शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्रातील साहित्यिकांनी यशवंतरावांना न्याय दिला नाही : मधुकर भावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2019 22:28 IST

१९७४ च्या इचलकरंजी येथील साहित्य संमेलनाचे अध्यक्ष पु.ल. देशपांडे यांनी यशवंतराव चव्हाण संमेलनात येऊ नये यासाठी प्रयत्न केला तर पुढल्या वर्षी कराडला झालेल्या संमेलनात अध्यक्ष दुर्गा भागवत यांनी त्यांना व्यासपीठावर बसू दिले नाही. महाराष्ट्र घडविणाऱ्या नेत्याची अशी अवहेलना कुणाच्याही वाट्याला आली नाही. सात संमेलनांचे उद्घाटक व सहा संमेलनांचे स्वागताध्यक्ष राहिलेल्या यशवंतरावांनी अनेक दर्जेदार पुस्तकांचे लिखाणही केले असून ते अशा प्रतिथयश साहित्यिकांपेक्षा काकणभरही कमी नाही. मात्र यशवंतरावांना संमेलनाचा अध्यक्ष बनवावा, असे या साहित्यिकांना वाटले नाही. महाराष्ट्रातील साहित्यिकांनी यशवंतरावांना न्याय दिला नाही, अशी खंत ज्येष्ठ विचारवंत मधुकर भावे यांनी व्यक्त केली.

ठळक मुद्देयशवंतराव चव्हाण जयंतीनिमित्त व्याख्यान

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : १९७४ च्या इचलकरंजी येथील साहित्य संमेलनाचे अध्यक्ष पु.ल. देशपांडे यांनी यशवंतराव चव्हाण संमेलनात येऊ नये यासाठी प्रयत्न केला तर पुढल्या वर्षी कराडला झालेल्या संमेलनात अध्यक्ष दुर्गा भागवत यांनी त्यांना व्यासपीठावर बसू दिले नाही. महाराष्ट्र घडविणाऱ्या नेत्याची अशी अवहेलना कुणाच्याही वाट्याला आली नाही. सात संमेलनांचे उद्घाटक व सहा संमेलनांचे स्वागताध्यक्ष राहिलेल्या यशवंतरावांनी अनेक दर्जेदार पुस्तकांचे लिखाणही केले असून ते अशा प्रतिथयश साहित्यिकांपेक्षा काकणभरही कमी नाही. मात्र यशवंतरावांना संमेलनाचा अध्यक्ष बनवावा, असे या साहित्यिकांना वाटले नाही. महाराष्ट्रातील साहित्यिकांनी यशवंतरावांना न्याय दिला नाही, अशी खंत ज्येष्ठ विचारवंत मधुकर भावे यांनी व्यक्त केली.यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्यावतीने त्यांच्या १०६ व्या जयंतीचे औचित्य साधून ‘यशवंतराव चव्हाण यांचा सांस्कृतिक विचार आणि आजची स्थिती’ या विषयावर व्याख्यानाचे आयोजन बाबुराव धनवटे सभागृहात करण्यात आले. यावेळी प्रमुख वक्ता म्हणून भावे बोलत होते. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्रिपद भूषविलेल्या यशवंतरावांनी राज्याची राजकीय आणि सांस्कृतिक जडणघडण केली. गृहमंत्री म्हणून देशाचेही नेतृत्व केले. राजकारणात त्यांचे कर्तृत्व मोठे आहे तसे साहित्य व संस्कृतीच्या क्षेत्रातही आहे. संस्कारी, सांस्कृतिक, विचारवंत, वाचक, साहित्यिक, संगीत प्रेमी अशा सर्व अंगाने त्यांची ओळख करणे महत्त्वाचे आहे. राज्यकर्त्यांच्या दोन डोळ्यांपैकी एक संस्कृतीचा असावा, असे मानणारे ते होते. त्यांनी कृष्णाकाठ, युगांत अशा पुस्तकातून दर्जेदार साहित्य रचले. त्यांनीच साहित्य संस्कृती मंडळाची स्थापना केली व एवढेच नाही तर लक्ष्मण जोशी, ना.धो. महानोर, ग.दि. माडगूळकर अशा अनेक दिग्गजांना महत्त्वाच्या पदावर विराजमानही केले. माणस शोधून त्यांना आवश्यक ठिकाणी नियुक्त करून महाराष्ट्र समृद्ध करण्याचे काम त्यांनी केले. असा सांस्कृतिक डोळा आजच्या राज्यकर्त्यांना नाही, असे परखड मत भावे यांनी मांडले.डोक्यावरून मैला वाहुन नेण्यास बंदी घालण्याचे विधेयक मांडणारे महाराष्ट्र पहिले राज्य होते. यातूनच त्यांचा सुसंस्कृतपणा दिसून येतो. तमाशा कलावंत, कुस्तीगिर, साहित्यिक आदींना मानधन देण्याची सुरुवात त्यांनी केली. मुंबईत साहित्यिकांच्या निवासाची व्यवस्था केली. त्यांच्या तोडीचा एकही राजकारणी आज मिळणे शक्य नाही. त्यांच्या सुसंस्कृतपणाचा वारसा राज्यकर्त्यांना जपता आला नाही, याची खंत भावे यांनी व्यक्त केली.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून प्रतिष्ठानचे अध्यक्ष गिरीश गांधी यांनीही विचार व्यक्त केले. याप्रसंगी डॉ. प्रमोद मुनघाटे, अनिल इंदाणे, प्रेमबाबू लुनावत आदी मान्यवर उपस्थित होते. प्रास्ताविक डॉ. प्रदीप विटाळकर व संचालन रेखा दंडिगे-घिया यांनी केले. कवी लोकनाथ यशवंत यांनी आभार मानले.

टॅग्स :Yashwantrao Chavhanयशवंतराव चव्हाणliteratureसाहित्य