शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर पाकिस्तान जगाच्या नकाशावरही दिसणार नाही"; एकनाथ शिंदे यांचे सडेतोड वक्तव्य
2
काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
3
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
4
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
5
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
7
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
8
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
9
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल
10
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
11
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानने दहशतवादाला पाठिंबा देणं थांबवावं, भारताच्या कारवाईदरम्यान अमेरिकेने सुनावले
12
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद
13
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
14
JF 17 लढाऊ विमानासह हद्दीत घुसलेला पायलट भारताच्या ताब्यात
15
नियंत्रण रेषेवर गोळीबार, एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले, भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाला तोंड फुटलंय की...
16
पठाणकोट, राजौरीमध्ये दहशतवाद्यांनी खरंच आत्मघाती हल्ला केला का? भारतीय लष्कराने दिली माहिती
17
पाकिस्तानने अमेरिका, चीनचे नाक कापले! भारताने जैसलमेरमध्ये आणखी एक एफ-१६ पाडले
18
India Pakistan War: 'आताच लाहोर सोडा', अमेरिकेने पाकिस्तानात राहणाऱ्या नागरिकांना सूचना दिल्या
19
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच
20
India Pakistan War : पाकिस्तानने कुपवाडा, बारामुल्लामध्ये केला हल्ला; लोकांना सुरक्षित ठिकाणी पाठवले

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा घटनाबाह्य आदेश !

By admin | Updated: December 5, 2014 00:39 IST

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने १९ व २५ सप्टेंबर रोजी दिलेला आदेश हा मागासवर्गीयांवर अन्याय करणारा घटनाबाह्य गुणवत्ता नाकारणारा व जातीयवादी भूमिकेतून घेतला असल्याने तो तात्काळ रद्द करण्यात यावा.

अध्यक्ष-सचिवांची हकालपट्टी करा : कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाची मागणी नागपूर : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने १९ व २५ सप्टेंबर रोजी दिलेला आदेश हा मागासवर्गीयांवर अन्याय करणारा घटनाबाह्य गुणवत्ता नाकारणारा व जातीयवादी भूमिकेतून घेतला असल्याने तो तात्काळ रद्द करण्यात यावा. तसेच जातीयवादी भूमिका घेणाऱ्या लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष व सचिवांची शासनाने त्वरित हकालपट्टी करावी, अशी मागणी कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाचे अध्यक्ष अरुण गाडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविलेल्या निवेदनाद्वारे केली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने १ एप्रिल २०१४ रोजी झालेल्या बैठकीत संघ लोकसेवा आयोगाच्या प्रक्रिया कार्यपद्धतीवर एमपीएससीच्या यापुढे घेतल्या जाणाऱ्या परीक्षेच्या कोणत्याही टप्प्यावर मागासवर्गीयांना देय असलेली वय, परीक्षा शुल्क तसेच इतर पात्रता विषयक अटीच्या निकषासंदर्भात सवलत उमेदवारांनी घेतली असल्यास अशा उमेदवारांना अमागासवर्गीय वर्गवारीच्या पदावर शिफारस करता येणार नाही, असा निर्णय दिला आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सनदी अधिकाऱ्यांनी हा आदेश १९ सप्टेंबर व २५ सप्टेंबर २०१४ ला निवडणूक आचारसंहिता लागू असताना काढलेला आहे. एससी, एसटी, ओबीसी, मागास विद्यार्थ्यांनी जर मागासवर्गीय सवलतीचा लाभ घेतला असल्यास त्यांना लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून भरण्यात येणाऱ्या शासनातील खुल्या प्रवर्गातील पदावर नियुक्ती दिली जाणार नाही. हा राज्यघटनेच्या अनुच्छेद १४, १५ व १६-१, १६-२ च्या विरोधात आहे. भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद ३२० प्रमाणे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला महाराष्ट्र शासनातील अधिकारी व कर्मचारी यांची भर्ती करण्याचा अधिकार आहे. परंतु त्या भर्तीचे नियम ठरविण्याचा अधिकार नाही. केंद्र शासनाच्या (डीओपीटी) कार्मिक व प्रशिक्षण विभाग, सेवा विषयक नियम आणि प्रक्रिया ठरवित असते. तसेच विविध शासकीय सेवांमध्ये भरतीसाठी आरक्षणाच्या अंमलबजावणीचे निर्देश देते. त्यांच्या निर्देशाच्या अधीन राहूनच राज्य लोकसेवा आयोगाला कार्य करावे लागते. डीओपीटीने गुणवत्ता प्राप्त एससी, एसटी, ओबीसी, मागासवर्गीय विद्यार्थ्यांना खुल्या प्रवर्गातून शासनाच्या अधिकारी-कर्मचारी भरतीतून नाकारण्याचा कोणताही निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला असा निर्णय घेण्याचा अधिकार नाही. विधिमंडळाच्या अधिकारात हस्तक्षेप करण्याचा हा प्रकार आहे, त्यामुळे तो विधिमंडळाचा हक्कभंग सुद्धा होतो, असेही मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनात गाडे यांनी स्पष्ट केले आहे. (प्रतिनिधी)