शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही इंग्रजी आहोत का? इथे लंडनमधून राहायला आलोय का?" बावनकुळेंनी ठाकरे बंधूंना सुनावलं
2
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
3
ऐन महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत राज्य मंत्रिमंडळाची बैठक; चार मोठे निर्णय घेतले
4
अतिशय गुप्तपणे भारताने बंगालच्या खाडीत केला मोठा धमाका; कित्येक किमी पसरला आवाज, चीनला धडकी
5
"भगवा झेंडा पाहून TMC चा लाठीचार्ज, गुंडांना पोलिसांच्या मागे लपवणं..."; ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
6
Viral Video: भगवान विष्णूची कंबोडियातील मूर्ती लष्कराने पाडली, व्हायरल होत असलेला व्हिडीओचे सत्य काय?
7
"आमचं हिंदुत्व अस्सल, फक्त मतांसाठी भगवी शाल घालणारे आम्ही नाहीत"; मुख्यमंत्र्यांचे राज ठाकरेंना सडेतोड उत्तर
8
भाजपाला धक्का, महादेव जानकरांची काँग्रेससोबत आघाडी, एकत्र निवडणूक लढवणार  
9
Eknath Shinde: आपली पोरं सांभाळू शकत नाहीत, मुंबई काय सांभाळणार? एकनाथ शिंदेंची ठाकरे बंधूंवर टीका
10
'धुरंधर'च्या यशावर रणवीर सिंह गप्प का? सिनेमातील 'डोंगा'नेच दिली प्रतिक्रिया; म्हणाला...
11
Taurus Yearly Horoscope 2026: वृषभ राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल, प्रतिभा आणि संयमाची कसोटी; 'या' वर्षात कुटुंबाची साथ ठरेल यशाची गुरुकिल्ली!
12
"पराभव समोर दिसताच भाजप पैसा आणि जातीचे राजकारण सुरू करते" आदित्य ठाकरेंची बोचरी टीका!
13
विराट सेंच्युरी! किंग कोहलीनं मोडला मास्टर ब्लास्टर सचिनचा रेकॉर्ड; वेगाने गाठला १६००० धावांचा पल्ला
14
नितेश राणे, प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांना कोर्टाचा दणका, बजावलं अजामिनपात्र वॉरंट
15
जपानमध्ये शंभरी पार करणार्‍यांची संख्या लक्षावधी, महिलांचे प्रमाण अधिक; दीर्घायुष्याचे गुपित काय?
16
युतीची घोषणा मात्र जागांचा सस्पेन्स; उद्धवसेना-मनसेत जागावाटपावर 'असा' ठरलाय फॉर्म्युला?
17
सोनं थांबेना, चांदी आवरेना! सोन्याच्या दरात ७०% तर चांदीत १५० टक्क्यांची वाढ; पाहा कुठे पोहोचतील किमती?
18
राष्ट्रवादीचे नेते राहुल कलाटे भाजपमध्ये;पक्षातील कार्यकर्त्यांचा विरोध डावलून दिला प्रवेश
19
Christmas Sale 2025: स्मार्टफोन, कपडे आणि घरगुती उपकरणांवर सवलतींचा पाऊस; वर्षाच्या शेवटी कुठे आहेत बंपर ऑफर्स
20
रोहितच्या शतकानं मन भरलं नाही! चाहत्याची थेट मुंबईचा कर्णधार शार्दुल ठाकूरला विनंती! आम्हाला...
Daily Top 2Weekly Top 5

विकासपर्वाची मु हू र्त मे ढ

By admin | Updated: October 30, 2015 02:53 IST

३१ आॅक्टोबर २०१४ ते ३१ आॅक्टोबर २०१५ ! म्हणायला तर केवळ एकच वर्ष. परंतु वर्षातील या ३६५ दिवसांमध्ये संत्रानगरी अशी ओळख...

