शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

जात वैधता प्रमाणपत्रासाठी नागपुरात माना समाजबांधवांचा एल्गार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2018 15:15 IST

न्यायालयाने वेळोवेळी आदेश देऊनही पडताळणी समितीने माना समाज बांधवांना वैधता प्रमाणपत्र दिले नाही. या विरुद्ध आपला आवाज बुलंद करण्यासाठी शेकडो माना समाज बांधवांनी संविधान चौकात एकत्र येऊन आपला आवाज बुलंद केला.

ठळक मुद्देसंविधान चौकात ठिय्या शेकडो बांधवांनी बुलंद केला आवाज

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : न्यायालयाने वेळोवेळी आदेश देऊनही पडताळणी समितीने माना समाज बांधवांना वैधता प्रमाणपत्र दिले नाही. यामुळे माना समाजातील विद्यार्थी, राजकीय नेते, समाजबांधवांसमोर अनेक अडचणी येत आहेत. या विरुद्ध आपला आवाज बुलंद करण्यासाठी शेकडो माना समाज बांधवांनी संविधान चौकात एकत्र येऊन आपला आवाज बुलंद केला.विदर्भ आदिवासी माना समाज कृती समितीने केलेल्या आवाहनानुसार शुक्रवारी शेकडो माना समाज बांधव संविधान चौकात एकत्र आले. यावेळी आयोजित सभेत संयोजक नारायण जांभुळे, कृती समितीचे उपाध्यक्ष बळीराम गडमडे, रामराव नन्नावरे, विद्यार्थी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अतुल श्रीरामे, विदर्भ अध्यक्ष कुलदिप श्रीरामे, संदीप खडसन, नामदेव घोडमारे, प्रविण चौधरी, मिनाक्षी वाघ, रोशन ढोक, गुणवंत श्रीरामे, श्रीकांत एकुडे, संजु बारेकर, सुभाष नन्नावरे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी नारायण जांभुळे यांनी न्यायालयाने आदेश देऊनही प्रशासन माना समाज बांधवांची दिशाभूल करीत असल्याचे मत व्यक्त केले. बोलताना गोपाल गडमल यांनी वैधता प्रमाणपत्रासाठी तीव्र आंदोलन करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले. प्रा. गोविंद चौधरी यांनी सुप्रिम कोर्टाने आदेश देऊनही प्रशासनाला जाग येत नसल्याचे सांगून वैधता प्रमाणपत्र देण्यासाठी भाग पाडू असा इशारा दिला. कुलदिप श्रीरामे यांनी माना समाज एकत्र आल्यामुळे आता वैधता प्रमाणपत्राचा प्रश्न सुटल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास व्यक्त केला. श्रीकांत धोटे यांनी न्याय मिळाल्याशिवाय माना समाज मागे हटणार नसल्याचे सांगितले. रामराव नन्नावरे यांनी आजपर्यंत अनेकदा मोर्चा काढूनही आश्वासनाशिवाय काहीच पदरात पडले नसल्याचे मत व्यक्त करून आता ठोस कृती करण्याची गरज असल्याचे सांगितले. पोलिसांनी परवानगी नसल्यामुळे मोर्चा काढण्यास मनाई केली. अखेर माना समाज बांधवांनी अप्पर आदिवासी आयुक्तांना आंदोलनस्थळी बोलविण्याची मागणी करून ते येईपर्यंत ठिय्या आंदोलन करण्याचा निर्णय घेतला. आंदोलनात नागपूर, वर्धा, गोंदिया, भंडारा जिल्ह्यातून आलेले माना समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.माना समाजबांधवांच्या मागण्या-अवैध केलेल्या जात प्रमाणपत्राचे आदेश मागे घेऊन जात वैधता प्रमाणपत्र द्यावे-प्रलंबित असलेले प्रस्ताव निकाली काढून त्वरीत जात वैधता प्रमाणपत्र निर्गमित करावे-खारीज व परत केलेले प्रस्ताव निकाली काढून जात प्रमाणपत्र द्यावे-माना जमातीचे प्रलंबित प्रस्ताव निकाली काढण्यासाठी विशेष मोहिम राबवावी

 

टॅग्स :agitationआंदोलन