शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange: "ही ओबीसीची सभा नसून..." बीडमधील महाएल्गार सभेवर मनोज जरांगेंची टीका
2
Goa Cylinder Blast: दक्षिण गोव्यातील विजय मरीनमध्ये सिलेंडरचा स्फोट; २ ठार, ५ जखमी
3
एकजुटीचा प्रकाश... मनसेच्या 'दीपोत्सवा'त उद्धव ठाकरेंचं ५५ शब्दांचं भाषण, काय संदेश दिला?
4
Rivaba Jadeja Minister: रिवाबा जडेजा यांना कोणतं खातं मिळालं, गुजरातचे नवे गृहमंत्री कोण? खातेवाटप जाहीर
5
चीनमध्ये राजकीय धमाका! जिनपिंग यांचे 'उत्तराधिकारी' वेइडोंगना अचानक पदावरून हटवले, कारण...
6
खरं उद्धट कोण? बिग बींसमोर बसलेला १० वर्षांचा मुलगा, की... क्रिकेटरची विचार करायला भाग पाडणारी पोस्ट
7
'उद्धव ठाकरेंकडून बाण निघून गेलाय आणि उरले फक्त खान'; भाजपने राज ठाकरेंचा व्हिडीओच दाखवला
8
Politics: "क्षण आनंदाचा, सण नात्यांचा" ठाकरे कुटुंबाकडून दिवाळीच्या खास शुभेच्छा! फोटो व्हायरल
9
Naxal-free: 'आम्ही नक्षलवादी नाही' गडचिरोलीतील चारभट्टी गाव नक्षलमुक्त होताच गावकऱ्यांना अश्रू अनावर
10
दिसायला देवकन्या, पण काम न शोभणारं; अनेक तरुणांना प्रेमाची मिठी देणारी काजल पकडली
11
७५ बसस्थानकांवर मोफत 'वाचन कट्टा'; PM मोदींच्या 'पंचाहत्तरी'निमित्त एसटीचा अनोखा उपक्रम!
12
माझं तुझ्यावर प्रेम नाहीये..; तरूणीने दिला नकार; संतापलेल्या तरूणाने मग भररस्त्यातच...
13
महाराष्ट्र सरकारने गौमातेला दिलेला राज्य मातेचा दर्जा कागदावरच, स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांची टीका 
14
दिवाळीत ट्राय करा या फोटोशूट पोझ, दिसाल एकदम खास, प्रत्येक पोस्टवर होईल लाईक्सची बरसात
15
लाल दहशतीचा अंत! छत्तीसगडमध्ये 210 माओवाद्यांचे आत्मसमर्पण; बस्तर नक्षलमुक्त...
16
Gujarat Cabinet Reshuffle: काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष अर्जून मोढवाडिया गुजरात सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री
17
Ajit Agarkar: शमी टीम इंडियामधून का बाहेर? रोहित- कोहली वर्ल्डकप खेळतील का? आगरकर म्हणाले.
18
विदर्भ हादरला! पतीसोबत पूजाचं बिनसलं, एक्स बॉयफ्रेंड शुभमसोबत पुन्हा प्रेमसंबंध अन् झाला भयंकर शेवट
19
'तिच्या'आवाजाला भुलला अन् दोन कोटी गमावून बसला; नाशिकच्या उद्योजकासोबत फेसबुकवर काय घडले?
20
IND vs AUS : कॅप्टन्सीवरून हटवण्यात आल्यावर रोहित शर्मा पहिल्यांदाच कोच गंभीर यांना भेटला अन्.... (VIDEO)

वादळग्रस्तांना सर्व सुविधा उपलब्ध करा

By admin | Updated: May 24, 2016 02:40 IST

येत्या शुक्रवारपर्यंत काटोल-नरखेड तालुक्यातील वादळग्रस्त भागाचा वीजपुरवठा सुस्थितीत करा.

