शहरं
Join us  
Trending Stories
1
तंबाखू, सिगारेट अन्..., आणखी महागणार; केवळ ४०% जीएसटीच नव्हे, अतिरिक्त टॅक्सही लागणार?
2
टियागो ७५००० रुपये, नेक्सॉन, हॅरिअर, सफारी खूपच स्वस्त झाली; टाटाने जीएसटी कपातीचे दर जाहीर केले
3
Bhagwant Mann: पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांची प्रकृती बिघडली; हॉस्पिटलमध्ये भरती केले
4
"ब्राह्मण नफा कमावतायेत...!"; ट्रम्प यांच्या सल्लागाराच्या विधानावर भारताचा जोरदार पलटवार, दिलं असं उत्तर!
5
धक्कादायक! अफगाणिस्तानमधील भूकंपामध्ये महिलांना कोण वाचवत नाहीत, तालिबानच्या कायद्यांमुळे बचावकार्यात अडथळे
6
चीन की पाकिस्तान, भारतासाठी सर्वात मोठा धोका कोण? सीडीएस अनिल चौहान यांनी स्पष्ट सांगितले
7
यांचे काहीतरी वेगळेच...! Vivo, सॅमसंग नाही, पाकिस्तानात चालतो हा मोबाईल ब्रँड; ऐकलाही नसेल...
8
'आम्ही रशियाकडून तेल खरेदी करत राहू'; केंद्रीय अर्थमंत्र्याचे मोठे विधान
9
"माझा उद्देश हस्तक्षेप करण्याचा नव्हता, तर...", अजित पवारांनी सोडले मौन; IPS अंजली कृष्णा, व्हायरल व्हिडीओवर काय बोलले?
10
हुआवेचा आणखी एक ट्रिपल फोल्डेबल फोन लॉन्च; सॅमसंग, शाओमी, विवो, ओप्पोची उडाली झोप!
11
प्रसिद्ध फुटबॉलपटू नेमारही अज्ञात होता...! अनोळखी अब्जाधीश १० हजार कोटींची संपत्ती सोडून गेला
12
चांदीच चांदी...! वॅगनआरवर 84 हजार, नेक्सॉनवर 1.55 लाखांपर्यंत जीएसटी कमी होणार; अल्टो, 3XO किंमती पहाल तर...
13
जीएसटी कपातीमुळे सेकंड हँड कार डीलर्सची पळापळ; डिस्काऊंटवर डिस्काऊंट दिला तरी...
14
पीटर नवारोंच्या टीकेला भारताचे चोख प्रत्युत्तर; परराष्ट्र मंत्रालयाने सर्व दावे फेटाळले...
15
Maruti Victoris समोर टिकाव धरेल Grand Vitara? जाणून घ्या, फीचर्स अन् मायलेजच्या बाबतीत कोण सरस?
16
मधमाशांनी थांबवला खेळ! Live मॅचमध्ये फुटबॉलपटूंसह रेफ्री अन् कॅमरामॅनलाही करावी लागली कसरत (VIDEO)
17
चंद्र ग्रहण २०२५: ग्रहण काळात अन्न व साठवलेल्या पाण्यावर आठवणीने ठेवा तुळशीचे पान, कारण... 
18
Pitru Paksha 2025: तिथीनुसार पितरांचे श्राद्ध करा, 'हे' लाभ मिळवा आणि तिथीच माहीत नसेल; तर... 
19
"आम्ही विरोधात असलो तरी..."; रोहित पवारांकडून अंजली कृष्णा प्रकरणावरून अजितदादांची पाठराखण
20
धक्कादायक! बाप्पांसमोर खेळला, बागडला, घरी येऊन आईच्या मांडीवर जीव सोडला; दहा वर्षाच्या मुलाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा घटनाबाह्य आदेश !

By admin | Updated: December 5, 2014 00:39 IST

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने १९ व २५ सप्टेंबर रोजी दिलेला आदेश हा मागासवर्गीयांवर अन्याय करणारा घटनाबाह्य गुणवत्ता नाकारणारा व जातीयवादी भूमिकेतून घेतला असल्याने तो तात्काळ रद्द करण्यात यावा.

अध्यक्ष-सचिवांची हकालपट्टी करा : कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाची मागणी नागपूर : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने १९ व २५ सप्टेंबर रोजी दिलेला आदेश हा मागासवर्गीयांवर अन्याय करणारा घटनाबाह्य गुणवत्ता नाकारणारा व जातीयवादी भूमिकेतून घेतला असल्याने तो तात्काळ रद्द करण्यात यावा. तसेच जातीयवादी भूमिका घेणाऱ्या लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष व सचिवांची शासनाने त्वरित हकालपट्टी करावी, अशी मागणी कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाचे अध्यक्ष अरुण गाडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविलेल्या निवेदनाद्वारे केली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने १ एप्रिल २०१४ रोजी झालेल्या बैठकीत संघ लोकसेवा आयोगाच्या प्रक्रिया कार्यपद्धतीवर एमपीएससीच्या यापुढे घेतल्या जाणाऱ्या परीक्षेच्या कोणत्याही टप्प्यावर मागासवर्गीयांना देय असलेली वय, परीक्षा शुल्क तसेच इतर पात्रता विषयक अटीच्या निकषासंदर्भात सवलत उमेदवारांनी घेतली असल्यास अशा उमेदवारांना अमागासवर्गीय वर्गवारीच्या पदावर शिफारस करता येणार नाही, असा निर्णय दिला आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सनदी अधिकाऱ्यांनी हा आदेश १९ सप्टेंबर व २५ सप्टेंबर २०१४ ला निवडणूक आचारसंहिता लागू असताना काढलेला आहे. एससी, एसटी, ओबीसी, मागास विद्यार्थ्यांनी जर मागासवर्गीय सवलतीचा लाभ घेतला असल्यास त्यांना लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून भरण्यात येणाऱ्या शासनातील खुल्या प्रवर्गातील पदावर नियुक्ती दिली जाणार नाही. हा राज्यघटनेच्या अनुच्छेद १४, १५ व १६-१, १६-२ च्या विरोधात आहे. भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद ३२० प्रमाणे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला महाराष्ट्र शासनातील अधिकारी व कर्मचारी यांची भर्ती करण्याचा अधिकार आहे. परंतु त्या भर्तीचे नियम ठरविण्याचा अधिकार नाही. केंद्र शासनाच्या (डीओपीटी) कार्मिक व प्रशिक्षण विभाग, सेवा विषयक नियम आणि प्रक्रिया ठरवित असते. तसेच विविध शासकीय सेवांमध्ये भरतीसाठी आरक्षणाच्या अंमलबजावणीचे निर्देश देते. त्यांच्या निर्देशाच्या अधीन राहूनच राज्य लोकसेवा आयोगाला कार्य करावे लागते. डीओपीटीने गुणवत्ता प्राप्त एससी, एसटी, ओबीसी, मागासवर्गीय विद्यार्थ्यांना खुल्या प्रवर्गातून शासनाच्या अधिकारी-कर्मचारी भरतीतून नाकारण्याचा कोणताही निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला असा निर्णय घेण्याचा अधिकार नाही. विधिमंडळाच्या अधिकारात हस्तक्षेप करण्याचा हा प्रकार आहे, त्यामुळे तो विधिमंडळाचा हक्कभंग सुद्धा होतो, असेही मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनात गाडे यांनी स्पष्ट केले आहे. (प्रतिनिधी)