शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
2
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
3
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
4
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
5
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
6
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
7
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
8
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
9
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
10
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
11
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
12
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
13
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
14
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
15
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
16
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
17
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
18
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
19
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
20
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल

जात वैधता प्रमाणपत्रासाठी नागपुरात माना समाजबांधवांचा एल्गार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2018 15:15 IST

न्यायालयाने वेळोवेळी आदेश देऊनही पडताळणी समितीने माना समाज बांधवांना वैधता प्रमाणपत्र दिले नाही. या विरुद्ध आपला आवाज बुलंद करण्यासाठी शेकडो माना समाज बांधवांनी संविधान चौकात एकत्र येऊन आपला आवाज बुलंद केला.

ठळक मुद्देसंविधान चौकात ठिय्या शेकडो बांधवांनी बुलंद केला आवाज

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : न्यायालयाने वेळोवेळी आदेश देऊनही पडताळणी समितीने माना समाज बांधवांना वैधता प्रमाणपत्र दिले नाही. यामुळे माना समाजातील विद्यार्थी, राजकीय नेते, समाजबांधवांसमोर अनेक अडचणी येत आहेत. या विरुद्ध आपला आवाज बुलंद करण्यासाठी शेकडो माना समाज बांधवांनी संविधान चौकात एकत्र येऊन आपला आवाज बुलंद केला.विदर्भ आदिवासी माना समाज कृती समितीने केलेल्या आवाहनानुसार शुक्रवारी शेकडो माना समाज बांधव संविधान चौकात एकत्र आले. यावेळी आयोजित सभेत संयोजक नारायण जांभुळे, कृती समितीचे उपाध्यक्ष बळीराम गडमडे, रामराव नन्नावरे, विद्यार्थी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अतुल श्रीरामे, विदर्भ अध्यक्ष कुलदिप श्रीरामे, संदीप खडसन, नामदेव घोडमारे, प्रविण चौधरी, मिनाक्षी वाघ, रोशन ढोक, गुणवंत श्रीरामे, श्रीकांत एकुडे, संजु बारेकर, सुभाष नन्नावरे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी नारायण जांभुळे यांनी न्यायालयाने आदेश देऊनही प्रशासन माना समाज बांधवांची दिशाभूल करीत असल्याचे मत व्यक्त केले. बोलताना गोपाल गडमल यांनी वैधता प्रमाणपत्रासाठी तीव्र आंदोलन करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले. प्रा. गोविंद चौधरी यांनी सुप्रिम कोर्टाने आदेश देऊनही प्रशासनाला जाग येत नसल्याचे सांगून वैधता प्रमाणपत्र देण्यासाठी भाग पाडू असा इशारा दिला. कुलदिप श्रीरामे यांनी माना समाज एकत्र आल्यामुळे आता वैधता प्रमाणपत्राचा प्रश्न सुटल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास व्यक्त केला. श्रीकांत धोटे यांनी न्याय मिळाल्याशिवाय माना समाज मागे हटणार नसल्याचे सांगितले. रामराव नन्नावरे यांनी आजपर्यंत अनेकदा मोर्चा काढूनही आश्वासनाशिवाय काहीच पदरात पडले नसल्याचे मत व्यक्त करून आता ठोस कृती करण्याची गरज असल्याचे सांगितले. पोलिसांनी परवानगी नसल्यामुळे मोर्चा काढण्यास मनाई केली. अखेर माना समाज बांधवांनी अप्पर आदिवासी आयुक्तांना आंदोलनस्थळी बोलविण्याची मागणी करून ते येईपर्यंत ठिय्या आंदोलन करण्याचा निर्णय घेतला. आंदोलनात नागपूर, वर्धा, गोंदिया, भंडारा जिल्ह्यातून आलेले माना समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.माना समाजबांधवांच्या मागण्या-अवैध केलेल्या जात प्रमाणपत्राचे आदेश मागे घेऊन जात वैधता प्रमाणपत्र द्यावे-प्रलंबित असलेले प्रस्ताव निकाली काढून त्वरीत जात वैधता प्रमाणपत्र निर्गमित करावे-खारीज व परत केलेले प्रस्ताव निकाली काढून जात प्रमाणपत्र द्यावे-माना जमातीचे प्रलंबित प्रस्ताव निकाली काढण्यासाठी विशेष मोहिम राबवावी

 

टॅग्स :agitationआंदोलन