शहरं
Join us  
Trending Stories
1
भगवान विष्णू यांच्यावरील वक्तव्यासंदर्भात CJI बीआर गवई यांचं स्पष्टिकरण; 'संयम राखायला हवा...', विश्वहिंदू परिषदेचा सल्ला
2
IND vs PAK हस्तांदोलन वादाचा खरा आरोपी सापडला... सामनाधिकारी पॉयक्रॉफ्टची चूकच नव्हती!
3
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
4
अंगणवाडी सेविकांना मिळणार स्मार्टफोन, वाढणार मानधन; योगी आदित्यनाथ यांची मोठी घोषणा
5
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
6
सुनेला वाचवण्यासाठी धावली सासू, पण तेवढ्यात धडाधड कोसळली भिंत, सून वाचली पण...  
7
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
8
सावधान! आयफोन १७च्या नावाखाली फसवणूक, सायबर गुन्हेगार 'असे' करतात खाते रिकामी
9
Sarva Pitru Amavasya 2025: सर्वपित्री अमावस्येला आहे सूर्यग्रहण; काळजीपूर्वक टाळा 'या' चुका!
10
बंगळुरुतील योग गुरुचा 8 महिलांवर अत्याचार; अल्पवयीन पीडितेने दाखवले धाडस, पोलिसांनी आवळल्या मुसक्या
11
३० पैशांवरुन २४ रुपयांवर आला 'हा' शेअर; १ लाखाचे केले ८ कोटी, गुंतवणूकदार मालामाल
12
GST कपातीनंतर Maruti ची मोठी घोषणा! S-Presso ₹ 3.50 लाखात तर Wagon R फक्त...
13
Surya Grahan 2025: ग्रहण सूर्याला मात्र 'या' राशींचे भाग्य येईल फळाला; १०० वर्षांनी जुळून आलाय अपूर्व योग!
14
पेन्शनधारकांसाठी गुड न्यूज! १ ऑक्टोबरपासून NPS चे नियम बदलणार, तरुणांना सर्वाधिक फायदा
15
पोहे आणि उपमा नेहमीच खातो पण त्याचे फायदे माहितीहेत का, दोघांपैकी आरोग्यासाठी बेस्ट काय?
16
पितृपक्ष २०२५ शिवरात्री: व्रतात ‘हे’ मंत्र म्हणा, महादेव प्रसन्न होतील, पूर्वज वरदान देतील!
17
Gold Silver Price 18 September: अचानक का कमी होताहेत सोन्या-चांदीचे दर; पुढेही सुरू राहणार का ही घसरण?
18
ऑनलाइन पद्धतीने मतदाराचे नाव मतदार यादीतून हटवता येते का? निवडणूक आयोग म्हणाले...
19
११ वर्षांनी लहान मुलाच्या प्रेमात पडली २८ वर्षांची तरुणी; लग्नाला नकार मिळाल्यावर मागू लागली ५० लाख!
20
Navi Mumbai: 'कपडे काढ नाहीतर तुझ्या भावालाच संपवेन'; 12 वर्षाच्या मुलीवर घरी नेऊन केला बलात्कार, नवी मुंबईतील घटना

महावितरण पुन्हा वीज फ्रेंचाईजीच्या दिशेने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 29, 2020 21:29 IST

नागपूरसह जळगाव व औरंगाबाद येथे वीज वितरण फ्रेंचाईजीचा प्रयोग अपयशी ठरल्यानंतरही महावितरणने पुन्हा फ्रेंचाईजीच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे.

