शहरं
Join us  
Trending Stories
1
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
2
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
3
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
4
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
5
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
6
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
7
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
8
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
9
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
10
Maharashtra Politics : सांगलीत जयंत पाटलांना धक्का! अण्णासाहेब डांगे यांनी सोडली साथ; भाजपामध्ये केला प्रवेश
11
ताई चांगलं शिकवतात, ओरडत नाही, त्यांची बदली करु नका; तिसरीच्या विद्यार्थ्याचे शरद पवारांना पत्र
12
ट्रम्प सत्य सांगतील, म्हणून PM मोदी त्यांचे नाव घेत नाहीत; राहुल गांधींची बोचरी टीका
13
Jasprit Bumrah Miss Oval Test : जे आधी ठरलंय तसेच होणार! मग बुमराहची जागा कोण घेणार?
14
प्रा. ममता पाठक यांना जन्मठेपेची शिक्षा, पतीच्या खूनाचा आरोप; तो व्हिडिओ झालेला व्हायरल
15
दहशतवाद्यांनी कुंकूच पुसलं मग ऑपरेशनचं नाव 'सिंदूर' कशासाठी? जया बच्चन यांचा परखड सवाल
16
मालकिणीच्या हाताला झटका देऊन कुत्र्याची समोरून येणाऱ्या महिलेवर झडप, धडकी भरवणारा व्हिडीओ!
17
धुळ्यातील जोडपे कोकणात फिरायला आले अन् चिपळूणमधील वशिष्ठी नदीत मारल्या उड्या
18
निखिल रविशंकर यांच्या हाती एअर न्यूझीलंडची धुरा; कोण आहेत ते? जाणून घ्या अधिक माहिती
19
शौचालयात गेलेला मुलगा बाहेर येईना, घरच्यांनी दार तोडलं अन् समोर भयंकर दिसलं!
20
Sheetala Saptami 2025: आज रात्री थोडा जास्तच स्वयंपाक करा, कारण उद्या आहे शितला सप्तमी!

'मैत्रेय'ची मालमत्ता विकून ठेवी परत करा :  विधानसभेत विकास ठाकरे यांची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2019 23:14 IST

मैत्रेय उद्योग परिवार (समूह ) मुंबई या कंपनीने नागपुरात कार्यालय उघडून नागरिकांना मोठमोठे आमिष देऊन ग्राहकांच्या ठेवी स्वीकारल्या. त्यानंतर फेब्रुवारी २०१६ मध्ये कंपनी अचानक बंद करून ग्राहकांची फसवणूक केली.

ठळक मुद्देगुंतवणूकदारांना दिलासा द्या

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : मैत्रेय उद्योग परिवार (समूह ) मुंबई या कंपनीने नागपुरात कार्यालय उघडून नागरिकांना मोठमोठे आमिष देऊन ग्राहकांच्या ठेवी स्वीकारल्या. त्यानंतर फेब्रुवारी २०१६ मध्ये कंपनी अचानक बंद करून ग्राहकांची फसवणूक केली. त्यामुळे आता संबंधित कंपनीच्या मालमत्तेची विक्री करून ग्राहकांचे पैसे परत द्यावे, अशी मागणी काँग्रेसचे आ. विकास ठाकरे यांनी विधानसभेत केली.आ. विकास ठाकरे यांनी औचित्याचा मुद्दा उपस्थित करीत या महत्त्वाच्या प्रश्नाकडे सरकारचे लक्ष वेधले. ते म्हणाले, नागपूर आणि विदर्भातील ग्राहकांनी सुमारे २५० कोटींहून अधिक रकमेची गुंतवणूक या कंपनीत केली आहे. एकट्या नागपूर शहरातून सुमारे ५० कोटींची गुंजवणूक झाली आहे. कंपनीने कोट्यवधींच्या ठेवी स्वीकारल्या व फेब्रुवारी २०१६ मध्ये अचानक कंपनी बंद करून पळ काढला. नागरिकांनी हेलपाटे मारूनही त्यांची रक्कम त्यांना परत मिळाली नाही. शेकडो नागरिकांनी पोलिसात तक्रार दाखल केल्यानंतर राज्य सरकारने वर्षभरापूर्वी संबंधित कंपनीची काही मालमत्ता जप्त केली. संबंधित मालमत्तेची विक्री करून ग्राहकांना त्यांच्या ठेवी परत कराव्या, यासाठी राज्य सरकारने पुढाकार घ्यावा, अशी मागणी ठाकरे यांनी केली.

सिमेंट रोडच्या कामांची चौकशी करा

नागपूर शहरातील सिमेंट रस्त्यांची कामे अर्धवट झाली असून कामही संथगतीने सुरू आहे. संबंधित रस्त्यांची कामे किती कालावधीत पूर्ण करायची होती, कंत्राटदाराने कामे मुदतीत पूर्ण केली का, कामात गुणवत्ता राखली जात आहे का, या सर्व बाबींची चौकशी करावी, अशी मागणी आमदार विकास ठाकरे यांनी शुक्रवारी विधानसभेत केली.सार्वजनिक बांधकाम विभागाच्या पुरवणी मागण्यांवर बोलताना आ. ठाकरे यांनी नागपूर शहरातील सिमेंट रस्त्यांच्या कामाकडे सरकारचे लक्ष वेधले. ठाकरे म्हणाले, पश्चिम नागपूर मतदारसंघात तेलंखेडी, झिंगाबाई टाकळी, फुटाळा, टाकळी फिडर रोड, घाट रोड, सेमिनरी हिल रोड येथे सिमेंट रोडचे काम संथ गतीने सुरू आहे. कामे अर्धवट झाल्यामुळे वाहतुकीची कोंडी होत असून नागरिकांचे अपघात होत आहेत. रस्त्यावरील धूळ उडत असून  नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्याच्या कडेला असलेल्या दुकानांमध्ये धुळीचे थर साचत आहेत. काही कामांची मुदत संपूनही ती पूर्ण झालेली नाहीत. अधिकारी कंत्राटदारावर कारवाई करीत नाही. या सर्व प्रकाराची गंभीर दखल घेऊन चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली. सोबतच  संबंधित रस्त्यांची कामे तातडीने पूर्ण व्हावी यासाठी सरकारने आवश्यक निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणीही त्यांनी केली. 

टॅग्स :Vikas Thakreविकास ठाकरेInvestmentगुंतवणूकvidhan sabhaविधानसभा