शहरं
Join us  
Trending Stories
1
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
2
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
3
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
4
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
5
आता '४ दिवसीय आठवडा' शक्य! कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा; नवीन कामगार कायद्यात '३ दिवस सुट्टी'ची तरतूद
6
नाईट क्लबमध्ये आग, दिल्लीत मेसेज पोहोचला अन् लुथरा ब्रदर्स थांयलंडमध्ये; पडद्यामागे काय घडलं? Inside Story
7
'डिजिटल अरेस्ट' च्या जाळ्यात अडकली, ३३ लाखांची आरटीजीएसही करायला बँकेती गेली; मॅनेजरच्या लक्षात आले...
8
विमानात अमेरिकन महिलेचा श्वास गुदमरू लागला, देवदूत बनून धावली काँग्रेसची महिला नेता आणि वाचवले प्राण   
9
रेपो रेट कपातीनंतरही FD वर बंपर रिटर्न! SBI मध्ये २ लाख जमा करून मिळेल ८३,६५२ रुपये निश्चित व्याज
10
टेक इंडस्ट्री हादरली! AI मुळे २०२५ मध्ये १.२० लाख नोकऱ्या संपुष्टात; कर्मचारी कपातीत कोणती कंपनी पुढे?
11
डाव्यांच्या गडाला हादरे! माजी आयपीएस आर. श्रीलेखा तिरुवनंतपुरमच्या महापौर होण्याची शक्यता, केरळमध्ये भाजपला मोठे यश  
12
इंडिगोचे संकट वाढले! ८२९ प्रवासी सामुहिक खटला दाखल करणार, एअरलाईन्सवर नामुष्की...
13
मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे यांचे संघस्थानी नमन, अजित पवार गटासह काही आमदार-मंत्र्यांची मात्र दांडी
14
हवा बिघडली अन् वारे फिरले; धुराने कोंडला मुंबईकरांचा श्वास! धूळ, धुके, धुराच्या संयुक्त मिश्रणाने प्रदूषणात वाढ
15
'१९ डिसेंबरला देशात सर्वात मोठा राजकीय भूकंप होणार, भारताचा पंतप्रधान मराठी माणूस बनणार', पृथ्वीराज चव्हाणांचे भाकीत!
Daily Top 2Weekly Top 5

‘आदिवासींसाठी विशेष सुरक्षा कायदा करावा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2019 05:25 IST

आदिवासींसाठी विशेष आर्थिक व सामाजिक सुरक्षा कायदा तयार करावा, वन अधिकार कायद्याचे शंभर टक्के पालन व्हावे

नागपूर : आदिवासींसाठी विशेष आर्थिक व सामाजिक सुरक्षा कायदा तयार करावा, वन अधिकार कायद्याचे शंभर टक्के पालन व्हावे, तसेच नागपूरमध्ये २५ एकर जमीन देऊन गोंडवाना संग्रहालय उभारावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार यांनी केली.भगवान बिरसा मुंडा जयंतीनिमित्त शुक्रवारी मेकोसाबाग स्कूल मैदान, कडबी चौक येथे आयोजित आदिवासी शिक्षा व अधिकार परिषद, आदिवासी जनसंसदेत ते बोलत होते. परिषदेला आ. अनिल देशमुख, आ. नितीन राऊत, आ. विकास ठाकरे, माजी मंत्री रमेश बंग, सतीश चतुर्वेदी, राजेंद्र मुळक, धर्मरावबाबा आत्राम, आ.प्रकाश गजभिये, आ. ख्वाजा बेग, आ.इंद्रनील नाईक, आदिवासी बचाओ आंदोलन बिरसा बिग्रेडचे राष्ट्रीय संरक्षक सतीश पेंदाम आदी उपस्थित होते. यावेळी पवार म्हणाले, अनेक क्षेत्रात आदिवासी मागे राहिले आहेत. गरिबी रेषेखाली सर्वात जास्त आदिवासी आहेत. देशाचा विकास झाला पण आदिवासी मागेच राहिले. या समाजात आता जागृती निर्माण केली पाहिजे.>आदिवासी मुलींशी साधला संवादपरिषदेपूर्वी शरद पवार यांनी देशभरातून आलेल्या आदिवासी मुलींशी संवाद साधला. बहुतांश मुली इंजिनिअर, एमए, बी,एड. अशा उच्चशिक्षित होत्या. या मुलींशी संवाद साधताना पवार म्हणाले, आपल्यापैकी ९० टक्क्यांहून अधिक मुली पदवीधर आहेत. नव्या पिढीला शिक्षणाचे महत्त्व समजले आहे, हे समाजाच्या प्रगतीचे द्योतक आहे.