शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
2
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
3
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
4
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
5
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
6
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
7
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
8
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
9
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
10
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
11
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
12
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
13
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
14
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
15
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
16
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
17
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
18
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
19
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
20
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात आयुर्वेद विद्यापीठ व्हावे

By admin | Updated: October 10, 2015 03:15 IST

महाराष्ट्रात आयुर्वेद विद्यापीठ झाले पाहिजे, या संदर्भात शासन सकारात्मक विचार करेल.

देवेंद्र फडणवीस : श्री आयुर्वेद महाविद्यालयातर्फे रसाचार्यांचा सत्कारनागपूर : महाराष्ट्रात आयुर्वेद विद्यापीठ झाले पाहिजे, या संदर्भात शासन सकारात्मक विचार करेल. या विद्यापीठाचे मॉडेल कसे असावे, ते पूर्णत: सरकारी विद्यापीठ असावे की, आयुर्वेद क्षेत्रात काम करणाऱ्या नामवंत संस्थांनी व व्यक्तींनी एकत्र येऊन स्थापन करावे किंवा विद्यापीठ कायद्याअंतर्गत स्थापन व्हावे याबाबत शासन स्तरावर विचार करण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे दिली.श्री आयुर्वेद महाविद्यालयाच्या सुवर्ण जयंती महोत्सवाअंतर्गत सुवर्ण जयंती स्मरणिका ‘बखरश्रीची ’चे प्रकाशन तसेच १७ रसाचार्यांच्या सन्मान सोहळ्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी भारतीय वैद्यक समन्वय समितीचे अध्यक्ष सुरेश शर्मा हे होते.मुख्यमंत्री म्हणाले, आयुर्वेद हे अतिप्राचीन उपचाराचे शास्त्र आहे, जेव्हा ‘मॉडर्न मेडिसीन’ नव्हती त्यावेळी आयुर्वेदाद्वारेच उपचार व्हायचे. परंतु सध्याच्या ‘मॉडर्न मेडिसीन’च्या जगात आयुर्वेदाला पूर्वीचे स्थान राहिले नाही. संपूर्ण जग आयुर्वेदाकडे वळत असताना, देशातील आयुर्वेद पॅथीवरील आपला विश्वास कमी झाला आहे. आयुर्वेद शास्त्रात अधिक संशोधन होण्याची गरज आहे. एखाद्या रोगाच्या मुळाशी जाऊन तो रोग पूर्णपणे नष्ट करण्याची ताकद आयुर्वेदात आहे. जिथे अ‍ॅलोपॅथी उपचार अपुरे पडतात त्यानंतर आयुर्वेदाकडे वळलेले अनेक रुग्ण दीर्घ उपचारानंतर बरे झालेले आहेत. त्यामुळे आपल्या देशाने आयुर्वेदाचे महत्त्व ओळखून ते सामान्यापर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले.प्रास्ताविक भारतीय वैद्यक समन्वय समितीचे सचिव डॉ. गोविंदप्रसाद उपाध्याय यांनी केले. त्यांनी श्री आयुर्वेद महाविद्यालयासंदर्भातील अडचणी मांडत, नागपुरात स्वतंत्र आयुष विद्यालय निर्माण करण्याची मागणी केली. कार्यक्रमात ‘बखरश्रीची’ या स्मरणिकेचे प्रकाशन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. संचालन वैद्य संदीप शिरवळकर यांनी केले. कार्यक्रमाला वैद्य वेदप्रकाश शर्मा, वैद्य सीताराम शर्मा, वैद्य मृत्युंजय शर्मा, डॉ. उपेंद्र कोटेकर, प्राचार्या वैद्य मनीषा कोटेकर, रमण बेलगे, ब्रजेश मिश्रा, वैद्य रचना रामटेके उपस्थित होते. (प्रतिनिधी)