शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: भगूर नगरपरिषदेत शिवसेनेची २५ वर्षांची सत्ता अजितदादांच्या राष्ट्रवादीने उलथवली; पहा लेटेस्ट अपडेट
2
अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी
3
Akkalkot Nagar Parishad Election Result 2025: फटाक्यांची आतषबाजी, विजयाची घोषणा; मतमोजणीआधीच भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू
4
Maharashtra Local Body Election Results 2025: 'या' तीन नगर परिषदा भाजपने जिंकल्या! निकालाआधीच उधळला गुलाल
5
घर खरेदीचे स्वप्न होणार साकार! 'ही' बँक देतेय स्वस्त होम लोन; ५० लाखांच्या कर्जासाठी किती हवी सॅलरी?
6
नात्याला काळीमा! विम्याच्या पैशांसाठी पोटच्या पोरांनीच रचला बापाच्या हत्येचा कट; 'असा' झाला पर्दाफाश
7
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
8
Nora Fatehi : "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती?
9
घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली...
10
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
11
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
12
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
13
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
14
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
15
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
16
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
17
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
18
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
19
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
20
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा बँक कर्मचाऱ्यांना स्थायी करा

By admin | Updated: April 6, 2016 03:08 IST

खुल्या भरतीद्वारे २००९ मध्ये नोकरीवर रुजू झालेल्या १०९ कर्मचाऱ्यांना स्थायी करण्याची मागणी नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या

साखळी उपोषणाचा इशारा : केवळ ३५०० रुपये पगारनागपूर : खुल्या भरतीद्वारे २००९ मध्ये नोकरीवर रुजू झालेल्या १०९ कर्मचाऱ्यांना स्थायी करण्याची मागणी नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सर्व शाखांमध्ये कार्यरत असलेल्या १०९ कर्मचाऱ्यांनी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कदम यांच्याकडे केली. नियमित वेतनश्रेणीवर १५ दिवसांत कायम न केल्यास कामबंद धरणे आंदोलन आणि साखळी उपोषण करणार असल्याची घोषणा कर्मचाऱ्यांनी मंगळवारी लोकमतशी बोलताना केली. मंगळवारी सकाळी ११ वाजता १०९ कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्यांचे निवेदन कदम यांना दिले. सर्व कर्मचारी जुलै २००९ पासून बँकेच्या विविध शाखांमध्ये केवळ ३५०० रुपये मासिक पगारावर कार्यरत आहेत. तेव्हाचे प्रशासक दुष्यंत सिडाम यांनी भरतीद्वारे पदवीधर कर्मचाऱ्यांना बँकेच्या सेवेत सामावून घेतले होते. त्यांचा दोन वर्षांचा परिविक्षाधीन कालावधी होता. तो जुलै २०११ मध्ये संपला. त्यानंतर बँकेची आर्थिक स्थिती चांगली नसल्याची आणि बँकेला परवाना नसल्याची बाब पुढे करून अतिरिक्त चार वर्ष सहा महिन्यांनी वाढविलेला जादाचा कालावधी असा एकूण सहा वर्ष आठ महिन्यांचा होऊनसुद्धा अद्यापही बँकेच्या सेवेत कायम करण्यात आलेले नाही. पुन्हा हाच एकत्रित पगारमानाचा कालावधी ३० सप्टेंबर २०१६ पर्यंत वाढविण्यात आला आहे. बँकेला आर्थिक परवाना मिळाला आहे आणि स्थितीही उत्तम असताना आमचा कालावधी का वाढविण्यात आला, हे एक गूढ असल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले. तुटपुंज्या पगारात सेवा अशक्यएवढ्याशा तुटपुंजा पगारात कुटुंबाला उपाशी ठेवून सेवा देणे अवघड आणि अशक्य आहे. त्यामुळेच आम्हाला बँकेच्या मुख्यालयी कामबंद धरणे आंदोलन आणि साखळी उपोषण करण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. आम्ही पूर्वी संचालक मंडळ आणि प्रशासकीय मंडळाला नोकरीत कायम करण्यासाठी वारंवार निवेदन दिली. पण त्यांनीही निवेदनाची कोणतीही दखल घेतली नाही, असा आरोप कर्मचाऱ्यांनी केला. १०९ कर्मचाऱ्यांना वगळता बँकेतील सर्व नियमित कर्मचाऱ्यांना पूर्ण पगार आणि सुविधा मिळतात, मग आम्हाला काय नाही, असा सवालही कर्मचाऱ्यांनी लोकमतशी बोलताना केला. (प्रतिनिधी)सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांवर बँक मेहरबानआम्हाला कायम करण्याऐवजी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना बँकेत सामावून घेण्याचे धोरण प्रशासकीय मंडळाचे दिसून येते. आतापर्यंत १० पेक्षा जास्त सेवानिवृत्तांना गरज नसतानाही पुन्हा नोकरीत सामावून घेतले आहे. त्यांना आमचा विरोध आहे. गरजू तरुणांना नोकरी देण्याची आमची मागणी आहे.