शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
2
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
3
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
4
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
5
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
6
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
7
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
8
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
9
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
10
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
11
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
12
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?
13
Israel–Iran War : इस्त्रायल-इराण युद्धात जग दोन गटात विभागले! 'या' मुस्लीम देशांनी घेतली इराणची बाजू; भारत कोणासोबत?
14
BCCI ने जाहीर केलं 'टीम इंडिया'चं पुढल्या वर्षीचं वेळापत्रक, रोहित-विराट 'या' तगड्या संघाविरूद्ध मैदानात उतरणार
15
केदारनाथला जाण्यासाठी हेलिकॉप्टरचं तिकीट किती? अपघात झाल्यास कोण देतं भरपाई?
16
Bhiwandi Fire: भिवंडीत भीषण आगीत, १२ केमिकल गोदामे जळून खाक!
17
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
18
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
19
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
20
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !

'मैत्रेय'ची मालमत्ता विकून ठेवी परत करा :  विधानसभेत विकास ठाकरे यांची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2019 23:14 IST

मैत्रेय उद्योग परिवार (समूह ) मुंबई या कंपनीने नागपुरात कार्यालय उघडून नागरिकांना मोठमोठे आमिष देऊन ग्राहकांच्या ठेवी स्वीकारल्या. त्यानंतर फेब्रुवारी २०१६ मध्ये कंपनी अचानक बंद करून ग्राहकांची फसवणूक केली.

ठळक मुद्देगुंतवणूकदारांना दिलासा द्या

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : मैत्रेय उद्योग परिवार (समूह ) मुंबई या कंपनीने नागपुरात कार्यालय उघडून नागरिकांना मोठमोठे आमिष देऊन ग्राहकांच्या ठेवी स्वीकारल्या. त्यानंतर फेब्रुवारी २०१६ मध्ये कंपनी अचानक बंद करून ग्राहकांची फसवणूक केली. त्यामुळे आता संबंधित कंपनीच्या मालमत्तेची विक्री करून ग्राहकांचे पैसे परत द्यावे, अशी मागणी काँग्रेसचे आ. विकास ठाकरे यांनी विधानसभेत केली.आ. विकास ठाकरे यांनी औचित्याचा मुद्दा उपस्थित करीत या महत्त्वाच्या प्रश्नाकडे सरकारचे लक्ष वेधले. ते म्हणाले, नागपूर आणि विदर्भातील ग्राहकांनी सुमारे २५० कोटींहून अधिक रकमेची गुंतवणूक या कंपनीत केली आहे. एकट्या नागपूर शहरातून सुमारे ५० कोटींची गुंजवणूक झाली आहे. कंपनीने कोट्यवधींच्या ठेवी स्वीकारल्या व फेब्रुवारी २०१६ मध्ये अचानक कंपनी बंद करून पळ काढला. नागरिकांनी हेलपाटे मारूनही त्यांची रक्कम त्यांना परत मिळाली नाही. शेकडो नागरिकांनी पोलिसात तक्रार दाखल केल्यानंतर राज्य सरकारने वर्षभरापूर्वी संबंधित कंपनीची काही मालमत्ता जप्त केली. संबंधित मालमत्तेची विक्री करून ग्राहकांना त्यांच्या ठेवी परत कराव्या, यासाठी राज्य सरकारने पुढाकार घ्यावा, अशी मागणी ठाकरे यांनी केली.

सिमेंट रोडच्या कामांची चौकशी करा

नागपूर शहरातील सिमेंट रस्त्यांची कामे अर्धवट झाली असून कामही संथगतीने सुरू आहे. संबंधित रस्त्यांची कामे किती कालावधीत पूर्ण करायची होती, कंत्राटदाराने कामे मुदतीत पूर्ण केली का, कामात गुणवत्ता राखली जात आहे का, या सर्व बाबींची चौकशी करावी, अशी मागणी आमदार विकास ठाकरे यांनी शुक्रवारी विधानसभेत केली.सार्वजनिक बांधकाम विभागाच्या पुरवणी मागण्यांवर बोलताना आ. ठाकरे यांनी नागपूर शहरातील सिमेंट रस्त्यांच्या कामाकडे सरकारचे लक्ष वेधले. ठाकरे म्हणाले, पश्चिम नागपूर मतदारसंघात तेलंखेडी, झिंगाबाई टाकळी, फुटाळा, टाकळी फिडर रोड, घाट रोड, सेमिनरी हिल रोड येथे सिमेंट रोडचे काम संथ गतीने सुरू आहे. कामे अर्धवट झाल्यामुळे वाहतुकीची कोंडी होत असून नागरिकांचे अपघात होत आहेत. रस्त्यावरील धूळ उडत असून  नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्याच्या कडेला असलेल्या दुकानांमध्ये धुळीचे थर साचत आहेत. काही कामांची मुदत संपूनही ती पूर्ण झालेली नाहीत. अधिकारी कंत्राटदारावर कारवाई करीत नाही. या सर्व प्रकाराची गंभीर दखल घेऊन चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली. सोबतच  संबंधित रस्त्यांची कामे तातडीने पूर्ण व्हावी यासाठी सरकारने आवश्यक निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणीही त्यांनी केली. 

टॅग्स :Vikas Thakreविकास ठाकरेInvestmentगुंतवणूकvidhan sabhaविधानसभा