शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

एमपीएससी परीक्षा केंद्र बदलण्याच्या मागणीवर भूमिका मांडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2020 11:26 IST

राज्यातील उमेदवारांना राज्य नागरी सेवा पूर्व परीक्षेचे केंद्र स्वत:च्या सोयीनुसार बदलण्याची परवानगी देण्यात यावी, अशा याचिकेवर एका आठवड्यात भूमिका मांडण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी दिला.

ठळक मुद्देराज्य सरकार, एमपीएससीला नोटीस

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोना संक्रमणामुळे संपूर्ण राज्यातील उमेदवारांना राज्य नागरी सेवा पूर्व परीक्षेचे केंद्र स्वत:च्या सोयीनुसार बदलण्याची परवानगी देण्यात यावी, अशा मागणीसह दाखल याचिकेवर एका आठवड्यात भूमिका मांडण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे सचिव आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला दिला.स्टुडन्ट्स राईट्स असोसिएशन ऑफ इंडियाने ही याचिका दाखल केली असून त्यावर न्यायमूर्तीद्वय सुनील शुक्रे व अनिल किलोर यांच्यासमक्ष सुनावणी झाली. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची राज्य नागरी सेवा पूर्व परीक्षा २० सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजता होणार आहे. आधी ही परीक्षा ५ एप्रिल २०२० रोजी होणार होती. कोरोना संक्रमणामुळे परीक्षा पुढे ढकलण्यात आली. परीक्षेकरिता ३७ जिल्ह्यांतील केंद्रांचे पर्याय देण्यात आले होते. काही दिवसांपूर्वी पुणे जिल्ह्यातील उमेदवारांना त्यांचे हित लक्षात घेता परीक्षा केंद्र बदलण्याची मुभा देण्यात आली.

कोरोनामुळे उमेदवार आपापल्या घरी परत गेले आहेत. सार्वजनिक वाहतूक बंद आहे. परिणामी, दूरच्या परीक्षा केंद्रात जाणे शक्य नाही. करिता हा स्वागतार्ह निर्णय घेण्यात आला. परंतु, हा निर्णय घेताना समानतेचे तत्त्व पाळण्यात आले नाही. कोरोनाचा फटका केवळ पुणे जिल्हा नाही तर, संपूर्ण राज्यातील उमेदवारांना बसला आहे. हजारो विद्यार्थ्यांनी परीक्षेकरिता नागपूर, मुंबई, औरंगाबाद, नाशिक अशा मोठ्या शहरांची निवड केली आहे. या शहरात राहून परीक्षेची तयारी करणारे उमेदवार सध्या आपापल्या घरी आहेत. त्यांनाही या काळात लांबच्या परीक्षा केंद्रात येणे शक्य नाही. शेकडो उमेदवार दुर्बल घटकातील आहेत. मोठ्या शहरांमध्ये कोरोनाचीही झपाट्याने वाढ होत आहे. ही बाब लक्षात घेता संपूर्ण राज्यातील उमेदवारांना त्यांच्या सुविधेनुसार परीक्षा केंद्र निवडण्याची अनुमती देण्यात यावी, असे याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे. याचिकाकर्त्यातर्फे अ‍ॅड. अश्विन इंगोले यांनी कामकाज पाहिले.

 

 

टॅग्स :High Courtउच्च न्यायालय