शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

महावितरण पुन्हा वीज फ्रेंचाईजीच्या दिशेने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 29, 2020 21:29 IST

नागपूरसह जळगाव व औरंगाबाद येथे वीज वितरण फ्रेंचाईजीचा प्रयोग अपयशी ठरल्यानंतरही महावितरणने पुन्हा फ्रेंचाईजीच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे.

ठळक मुद्देमालेगाव, शील-कळवा-मुंब्रामध्ये खासगीकरण, नागपूरबाबतही चर्चा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूरसह जळगाव व औरंगाबाद येथे वीज वितरण फ्रेंचाईजीचा प्रयोग अपयशी ठरल्यानंतरही महावितरणने पुन्हा फ्रेंचाईजीच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे. १ मार्चपासून मालेगाव व शील-कळवा-मुंब्रा येथील वितरण प्रणालीचे खासगीकरण करीत, त्याला फ्रेंचाईजच्या स्वाधीन करण्यात येणार आहे. यासोबतच नागपुरातही पुन्हा फ्रेंचाईजी आणली जाऊ शकते, याचीही चर्चा सुरू झाली आहे.मालेगावची जबाबदारी कोलकाता येथील कंपनी सीईएससीला सोपवण्यात आली आहे. तर शील-कळवा-मुंब्राची जबाबदारी टोरंट कंपनीकडे सोपवली आहे. या कंपन्या १ मार्चपासून कामकाज सांभाळतील. विशेष म्हणजे, केवळ भिवंडीमध्येच फ्रेंचाईजी टिकून आहे. नागपूर, औरंगाबाद आणि जळगाव येथील प्रयोग अपयशी ठरले आहेत. नागपूर शहरातील गांधीबाग, महाल व सिव्हिल लाईन्स डिव्हिजनला फ्रेंचाईजीच्या हवाली करण्यात आले होते. वर्ष २०११ मध्ये स्पॅन्कोला ही जबाबादारी देण्यात आली होती. परंतु कंपनी कामकाज सांभाळू शकली नाही. पुढच्याच वर्षी स्पॅन्कोला एस्सेल समूहाची कंपनी एसएनडीएलने ‘ओव्हरटेक’ केले. कंपनीची थकबाकी २२४ कोटी रुपयांपर्यंत पोहोचली. महावितरणकडून थकबाकीसाठी दबाव टाकला गेल्याने, कंपनीने माघार घेत फ्रेंचाईजी पुढे ठेवण्यास असमर्थता दर्शविली. सप्टेंबरपासून महावितरणने तिन्ही डिव्हिजनचे कामकाज पुन्हा आपल्या ताब्यात घेतले.आता महावितरणतर्फे पुन्हा फ्रेंचाईजीकरणाच्या धोरणाला गती देण्याची चर्चा आहे. नागपुरात तर हा प्रयोग पुन्हा करण्यात येणार नाही ना, असा प्रश्नही निर्माण झाला आहे. असे सांगितले जात आहे की, एसएनडीएलने माघार घेण्यापूर्वी इतर कंपन्यांशी यासंदर्भात चर्चा सुरू होती. काही कंपन्या काम करण्यास इच्छुकही होत्या. महावितरणचे मानणे आहे की, नागपुरातच एसएनडीएल चांगले काम करीत होती. येथे फ्रेंचाईजी मॉडेलबाबत काहीही समस्या नव्हती. केवळ एस्सेल समूहाची आर्थिक स्थिती गडबडल्यामुळे कंपनीला माघार घ्यावी लागली. परंतु सध्या तरी महावितरणचे अधिकारी याबाबत उघडपणे काहीही बोलायला तयार नाही. हा धोरणात्मक निर्णय असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.कामगार संघटनांचा विरोधमहावितरणच्या कामगार संघटनांनी फ्रेंचाईजीकरणाचा तीव्र विरोध केला आहे. महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी फेडरेशनचे अध्यक्ष मोहन शर्मा यांनी म्हटले आहे की, मालेगाव, शील-कळवा-मुंब्रा येथील कर्मचाऱ्यांना फ्रेंचाईजीला सहकार्य न करण्यास सांगण्यात आले आहे. हे कर्मचारी उद्यापासून समानांतर कामकाजात भाग घेणार नाहीत. त्यांचे म्हणणे आहे की, नागपुरातील फ्रेंचाईजी कंपनी अनेक गडबडी करून गेली. आतापर्यंत थकबाकी कायम आहे. पुन्हा फ्रेंचाईजी गोष्ट आली तर वीज कर्मचारी विरोध करतील.

टॅग्स :mahavitaranमहावितरणelectricityवीज