शहरं
Join us  
Trending Stories
1
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
2
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
3
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
4
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
5
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
6
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
7
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
8
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
9
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
10
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
11
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
12
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
13
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
14
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
15
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
16
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
17
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
18
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
19
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
20
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र

महावितरण म्हणते प्लीज ११ ला जॉईन व्हा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2019 10:23 IST

वीज वितरण कंपनी महावितरण, २०१४ च्या भरती प्रक्रियेत निवड झालेल्या ४६९ उमेदवारांचा शोध घेत आहे. कारण या सर्व उमेदवारांना ११ नोव्हेंबर रोजी नियुक्तीच्या जागी जॉईन करून घ्यायचे आहे.

ठळक मुद्दे२०१४ ची भरती प्रक्रिया ४६९ उमेदवारांचा नोकरी देण्यासाठी शोध सुरू

कमल शर्मा।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मथळा वाचून आश्चर्य वाटले असेल, परंतु हे खरे आहे. वीज वितरण कंपनी महावितरण, २०१४ च्या भरती प्रक्रियेत निवड झालेल्या ४६९ उमेदवारांचा शोध घेत आहे. कारण या सर्व उमेदवारांना ११ नोव्हेंबर रोजी नियुक्तीच्या जागी जॉईन करून घ्यायचे आहे.आता स्वाभाविकपणे प्रश्न निर्माण होतो कीअखेर असे काय झाले. सरकारी नोकरीसाठी लोक काय काय करीत नाही. परंतु येथे स्वत: प्रशासन उमेदवारांना जॉईन करून घेण्यासाठी धावपळ करीत आहे. या उमेदवारांमध्ये असे काय विशेष दडले आहे. चला खरा प्रकार काय ते जाणून घेऊ या.हे सर्व उमेदवार २०१४ मध्ये महावितरणच्या भरती प्रक्रियेत यशस्वी होऊन विद्युत सहायक बनण्यासाठी पात्र ठरले होते. सामाजिक आणि आर्थिक दृष्टीने मागास (ईएसबीसी)च्या नावावर मराठा समाजाला आरक्षण देण्याची सुरुवात याच भरती प्रक्रियेच्या माध्यमातून सुरू झाली होती.परंतु ही प्रक्रिया सुरुवातीपासूनच न्यायालयीन अडचणीत फसली आहे. अगोदर याचिका दाखल करून भरतीसाठी दहावी व आयटीआयमधील गुणांना आधार बनवण्याची मागणी करण्यात आली. न्यायालयाच्या निर्णयावर याला आधार बनवून पुन्हा अर्ज मागवण्यात आले. यादरम्यान मराठा समाजाला आरक्षण देण्यावरून राजकारण तापले. मोर्चे निघायला सुरुवात झाली.निवड झालेल्या ४६९ उमेदवारांची यादी सुद्धा जारी करण्यात आली. परंतु ते जॉईन करण्यापूर्वीच प्रकरण सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचले. अखेर सरकारने ईएसबीसीला एसईबीसी (विशेष दर्जा) दिला. सर्वोच्च न्यायालयानेही हिरवी झेंडी दाखवली. जुलैमध्ये आरक्षणाबाबत जी.आर. सुद्धा जरी झाला. यासोबतच २०१४ च्या भरती प्रक्रियेत निवड झालेल्या उमेदवारांना जॉईन करण्यास सुरुवात करण्यात आली. या उमेदवारांना ३ नोव्हेंबरपर्यंत आपले दस्तावेज महावितरणच्या वेबसाईटवर अपलोड करावयाचे आहे. ११ नोव्हेंबर रोजी त्यांना नियुक्तीच्या जागेवर पोहोचून जॉईन सुद्धा व्हायचे आहे. परंतु समस्या इथेच निर्माण झाली आहे. बहुतांश उमेदवारांशी संपर्क होत नाही आहे. महावितरणच्या वेबसाईटवर आतापर्यंत नाममात्र उमेदवारांनीच आपले दस्तावेज अपलोड केले आहेत. कंपनीचे अधिकारी त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करीत आहेत.मोबाईल नंबर बंद, मेलसुद्धा होताहेत बाऊन्समहावितरणने या उमेदवारांपर्यंत पोहोचण्यासाठी २०१४ मध्ये केलेल्या अर्जासोबत दिलेले मोबाईल क्रमांक आणि ई-मेल वर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतु बहुतांश उमेदवारांचे मोबाईल क्रमांक बंद आहेत किंवा ते दुसऱ्याकडे आहेत. त्याचप्रकारे ई-मेल सुद्धा बाऊन्स होत आहेत. तसेही पाच वर्षापर्यंत महावितरणच्या नोकरीची प्रतीक्षा करीत कोणता उमेदवार रिकामा असेल. दहावीनंतर आयटीआय करणाºया त्या उमेदवारांपर्यंत पोहोचणे आता चांगलेच कठीण होऊन बसले आहे.

टॅग्स :mahavitaranमहावितरण