शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

महावितरण पुन्हा वीज फ्रेंचाईजीच्या दिशेने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 29, 2020 21:29 IST

नागपूरसह जळगाव व औरंगाबाद येथे वीज वितरण फ्रेंचाईजीचा प्रयोग अपयशी ठरल्यानंतरही महावितरणने पुन्हा फ्रेंचाईजीच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे.

ठळक मुद्देमालेगाव, शील-कळवा-मुंब्रामध्ये खासगीकरण, नागपूरबाबतही चर्चा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूरसह जळगाव व औरंगाबाद येथे वीज वितरण फ्रेंचाईजीचा प्रयोग अपयशी ठरल्यानंतरही महावितरणने पुन्हा फ्रेंचाईजीच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे. १ मार्चपासून मालेगाव व शील-कळवा-मुंब्रा येथील वितरण प्रणालीचे खासगीकरण करीत, त्याला फ्रेंचाईजच्या स्वाधीन करण्यात येणार आहे. यासोबतच नागपुरातही पुन्हा फ्रेंचाईजी आणली जाऊ शकते, याचीही चर्चा सुरू झाली आहे.मालेगावची जबाबदारी कोलकाता येथील कंपनी सीईएससीला सोपवण्यात आली आहे. तर शील-कळवा-मुंब्राची जबाबदारी टोरंट कंपनीकडे सोपवली आहे. या कंपन्या १ मार्चपासून कामकाज सांभाळतील. विशेष म्हणजे, केवळ भिवंडीमध्येच फ्रेंचाईजी टिकून आहे. नागपूर, औरंगाबाद आणि जळगाव येथील प्रयोग अपयशी ठरले आहेत. नागपूर शहरातील गांधीबाग, महाल व सिव्हिल लाईन्स डिव्हिजनला फ्रेंचाईजीच्या हवाली करण्यात आले होते. वर्ष २०११ मध्ये स्पॅन्कोला ही जबाबादारी देण्यात आली होती. परंतु कंपनी कामकाज सांभाळू शकली नाही. पुढच्याच वर्षी स्पॅन्कोला एस्सेल समूहाची कंपनी एसएनडीएलने ‘ओव्हरटेक’ केले. कंपनीची थकबाकी २२४ कोटी रुपयांपर्यंत पोहोचली. महावितरणकडून थकबाकीसाठी दबाव टाकला गेल्याने, कंपनीने माघार घेत फ्रेंचाईजी पुढे ठेवण्यास असमर्थता दर्शविली. सप्टेंबरपासून महावितरणने तिन्ही डिव्हिजनचे कामकाज पुन्हा आपल्या ताब्यात घेतले.आता महावितरणतर्फे पुन्हा फ्रेंचाईजीकरणाच्या धोरणाला गती देण्याची चर्चा आहे. नागपुरात तर हा प्रयोग पुन्हा करण्यात येणार नाही ना, असा प्रश्नही निर्माण झाला आहे. असे सांगितले जात आहे की, एसएनडीएलने माघार घेण्यापूर्वी इतर कंपन्यांशी यासंदर्भात चर्चा सुरू होती. काही कंपन्या काम करण्यास इच्छुकही होत्या. महावितरणचे मानणे आहे की, नागपुरातच एसएनडीएल चांगले काम करीत होती. येथे फ्रेंचाईजी मॉडेलबाबत काहीही समस्या नव्हती. केवळ एस्सेल समूहाची आर्थिक स्थिती गडबडल्यामुळे कंपनीला माघार घ्यावी लागली. परंतु सध्या तरी महावितरणचे अधिकारी याबाबत उघडपणे काहीही बोलायला तयार नाही. हा धोरणात्मक निर्णय असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.कामगार संघटनांचा विरोधमहावितरणच्या कामगार संघटनांनी फ्रेंचाईजीकरणाचा तीव्र विरोध केला आहे. महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी फेडरेशनचे अध्यक्ष मोहन शर्मा यांनी म्हटले आहे की, मालेगाव, शील-कळवा-मुंब्रा येथील कर्मचाऱ्यांना फ्रेंचाईजीला सहकार्य न करण्यास सांगण्यात आले आहे. हे कर्मचारी उद्यापासून समानांतर कामकाजात भाग घेणार नाहीत. त्यांचे म्हणणे आहे की, नागपुरातील फ्रेंचाईजी कंपनी अनेक गडबडी करून गेली. आतापर्यंत थकबाकी कायम आहे. पुन्हा फ्रेंचाईजी गोष्ट आली तर वीज कर्मचारी विरोध करतील.

टॅग्स :mahavitaranमहावितरणelectricityवीज