देवेंद्र फडणवीस सरकारची वर्षपूर्ती : नागपूरचा ‘स्मार्ट’ प्रवासनागपूर : ३१ आॅक्टोबर २०१४ ते ३१ आॅक्टोबर २०१५ ! म्हणायला तर केवळ एकच वर्ष. परंतु वर्षातील या ३६५ दिवसांमध्ये संत्रानगरी अशी ओळख असलेल्या नागपूरचा विकासाच्या मार्गावर आश्वासक प्रवास सुरू झाला आहे. नागपूरच्याच मातीचे सुपुत्र असलेले देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये उपराजधानीला कधी नव्हे ते प्राधान्य देण्यात येत आहे. वर्षभरात विविध विकासकामांना धडाक्याने सुरुवात झाली आहे. देवेंद्र फडणवीस, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी आणि पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रयत्नांतून नागपूर हळूहळू कात टाकत आहे. परंतु दुसरीकडे नागरिकांच्या अपेक्षादेखील मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. घोषणांची प्रत्यक्ष अंमलबजावणी आणि नागरिकांच्या अपेक्षांची पूर्तता करताना यापुढे सरकारला तारेवरची कसरत करावी लागणार आहे.मुख्यमंत्री झाल्यानंतर विकासाचा अनुशेष दूर करण्यासाठी देवेंद्र फडणवीस पहिल्या दिवसापासूनच कामाला लागले आणि वर्षभरात नागपूरचे नाव जागतिक क्षितिजावर चमकू लागले आहे. देशविदेशातील गुंतवणूकदार नागपूरमध्ये यावे याकरिता जागतिक स्तरावरदेखील ‘मिहान’चे नियोजनबद्ध ‘मार्केटिंग’ सुरू झाले. उद्योग जगताचे लक्ष ‘मिहान’कडे गेले आणि विविध देशांतील गुंतवणूकदारांनी येथे भेट देण्यास सुरुवात केली. रिलायन्स ग्रुपचे अध्यक्ष अनिल अंबानी यांनीदेखील देशातील पहिला ‘एअरोस्पेस पार्क’ प्रकल्प स्थापन करण्यासाठी नागपूरचीच निवड केली. देशातील नामवंत व्यवस्थापन शिक्षण संस्था ‘आयआयएम’मुळे नागपूरची शैक्षणिक ‘हब’कडे वाटचाल सुरू झाली. घोषणा होण्यापासून ते अगदी प्रत्यक्ष वर्ग सुरू होण्यापर्यंतच्या वर्षभरातील वेगवान घडामोडींनी सर्वांना आश्चर्यचकित केले. शिवाय याच वर्षात नागपूरचा समावेश ‘मेट्रो क्लब’मध्ये झाला व ‘मेट्रो’ येण्याचा मार्ग मोकळा झाला. पायाभूत सुविधांचा विकास होत असताना ग्रामीण भागातदेखील आश्वासक चित्र पहायला मिळाले. जलयुक्त शिवार योजनेमुळे सिंचन क्षेत्रात वाढ झाली व शेतकऱ्यांना थेट फायदा झाला. याशिवाय १०० ग्रामपंचायती हागणदारीमुक्त करण्यात आल्या. सामाजिक क्षेत्रातदेखील सरकारने भरीव कार्य केले व दीक्षाभूमी, ड्रॅगन पॅलेस, कोराडी देवी मंदिराच्या विकासासाठी पावले उचलण्यात आली. सामान्य जनतेच्या प्रश्नांना सोडविण्यासाठी दोन समाधान शिबिरांचे यशस्वीपणे आयोजन करण्यात आले. एकूणच या वर्षभरात उद्योग, पायाभूत सुविधा आणि शैक्षणिक क्षेत्रात नागपूरने चांगली मजल मारली. हाती घेतलेल्या योजनांना वेळेत पूर्ण करण्याचे आव्हान शासनासमोर आहे आणि असे झाले तरच नागपूरचा समावेश देशातील अग्रणी शहरांमध्ये होईल, अशी नागपूरकरांची भावना आहे.(प्रतिनिधी)