ठळक मुद्देमालेगाव, शील-कळवा-मुंब्रामध्ये खासगीकरण, नागपूरबाबतही चर्चा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूरसह जळगाव व औरंगाबाद येथे वीज वितरण फ्रेंचाईजीचा प्रयोग अपयशी ठरल्यानंतरही महावितरणने पुन्हा फ्रेंचाईजीच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे. १ मार्चपासून मालेगाव व शील-कळवा-मुंब्रा येथील वितरण प्रणालीचे खासगीकरण करीत, त्याला फ्रेंचाईजच्या स्वाधीन करण्यात येणार आहे. यासोबतच नागपुरातही पुन्हा फ्रेंचाईजी आणली जाऊ शकते, याचीही चर्चा सुरू झाली आहे.मालेगावची जबाबदारी कोलकाता येथील कंपनी सीईएससीला सोपवण्यात आली आहे. तर शील-कळवा-मुंब्राची जबाबदारी टोरंट कंपनीकडे सोपवली आहे. या कंपन्या १ मार्चपासून कामकाज सांभाळतील. विशेष म्हणजे, केवळ भिवंडीमध्येच फ्रेंचाईजी टिकून आहे. नागपूर, औरंगाबाद आणि जळगाव येथील प्रयोग अपयशी ठरले आहेत. नागपूर शहरातील गांधीबाग, महाल व सिव्हिल लाईन्स डिव्हिजनला फ्रेंचाईजीच्या हवाली करण्यात आले होते. वर्ष २०११ मध्ये स्पॅन्कोला ही जबाबादारी देण्यात आली होती. परंतु कंपनी कामकाज सांभाळू शकली नाही. पुढच्याच वर्षी स्पॅन्कोला एस्सेल समूहाची कंपनी एसएनडीएलने ‘ओव्हरटेक’ केले. कंपनीची थकबाकी २२४ कोटी रुपयांपर्यंत पोहोचली. महावितरणकडून थकबाकीसाठी दबाव टाकला गेल्याने, कंपनीने माघार घेत फ्रेंचाईजी पुढे ठेवण्यास असमर्थता दर्शविली. सप्टेंबरपासून महावितरणने तिन्ही डिव्हिजनचे कामकाज पुन्हा आपल्या ताब्यात घेतले.आता महावितरणतर्फे पुन्हा फ्रेंचाईजीकरणाच्या धोरणाला गती देण्याची चर्चा आहे. नागपुरात तर हा प्रयोग पुन्हा करण्यात येणार नाही ना, असा प्रश्नही निर्माण झाला आहे. असे सांगितले जात आहे की, एसएनडीएलने माघार घेण्यापूर्वी इतर कंपन्यांशी यासंदर्भात चर्चा सुरू होती. काही कंपन्या काम करण्यास इच्छुकही होत्या. महावितरणचे मानणे आहे की, नागपुरातच एसएनडीएल चांगले काम करीत होती. येथे फ्रेंचाईजी मॉडेलबाबत काहीही समस्या नव्हती. केवळ एस्सेल समूहाची आर्थिक स्थिती गडबडल्यामुळे कंपनीला माघार घ्यावी लागली. परंतु सध्या तरी महावितरणचे अधिकारी याबाबत उघडपणे काहीही बोलायला तयार नाही. हा धोरणात्मक निर्णय असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.कामगार संघटनांचा विरोधमहावितरणच्या कामगार संघटनांनी फ्रेंचाईजीकरणाचा तीव्र विरोध केला आहे. महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी फेडरेशनचे अध्यक्ष मोहन शर्मा यांनी म्हटले आहे की, मालेगाव, शील-कळवा-मुंब्रा येथील कर्मचाऱ्यांना फ्रेंचाईजीला सहकार्य न करण्यास सांगण्यात आले आहे. हे कर्मचारी उद्यापासून समानांतर कामकाजात भाग घेणार नाहीत. त्यांचे म्हणणे आहे की, नागपुरातील फ्रेंचाईजी कंपनी अनेक गडबडी करून गेली. आतापर्यंत थकबाकी कायम आहे. पुन्हा फ्रेंचाईजी गोष्ट आली तर वीज कर्मचारी विरोध करतील.

टॅग्स :mahavitaranमहावितरणelectricityवीज