शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
2
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
3
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
4
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
5
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
6
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
7
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
8
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
9
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
10
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
11
"संघाने आता नथुराम आणि मनुस्मृतीला तिलांजली देऊन गांधी विचार आणि संविधान स्वीकारावे’’, काँग्रेसने दिला सल्ला  
12
भारतावर राज्य करण्याचं स्वप्न, ५० लाख हल्लेखोरांची फौज, शेजारील देशात आखला जातोय भयानक कट 
13
“मातोश्रीवर हल्ल्याचा आणि राज ठाकरेंना मारायचा कट होता”; प्रदीप शर्मांनी सांगितला 'एन्काउंटर'चा थरार
14
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
15
भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त
16
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
17
तुमचा गॅस एजन्सीवाला चांगली सेवा देत नाही? मोबाईल सिमप्रमाणे आता LPG गॅस कंपनी बदला
18
“नवी मुंबईत सत्ता हे आनंद दिघेंचे स्वप्न, महायुतीचे आम्ही पाहू, तुम्ही फक्त...”: एकनाथ शिंदे
19
गर्दीवर दगडफेक, पोलिसांकडून लाठीमार, करूरमधील चेंगराचेंगरीबाबत विजयच्या पक्षाला वेगळाच संशय, केली अशी मागणी 
20
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश

जात वैधता प्रमाणपत्रासाठी नागपुरात माना समाजबांधवांचा एल्गार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2018 15:15 IST

न्यायालयाने वेळोवेळी आदेश देऊनही पडताळणी समितीने माना समाज बांधवांना वैधता प्रमाणपत्र दिले नाही. या विरुद्ध आपला आवाज बुलंद करण्यासाठी शेकडो माना समाज बांधवांनी संविधान चौकात एकत्र येऊन आपला आवाज बुलंद केला.

ठळक मुद्देसंविधान चौकात ठिय्या शेकडो बांधवांनी बुलंद केला आवाज

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : न्यायालयाने वेळोवेळी आदेश देऊनही पडताळणी समितीने माना समाज बांधवांना वैधता प्रमाणपत्र दिले नाही. यामुळे माना समाजातील विद्यार्थी, राजकीय नेते, समाजबांधवांसमोर अनेक अडचणी येत आहेत. या विरुद्ध आपला आवाज बुलंद करण्यासाठी शेकडो माना समाज बांधवांनी संविधान चौकात एकत्र येऊन आपला आवाज बुलंद केला.विदर्भ आदिवासी माना समाज कृती समितीने केलेल्या आवाहनानुसार शुक्रवारी शेकडो माना समाज बांधव संविधान चौकात एकत्र आले. यावेळी आयोजित सभेत संयोजक नारायण जांभुळे, कृती समितीचे उपाध्यक्ष बळीराम गडमडे, रामराव नन्नावरे, विद्यार्थी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अतुल श्रीरामे, विदर्भ अध्यक्ष कुलदिप श्रीरामे, संदीप खडसन, नामदेव घोडमारे, प्रविण चौधरी, मिनाक्षी वाघ, रोशन ढोक, गुणवंत श्रीरामे, श्रीकांत एकुडे, संजु बारेकर, सुभाष नन्नावरे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी नारायण जांभुळे यांनी न्यायालयाने आदेश देऊनही प्रशासन माना समाज बांधवांची दिशाभूल करीत असल्याचे मत व्यक्त केले. बोलताना गोपाल गडमल यांनी वैधता प्रमाणपत्रासाठी तीव्र आंदोलन करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले. प्रा. गोविंद चौधरी यांनी सुप्रिम कोर्टाने आदेश देऊनही प्रशासनाला जाग येत नसल्याचे सांगून वैधता प्रमाणपत्र देण्यासाठी भाग पाडू असा इशारा दिला. कुलदिप श्रीरामे यांनी माना समाज एकत्र आल्यामुळे आता वैधता प्रमाणपत्राचा प्रश्न सुटल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास व्यक्त केला. श्रीकांत धोटे यांनी न्याय मिळाल्याशिवाय माना समाज मागे हटणार नसल्याचे सांगितले. रामराव नन्नावरे यांनी आजपर्यंत अनेकदा मोर्चा काढूनही आश्वासनाशिवाय काहीच पदरात पडले नसल्याचे मत व्यक्त करून आता ठोस कृती करण्याची गरज असल्याचे सांगितले. पोलिसांनी परवानगी नसल्यामुळे मोर्चा काढण्यास मनाई केली. अखेर माना समाज बांधवांनी अप्पर आदिवासी आयुक्तांना आंदोलनस्थळी बोलविण्याची मागणी करून ते येईपर्यंत ठिय्या आंदोलन करण्याचा निर्णय घेतला. आंदोलनात नागपूर, वर्धा, गोंदिया, भंडारा जिल्ह्यातून आलेले माना समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.माना समाजबांधवांच्या मागण्या-अवैध केलेल्या जात प्रमाणपत्राचे आदेश मागे घेऊन जात वैधता प्रमाणपत्र द्यावे-प्रलंबित असलेले प्रस्ताव निकाली काढून त्वरीत जात वैधता प्रमाणपत्र निर्गमित करावे-खारीज व परत केलेले प्रस्ताव निकाली काढून जात प्रमाणपत्र द्यावे-माना जमातीचे प्रलंबित प्रस्ताव निकाली काढण्यासाठी विशेष मोहिम राबवावी

 

टॅग्स :agitationआंदोलन