पालकमंत्री बावनकुळे यांचे निर्देश : दुष्काळी भागाचा पाहणी दौरानागपूर : येत्या शुक्रवारपर्यंत काटोल-नरखेड तालुक्यातील वादळग्रस्त भागाचा वीजपुरवठा सुस्थितीत करा. तसेच नुकसानग्रस्त नागरिकांना आवश्यक ती सर्व मदत युद्धस्तरावर पुरवा. उन्हाळा असल्यामुळे या भागातील पाणीटंचाईचे निवारण महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्वत: उपस्थित राहून करावे. पाच दिवसांत गावांचे नियमितपणे व्यवहार सुरू व्हावेत अशा व्यवस्था करण्याचे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी जिल्हा प्रशासन व महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिले.काटोल-नरखेड तालुक्यात गेल्या १९ मे रोजी आलेल्या चक्रीवादळाने झालेल्या नुकसानीची पाहणी करून वादळग्रस्तांना पुरवण्यात येणाऱ्या सोयी सुविधांची पाहणी करण्यासाठी पालकमंत्री बावनकुळे यांनी सोमवारी या भागाचा दौरा केला. यावेळी या भागाचे आमदार डॉ. आशिष देशमुख, डॉ. राजीव पोतदार, जिल्हाधिकारी सचिन कुर्वे, जि.प.चे शिक्षण सभापती उमेश चव्हाण, महावितरणचे मुख्य अभियंता प्रसाद रेशमे, काटोलचे उपविभागीय अधिकारी अविनाश कातडे उपस्थित होते.गेल्या १९ मे रोजी झालेल्या चक्रीवादळाच्या तडाख्याने जामगाव व खापा या दोन गावांचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. जामगावातील १५२ घरांचे नुकसान झाले. तर १०८ हेक्टर जमिनीवरील पिकाचे नुकसान वादळाने झाल्याचे आढळले. वादळाच्या तडाख्यात एकूण १० गावे सापडली होती. ही दहा गावे नरखेड तालुक्यातील होती. पाच मिनिटे झालेल्या या वादळात ३८५ घरांचे नुकसान होऊन ३३५ हेक्टर जमिनीवरील शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान झाल्याचा प्राथमिक सर्वेक्षणाचा अहवाल आहे.चक्रीवादळाच्या तडाख्यात सापडलेल्या गावांमधील वीजपुरवठा दोन दिवस खंडित होता. पण सोमवारी फक्त जामगाव वगळता संपूर्ण गावातील वीजपुरवठा सुरळीत झाला आहे. जामगाव येथील वीजपुरवठा आज सायंकाळपर्यंत सुरळीत होईल. वादळग्रस्त भागात जिल्हा प्रशासन व महावितरणच्या चमू युद्धस्तरावर काम करीत असून वरिष्ठ अधिकारी प्रत्यक्ष घटनास्थळावर हजर आहेत. वादळामुळे ३३ केव्हीचे १६ पोल खाली पडले. लोखंडी खांबे वाकून ते इंग्रजीच्या यू आकाराचे झाले. सिमेंटचे विजेचे खांब मधून तुटले. एवढेच नव्हे तर जामगाव येथील ट्रॉन्सफॉर्मर डीपी खाली पडली. मोठमोठी शेकडो झाडे विजेच्या तारांवर पडल्यामुळे खांब वाकले. ११ केव्हीचे २८ खांब वाकले. घरगुती वीजपुरवठा करणारे गावठाणातील २० खांब वाकले व शेतकऱ्याच्या कृषिपंपाचे १५० खांब वाकले आहेत. दोन ट्रॉन्सफॉर्मर वादळामुळे बिघडले. वादळगस्त भागाचे वीज साहित्याचे मोठ्या प्रमाणात झालेले नुकसान पाहता वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला असून नुकसानग्रस्त भागातील वीज पुरवठ्याच्या साहित्याचा निधी लवकर उपलब्ध होईल, असेही पालकमंत्री बावनकुळे म्हणाले.जामगाव व परिसरात खंडित वीज पुरवठ्यामुळे पाणीपुरवठा खंडित झाला. परिणामी जिल्हा प्रशासनाने तीन टँकरने गावाला पाणीपुरवठा सुरू केला असून नुकसानग्रस्त नागरिकांना प्रत्येकी पाच किलो गहू व तांदूळ देण्यात येत आहेत. तसेच रॉकेलचा पुरवठाही उपलब्ध करून देण्यात आला आहे.वादळानंतर सुमारे आठवडाभरात जनजीवन सामान्य होत आहे. शासनाच्या संबंधित विभागाच्या चमू या भागात दाखल झाल्या आहेत. शेतकऱ्यांच्या नुकसानीचा अंदाज व सर्वेक्षण सुरू असून अनेकांची घरावरील छपरे उडून गेली. जनावरांचे गोठेही जमीनदोस्त झाले. वादळामुळे एक गाय व एक बैल दगावला. या दोन्ही जनावरांची नुकसानभरपाई संबंधित शेतकऱ्याला देण्याचे निर्देशही पालकमंत्र्यांनी यावेळी दिले.(प्रतिनिधी)