शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

महावितरण म्हणते प्लीज ११ ला जॉईन व्हा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2019 10:23 IST

वीज वितरण कंपनी महावितरण, २०१४ च्या भरती प्रक्रियेत निवड झालेल्या ४६९ उमेदवारांचा शोध घेत आहे. कारण या सर्व उमेदवारांना ११ नोव्हेंबर रोजी नियुक्तीच्या जागी जॉईन करून घ्यायचे आहे.

ठळक मुद्दे२०१४ ची भरती प्रक्रिया ४६९ उमेदवारांचा नोकरी देण्यासाठी शोध सुरू

कमल शर्मा।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मथळा वाचून आश्चर्य वाटले असेल, परंतु हे खरे आहे. वीज वितरण कंपनी महावितरण, २०१४ च्या भरती प्रक्रियेत निवड झालेल्या ४६९ उमेदवारांचा शोध घेत आहे. कारण या सर्व उमेदवारांना ११ नोव्हेंबर रोजी नियुक्तीच्या जागी जॉईन करून घ्यायचे आहे.आता स्वाभाविकपणे प्रश्न निर्माण होतो कीअखेर असे काय झाले. सरकारी नोकरीसाठी लोक काय काय करीत नाही. परंतु येथे स्वत: प्रशासन उमेदवारांना जॉईन करून घेण्यासाठी धावपळ करीत आहे. या उमेदवारांमध्ये असे काय विशेष दडले आहे. चला खरा प्रकार काय ते जाणून घेऊ या.हे सर्व उमेदवार २०१४ मध्ये महावितरणच्या भरती प्रक्रियेत यशस्वी होऊन विद्युत सहायक बनण्यासाठी पात्र ठरले होते. सामाजिक आणि आर्थिक दृष्टीने मागास (ईएसबीसी)च्या नावावर मराठा समाजाला आरक्षण देण्याची सुरुवात याच भरती प्रक्रियेच्या माध्यमातून सुरू झाली होती.परंतु ही प्रक्रिया सुरुवातीपासूनच न्यायालयीन अडचणीत फसली आहे. अगोदर याचिका दाखल करून भरतीसाठी दहावी व आयटीआयमधील गुणांना आधार बनवण्याची मागणी करण्यात आली. न्यायालयाच्या निर्णयावर याला आधार बनवून पुन्हा अर्ज मागवण्यात आले. यादरम्यान मराठा समाजाला आरक्षण देण्यावरून राजकारण तापले. मोर्चे निघायला सुरुवात झाली.निवड झालेल्या ४६९ उमेदवारांची यादी सुद्धा जारी करण्यात आली. परंतु ते जॉईन करण्यापूर्वीच प्रकरण सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचले. अखेर सरकारने ईएसबीसीला एसईबीसी (विशेष दर्जा) दिला. सर्वोच्च न्यायालयानेही हिरवी झेंडी दाखवली. जुलैमध्ये आरक्षणाबाबत जी.आर. सुद्धा जरी झाला. यासोबतच २०१४ च्या भरती प्रक्रियेत निवड झालेल्या उमेदवारांना जॉईन करण्यास सुरुवात करण्यात आली. या उमेदवारांना ३ नोव्हेंबरपर्यंत आपले दस्तावेज महावितरणच्या वेबसाईटवर अपलोड करावयाचे आहे. ११ नोव्हेंबर रोजी त्यांना नियुक्तीच्या जागेवर पोहोचून जॉईन सुद्धा व्हायचे आहे. परंतु समस्या इथेच निर्माण झाली आहे. बहुतांश उमेदवारांशी संपर्क होत नाही आहे. महावितरणच्या वेबसाईटवर आतापर्यंत नाममात्र उमेदवारांनीच आपले दस्तावेज अपलोड केले आहेत. कंपनीचे अधिकारी त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करीत आहेत.मोबाईल नंबर बंद, मेलसुद्धा होताहेत बाऊन्समहावितरणने या उमेदवारांपर्यंत पोहोचण्यासाठी २०१४ मध्ये केलेल्या अर्जासोबत दिलेले मोबाईल क्रमांक आणि ई-मेल वर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतु बहुतांश उमेदवारांचे मोबाईल क्रमांक बंद आहेत किंवा ते दुसऱ्याकडे आहेत. त्याचप्रकारे ई-मेल सुद्धा बाऊन्स होत आहेत. तसेही पाच वर्षापर्यंत महावितरणच्या नोकरीची प्रतीक्षा करीत कोणता उमेदवार रिकामा असेल. दहावीनंतर आयटीआय करणाºया त्या उमेदवारांपर्यंत पोहोचणे आता चांगलेच कठीण होऊन बसले आहे.

टॅग्स :mahavitaranमहावितरण