शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
3
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
4
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
5
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
6
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
7
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
8
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
9
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
10
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
11
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
12
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
13
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
14
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
15
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
16
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
17
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
18
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
19
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
20
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार

सुरक्षितता ‘वे आॅफ लाईफ’ बनावी!

By admin | Updated: February 23, 2015 02:38 IST

सुरक्षितता ‘वे आॅफ लाईफ‘ बनावी, ती नैमित्तिक ठरू नये, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

नागपूर : सुरक्षितता ‘वे आॅफ लाईफ‘ बनावी, ती नैमित्तिक ठरू नये, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. जीवन सुरक्षा प्रकल्पातर्फे दिवंगत मोहन जावडेकर स्मृती विदर्भस्तरीय ‘रस्ते अपघात रक्षक पुरस्कार’ वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. आयटी पार्क मार्गावरील कविकुलगुरू कालिदास सभागृहात पार पडलेल्या या समारंभात मुख्यमंत्री बोलत होते. मंचावर उदयभास्कर नायर, सहपोलीस आयुक्त अनुपकुमार सिंह, पुरस्कार समारंभ समितीचे अध्यक्ष नगरसेवक संदीप जोशी, प्रा. राजा आकाश, समीर बेंद्रे, रूपाली जावडेकर, शरद जिचकार उपस्थित होते. मुख्यमंत्री म्हणाले, आम्ही सुरक्षा सप्ताहाच्या निमित्ताने अपघात टाळण्यासाठी कार्यक्रम घेतो, जनजागरणाचा प्रयत्न करतो. हे प्रयत्न नियमित व्हावेत; कारण अपघातात जीव एखाद्याचा जातो. मात्र, त्याचे दुष्परिणाम संपूर्ण कुटुंबीयांना सहन करावे लागतात. त्यामुळे सुरक्षितता ‘वे आॅफ लाईफ‘ बनावी. अपघात झाल्यानंतर पश्चाताप करण्याऐवजी आम्ही अपघातच होऊ नये, यासाठी प्रयत्न करावे. देशात इतर राज्याच्या तुलनेत महाराष्ट्रात सर्वाधिक रस्ते अपघात होत असल्याबाबत चिंता व्यक्त करून त्यांनी अपघात टाळण्यासाठी वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करण्याची गरज विशद केली. नागपूरला अपघातमुक्त शहर वनविण्यासाठी आणि अपघातग्रस्तांना मदत करण्यासाठी जीवन सुरक्षा प्रकल्प तसेच परसिस्टंटचे जे कार्य आहे त्याचे मुख्यमंत्र्यांनी कौतुक केले. तत्पूर्वी, नगरसेवक जोशी यांनी प्रस्तावना केली. अध्यक्ष राजू वाघ यांनी प्रकल्पाचा उद्देश विशद केला. आम्ही आतापर्यंत २०० लोकांचे प्राण वाचविले आणि १५०० अपघातग्रस्तांना मदत केल्याचे त्यांनी सांगितले. भारतात अशाप्रकारे कार्य करणारी एकमात्र संघटना असल्याचेही ते म्हणाले. जीवन सुरक्षा प्रकल्पाने तयार केलेल्या संकेतस्थळाचेही यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घघाटन झाले. अपघाताची संबंधित यंत्रणांना माहिती देऊन अपघातग्रस्तांना तातडीने मदत करण्याचे काम या संकेतस्थळाच्या माध्यमातून केले जाईल, असेही यावेळी स्पष्ट करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन आणि आभारप्रदर्शन मंदार धर्माधिकारी यांनी केले. परसिस्टंटच्या युवक-युवतींनी अपघात कसे टाळता येईल, त्याचा संदेश देण्यासाठी एक पथनाट्यही सादर केले. या कार्यक्रमात विदर्भात ठिकठिकाणी अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्या रक्षकांनाही यावेळी मोमेन्टो देऊन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. पुरस्कार वितरणाच्या समारंभापूर्वी डॉ. संजय दाचेवार यांनी अपघातग्रस्तांना कशी मदत करायची, याविषयी माहिती दिली. (प्रतिनिधी)लोकमतच्या राजेश टिकले यांना उत्कृष्ट छायाचित्रणाचा पुरस्कार जीवन सुरक्षातर्फे उत्कृष्ट छायाचित्रासाठी प्रदान करण्यात आलेला पुरस्कार लोकमतचे वरिष्ठ छायाचित्रकार राजेश टिकले यांनी मिळवला. जोखीम पत्करून अपघातग्रस्तांना मदत करणारे शौर्य पुरस्कार राजेंद्र वानखेडे, अमन बोरे आणि विनोद गजभिये यांना प्रदान करण्यात आले. वृत्त संकलनासाठी पत्रकार अनिल फेकरीकर यांना तर उल्लेखनीय कामगिरीबद्दल शरद बागडी आणि वाहतूक शाखा एमआयडीसीचे पोलीस कर्मचारी संदीप बोरकर यांना देण्यात आला. पाच हजार रुपये रोख आणि सन्मानचिन्ह तसेच प्रशस्तीपत्र असे पुरस्काराचे स्वरूप होते.