्यक्रमांतर्गत पहिल्या वर्षी ८९९ गावातील शेतकऱ्यांच्या जमिनीचे परीक्षण करण्यात आले. २०१८-१९ मध्ये जमीन परीक्षण कार्यक्रमामध्ये एक हजार गावांचा समावेश करण्यात येणार आहे. ज्याद्वारे शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीचा कस, प्रत आणि पिकांसंबंधीची माहिती देऊन कमी खर्चात चांगले पीक कसे घेता येईल याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

 

टॅग्स :collectorतहसीलदार