शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
2
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
3
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव
4
ज्याला घुसखोर म्हणून महाराष्ट्रातून हाकललं, त्याला ममता सरकारने आणखी ४ जणांसह बांगलादेशमधून परत आणलं  
5
शेतीसाठी AI धोरण मंजूर, धारावीकरांसाठी खुशखबर, 'या' लोकांचे मानधन दुप्पट; मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय
6
"कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी..."; राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यावर शरद पवारांचे स्पष्ट मत
7
होम लोनचा EMI भरुन-भरुन थकलायत, ही पद्धत वापरुन पाहा; लवकर संपेल तुमचं कर्ज
8
KEM Hospital: ‘केईएममध्ये नव्हे; तर आवारात पाणी तुंबले’ रुग्णालय प्रशासनाची न्यायालयाला माहिती
9
"कमेंट्समध्ये ट्रोल करतात अन् पर्सनल मेसेजमध्ये लोक...", राजेश्वरी खरातने व्यक्त केला राग
10
विमान अपघातापासून बॉलिवूडच्या सुपरस्टारचा थोडक्यात वाचलेला जीव, काय घडलेलं?
11
भयावह क्षण...! विमान कोसळताच विद्यार्थ्यांनी हॉस्टेलच्या बाल्कनीतून मारल्या उड्या, समोर आला हृदयाचा ठोका चुकवणारा नवा VIDEO
12
वर्ल्ड कप आधी स्मृती मानधनाची मुसंडी! ५ वर्षांनी पुन्हा झाली वनडेची 'क्वीन'
13
एअर इंडिया विमान अपघात: प्रेमानंद महाराजांची मोठी शिकवण; तुम्हालाही ‘ती’ गोष्ट माहिती हवीच!
14
Sonam Raghuvanshi : "लग्नानंतर राजा त्याच्या मित्रांसह..."; सोनम रघुवंशीने रिसेप्शनला नवऱ्याला दिलेलं 'हे' वचन
15
स्वामी विवेकानंदांना महाकालीकडे मागायचे होते एक, पण मागितले भलतेच आणि ते मिळालेसुद्धा!
16
'आमच्या देशाकडे पाहिलं तरी डोळे काढून...’, पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांची इस्राइलला धमकी
17
चीन-अमेरिका 'व्यापार युद्धात' लागली भारताची लॉटरी! आकडे बघून ड्रॅगनची झोप उडेल, लागेल मिरची
18
मारुतीची पहिली e Vitara लाँच झाली! व्हेरिअंटनुसार ३५ लाख ते ४२ लाख किंमत, फिचर्स, रेंज आणि कोण घेणार पहा...
19
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्तानची लुडबुड; शाहबाज शरीफ यांना कशाची वाटतेय भीती?
20
विरार- अलिबाग कॉरिडोरच्या भूसंपादनाला मिळणार गती!

महावितरण पुन्हा वीज फ्रेंचाईजीच्या दिशेने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 29, 2020 21:29 IST

नागपूरसह जळगाव व औरंगाबाद येथे वीज वितरण फ्रेंचाईजीचा प्रयोग अपयशी ठरल्यानंतरही महावितरणने पुन्हा फ्रेंचाईजीच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे.

ठळक मुद्देमालेगाव, शील-कळवा-मुंब्रामध्ये खासगीकरण, नागपूरबाबतही चर्चा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूरसह जळगाव व औरंगाबाद येथे वीज वितरण फ्रेंचाईजीचा प्रयोग अपयशी ठरल्यानंतरही महावितरणने पुन्हा फ्रेंचाईजीच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे. १ मार्चपासून मालेगाव व शील-कळवा-मुंब्रा येथील वितरण प्रणालीचे खासगीकरण करीत, त्याला फ्रेंचाईजच्या स्वाधीन करण्यात येणार आहे. यासोबतच नागपुरातही पुन्हा फ्रेंचाईजी आणली जाऊ शकते, याचीही चर्चा सुरू झाली आहे.मालेगावची जबाबदारी कोलकाता येथील कंपनी सीईएससीला सोपवण्यात आली आहे. तर शील-कळवा-मुंब्राची जबाबदारी टोरंट कंपनीकडे सोपवली आहे. या कंपन्या १ मार्चपासून कामकाज सांभाळतील. विशेष म्हणजे, केवळ भिवंडीमध्येच फ्रेंचाईजी टिकून आहे. नागपूर, औरंगाबाद आणि जळगाव येथील प्रयोग अपयशी ठरले आहेत. नागपूर शहरातील गांधीबाग, महाल व सिव्हिल लाईन्स डिव्हिजनला फ्रेंचाईजीच्या हवाली करण्यात आले होते. वर्ष २०११ मध्ये स्पॅन्कोला ही जबाबादारी देण्यात आली होती. परंतु कंपनी कामकाज सांभाळू शकली नाही. पुढच्याच वर्षी स्पॅन्कोला एस्सेल समूहाची कंपनी एसएनडीएलने ‘ओव्हरटेक’ केले. कंपनीची थकबाकी २२४ कोटी रुपयांपर्यंत पोहोचली. महावितरणकडून थकबाकीसाठी दबाव टाकला गेल्याने, कंपनीने माघार घेत फ्रेंचाईजी पुढे ठेवण्यास असमर्थता दर्शविली. सप्टेंबरपासून महावितरणने तिन्ही डिव्हिजनचे कामकाज पुन्हा आपल्या ताब्यात घेतले.आता महावितरणतर्फे पुन्हा फ्रेंचाईजीकरणाच्या धोरणाला गती देण्याची चर्चा आहे. नागपुरात तर हा प्रयोग पुन्हा करण्यात येणार नाही ना, असा प्रश्नही निर्माण झाला आहे. असे सांगितले जात आहे की, एसएनडीएलने माघार घेण्यापूर्वी इतर कंपन्यांशी यासंदर्भात चर्चा सुरू होती. काही कंपन्या काम करण्यास इच्छुकही होत्या. महावितरणचे मानणे आहे की, नागपुरातच एसएनडीएल चांगले काम करीत होती. येथे फ्रेंचाईजी मॉडेलबाबत काहीही समस्या नव्हती. केवळ एस्सेल समूहाची आर्थिक स्थिती गडबडल्यामुळे कंपनीला माघार घ्यावी लागली. परंतु सध्या तरी महावितरणचे अधिकारी याबाबत उघडपणे काहीही बोलायला तयार नाही. हा धोरणात्मक निर्णय असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.कामगार संघटनांचा विरोधमहावितरणच्या कामगार संघटनांनी फ्रेंचाईजीकरणाचा तीव्र विरोध केला आहे. महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी फेडरेशनचे अध्यक्ष मोहन शर्मा यांनी म्हटले आहे की, मालेगाव, शील-कळवा-मुंब्रा येथील कर्मचाऱ्यांना फ्रेंचाईजीला सहकार्य न करण्यास सांगण्यात आले आहे. हे कर्मचारी उद्यापासून समानांतर कामकाजात भाग घेणार नाहीत. त्यांचे म्हणणे आहे की, नागपुरातील फ्रेंचाईजी कंपनी अनेक गडबडी करून गेली. आतापर्यंत थकबाकी कायम आहे. पुन्हा फ्रेंचाईजी गोष्ट आली तर वीज कर्मचारी विरोध करतील.

टॅग्स :mahavitaranमहावितरणelectricityवीज