शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
2
पाकिस्तान: क्वेट्टा येथे लष्करी मुख्यालयाजवळ आत्मघाती हल्ला; १० ठार, ३२ हून अधिक जखमी
3
"शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून लक्ष हटवण्यासाठी अहिल्यानगरमध्ये सरकार पुरस्कृत दंगल झाली’’ काँग्रेसचा गंभीर आरोप
4
बाबाचे 'चाळे'! इन्स्टिट्यूटमधील महिलांसोबतच स्वामी चैतन्यानंदचे संबंध; मोबाईलमध्ये मिळाले फोटो
5
डोनाल्ड ट्रम्प यांचा विजय, युट्यूब देणार २१७ कोटी रुपये; फेसबुक आणि ट्विटरने किती दिलेले?
6
रामललाच्या अयोध्येत दिसणार रामायणातील आणखी २ व्यक्तिरेखा; ऑक्टोबर अखेरपर्यंत काम पूर्ण!
7
चीनची चौथी सर्वात मोठी कार कंपनी भारतात येणार? Tiggo SUV चा डिझाइन पेटंट दाखल 
8
दागिने घालून जिममध्ये जायची सून, अद्दल घडवण्यासाठी सासूने रचला कट; लोकेशन पाठवलं अन्...
9
Social Viral: मज्जा नि लाईफ! विमान ५ तास लेट; प्रवाशांनी एअरपोर्टवर फेर धरला थेट! 
10
Illegal U Turn : पावती फाडण्यासाठी पोहोचले पोलीस, पण रिकाम्या हातानं परतावं लागलं; कारमध्ये डोकावून बघितलं तर...! नेमकं काय घडलं?
11
टाटा, बाय बाय...! आशिया कपमध्ये हरले, बिल या खेळाडूवर फाडले; दक्षिण आफ्रिकेविरोधातील मालिकेसाठी संघातून बाहेर काढले...
12
देवी बनून 'बाहुबली' साम्राज्य उभारण्याचं स्वप्न; कोट्यवधी लोकांची अब्जावधी डॉलर्सची फसवणूक
13
गेमचेंजर! भारतात सापडला 'व्हाइट गोल्ड'चा खजिना; चीनवरील निर्भरता संपणार, नवी क्रांती घडणार
14
"मी आजपर्यंत एकाही कंत्राटदाराकडून कधी..."; भ्रष्टाचार, इथेनॉलच्या आरोपांवर गडकरींनी सोडलं मौन
15
'शालार्थ आयडी' नंतर आणखी एक शिक्षण घोटाळा ! क्षमता नसताना शाळेत १८ शिक्षकांची नियुक्ती कशाला ?
16
MP Accident: देवदर्शनावरून येताना टूरिस्ट बसनं उडवलं, तिघांचा मृत्यू; सणासुदीच्या दिवशी कुटुंबावर शोककळा
17
"ज्यांना नरकात जायचंय, त्यांनी 'गजवा-ए-हिंद'च्या नावावर..."; योगी आदित्यनाथांचा दंगेखोरांना इशारा
18
TCS Layoffs: 'स्वतःहून राजीनामा द्या किंवा टर्मिनेट व्हा'; टीसीएसमध्ये ३० हजार कर्मचाऱ्यांची कपात? TATA समूहाच्या आयटी कंपनीत भीतीचं वातावारण
19
सूत जुळलं! १२वीच्या विद्यार्थिनीचं शिक्षकावर प्रेम जडलं, लग्न केलं अन् आता पतीसाठी मागतेय सुरक्षा
20
दीपिकाला अनफॉलो केलं? चर्चांवर अखेर फराह खानने सोडलं मौन, म्हणाली, "आम्ही दोघींनी..."

सोलर रूफ टॉप लावणारे संकटात; महाराष्ट्राचे १२३ कोटी रुपये पुन्हा बुडणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2020 07:00 IST

घर-प्रतिष्ठानांमध्ये सोलर रूफ टॉप लावून ऊर्जा संवर्धनात योगदान देणाऱ्यांना या वर्षी सबसिडीपासून वंचित राहावे लागणार आहे.

