शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
6
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
7
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
8
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
9
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
10
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
11
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
12
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
13
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
14
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
15
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
16
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
17
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
18
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
19
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
20
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
Daily Top 2Weekly Top 5

सोलर रूफ टॉप लावणारे संकटात; महाराष्ट्राचे १२३ कोटी रुपये पुन्हा बुडणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2020 07:00 IST

घर-प्रतिष्ठानांमध्ये सोलर रूफ टॉप लावून ऊर्जा संवर्धनात योगदान देणाऱ्यांना या वर्षी सबसिडीपासून वंचित राहावे लागणार आहे.

ठळक मुद्देमहावितरणचे पोर्टल अद्याप तयार नाही

कमल शर्मालोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : घर-प्रतिष्ठानांमध्ये सोलर रूफ टॉप लावून ऊर्जा संवर्धनात योगदान देणाऱ्यांना या वर्षी सबसिडीपासून वंचित राहावे लागणार आहे. केंद्र सरकारने राज्यात ५० मेगाव्हॅट क्षमतेचे सोलर रूफ टॉप लावण्यासाठी १२३ कोटी रुपयाची सबसिडी मंजूर केली आहे. मात्र, सबसिडीकरिता आवेदन करण्यासाठी जे पोर्टल हवे आहे, ते महावितरणने तयारच केले नाही. त्यामुळे, मंजूर झालेले १२३ कोटी रुपये बुडणार आहेत.

विशेष म्हणजे ही समस्या गेल्या वषार्पासून उभी झाली आहे. २०१७-१८मध्ये ११३ कोटी आणि २०१८-१९मध्ये ७७.२२ कोटी रुपये सबसिडी सोलर रूफ टॉप करिता मंजूर करण्यात आली असतानाही, राज्य सरकार व सरकारची विद्युत वितरण कंपनी असलेल्या महावितरणच्या उदासीन धोरणामुळे एप्रिल २०१९ नंतर नागरिकांना ही सबसिडी प्राप्त झालेली नाही. राज्य सरकारने २०१९मध्ये सोलर रूफ टॉपच्या सबसिडीची जबाबदारी महाऊर्जाकडून काढून महावितरणकडे सोपवली होती. मात्र, महाऊर्जा प्रमाणेच महावितरणनेही सबसिडीसंदर्भात कोणतेही स्वतंत्र असे पोर्टल तयार केले नाही. त्यामुळे, त्या वर्षात सोलर रूफ टॉपसाठीच्या सबसिडीकरिता कुणीच आवेदन केले नाही. परिणामत: एप्रिल २०२०मध्ये केंद्राकडून १०० मेगाव्हॅट क्षमतेचे रूफ टॉप विकसित करण्यासाठी मंजूर झालेली १२३ कोटी रुपये सबसिडी बुडाली.

त्यानंतर केंद्राने २०२०-२१साठी सुद्धा महाराष्ट्रात १०० मेगाव्हॅट क्षमता विकसित करण्यासाठी १२३ कोटी रुपये सबसिडी मंजूर केली आहे. परंतु, सहा महिने उलटल्यावरही महावितरणकडून कोणताच पुढाकार घेतला गेला नाही. त्यामुळे, सोलर रूफ टॉप लावणारे संकटात सापडले आहेत. रूफ टॉप लावताना प्रति किलोव्हॅट १४ हजार रुपये सब्सिडी मिळेल, असे आश्वासन त्यांना देण्यात आले होते. मात्र, जेव्हा या आश्वासनपूर्तीकरिता गेले तेव्हा पोर्टल नसल्याने आवेदनच करता येत नसल्याने त्यांना कळाल्याचे सांगितले जात आहे.ऊर्जा संवर्धनापेक्षा, राजस्वाची चिंता जास्त: सोलर रूफ टॉप लावल्याने पारंपारिक उर्जेचा उपयोग कमी होतो आणि त्यामुळे पर्यावरण संवर्धन साधले जाते. मात्र, महावितरणला आपल्या राजस्वाची चिंता जास्त असल्याचे सुत्रांकडून सांगितले जात आहे. सौरऊजेर्चा उपयोग वाढल्याने बिल कमी होईल आणि त्याचा थेट परिणाम महावितरणच्या राजस्वावर पडणार आहे. महावितरणनेही सौरऊजेर्मुळे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्याचे आधीच कबूल केले आहे. याच कारणाने महावितरणने सबसिडीविषयी उदासीण धोरण अवलंबिले आहे. या संदर्भात कंपनीचे अधिकारी बोलण्याची टाळाटाळ करत आहेत, हे विशेष.

टॅग्स :electricityवीज