ठळक मुद्देमहावितरणचे पोर्टल अद्याप तयार नाही

कमल शर्मालोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : घर-प्रतिष्ठानांमध्ये सोलर रूफ टॉप लावून ऊर्जा संवर्धनात योगदान देणाऱ्यांना या वर्षी सबसिडीपासून वंचित राहावे लागणार आहे. केंद्र सरकारने राज्यात ५० मेगाव्हॅट क्षमतेचे सोलर रूफ टॉप लावण्यासाठी १२३ कोटी रुपयाची सबसिडी मंजूर केली आहे. मात्र, सबसिडीकरिता आवेदन करण्यासाठी जे पोर्टल हवे आहे, ते महावितरणने तयारच केले नाही. त्यामुळे, मंजूर झालेले १२३ कोटी रुपये बुडणार आहेत.

विशेष म्हणजे ही समस्या गेल्या वषार्पासून उभी झाली आहे. २०१७-१८मध्ये ११३ कोटी आणि २०१८-१९मध्ये ७७.२२ कोटी रुपये सबसिडी सोलर रूफ टॉप करिता मंजूर करण्यात आली असतानाही, राज्य सरकार व सरकारची विद्युत वितरण कंपनी असलेल्या महावितरणच्या उदासीन धोरणामुळे एप्रिल २०१९ नंतर नागरिकांना ही सबसिडी प्राप्त झालेली नाही. राज्य सरकारने २०१९मध्ये सोलर रूफ टॉपच्या सबसिडीची जबाबदारी महाऊर्जाकडून काढून महावितरणकडे सोपवली होती. मात्र, महाऊर्जा प्रमाणेच महावितरणनेही सबसिडीसंदर्भात कोणतेही स्वतंत्र असे पोर्टल तयार केले नाही. त्यामुळे, त्या वर्षात सोलर रूफ टॉपसाठीच्या सबसिडीकरिता कुणीच आवेदन केले नाही. परिणामत: एप्रिल २०२०मध्ये केंद्राकडून १०० मेगाव्हॅट क्षमतेचे रूफ टॉप विकसित करण्यासाठी मंजूर झालेली १२३ कोटी रुपये सबसिडी बुडाली.

त्यानंतर केंद्राने २०२०-२१साठी सुद्धा महाराष्ट्रात १०० मेगाव्हॅट क्षमता विकसित करण्यासाठी १२३ कोटी रुपये सबसिडी मंजूर केली आहे. परंतु, सहा महिने उलटल्यावरही महावितरणकडून कोणताच पुढाकार घेतला गेला नाही. त्यामुळे, सोलर रूफ टॉप लावणारे संकटात सापडले आहेत. रूफ टॉप लावताना प्रति किलोव्हॅट १४ हजार रुपये सब्सिडी मिळेल, असे आश्वासन त्यांना देण्यात आले होते. मात्र, जेव्हा या आश्वासनपूर्तीकरिता गेले तेव्हा पोर्टल नसल्याने आवेदनच करता येत नसल्याने त्यांना कळाल्याचे सांगितले जात आहे.ऊर्जा संवर्धनापेक्षा, राजस्वाची चिंता जास्त: सोलर रूफ टॉप लावल्याने पारंपारिक उर्जेचा उपयोग कमी होतो आणि त्यामुळे पर्यावरण संवर्धन साधले जाते. मात्र, महावितरणला आपल्या राजस्वाची चिंता जास्त असल्याचे सुत्रांकडून सांगितले जात आहे. सौरऊजेर्चा उपयोग वाढल्याने बिल कमी होईल आणि त्याचा थेट परिणाम महावितरणच्या राजस्वावर पडणार आहे. महावितरणनेही सौरऊजेर्मुळे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्याचे आधीच कबूल केले आहे. याच कारणाने महावितरणने सबसिडीविषयी उदासीण धोरण अवलंबिले आहे. या संदर्भात कंपनीचे अधिकारी बोलण्याची टाळाटाळ करत आहेत, हे विशेष.

टॅग्स :electricityवीज