शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा आरक्षण सुनावणी होणार जलद; हायकोर्टात विशेष पूर्णपीठ स्थापन; SCच्या आदेशानंतर पाऊल
2
अफगाणिस्तानला भारताचा मदतीचा हात! अटारी मार्गे केली विशेष मदत; पाकिस्तानला दाखवून दिले
3
आजचे राशीभविष्य १७ मे २०२५ : नोकरदारांना नोकरीत लाभ होईल, जाणून घ्या, कसा असेल आजचा दिवस
4
भारताला हवेत हाफिज सईद, मसूद अझहर, दाऊद इब्राहिम; मोस्ट वाँटेडची यादी पाकला सोपवणार
5
‘सेलेबी’ला काम नको; आयबीचा होता इशारा, सुरक्षेविषयी नवीन प्रश्न निर्माण होण्याची भीती
6
भारत आता पाकिस्तानवर ‘डिप्लोमॅटिक स्ट्राइक’ करणार; ‘ऑपरेशन सिंदूर’ची माहिती जगात पोहोचवणार
7
आगळीक करू नका, ‘ऑपरेशन सिंदूर’ हा फक्त ट्रेलर, गरज पडल्यास पूर्ण ‘पिक्चर’ दाखवू: राजनाथ सिंह
8
अफगाणिस्तानातून पाकची जलकोंडी होण्याची शक्यता; शाहतूत धरणास भारताचे आर्थिक, तांत्रिक सहकार्य
9
‘८६४७’ म्हणजे थेट डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा संदेश? जेम्स कॉमी यांच्या पोस्टमुळे खळबळ
10
मध्य प्रदेशच्या मंत्र्यानंतर आता उपमुख्यमंत्र्यांचेही विधान चर्चेत; काँग्रेसची भाजपावर टीका
11
पाक समर्थक तुर्की, अझरबैजानशी  कोणताही व्यापार, पर्यटन नाही; भारतीय व्यापाऱ्यांचा बहिष्कार
12
“तणावाच्या पार्श्वभूमीवर तुर्की, अझरबैजानसोबत करार करू नका”; याआधीचे करार रद्द करायचा निर्णय
13
मुंबईत तळ ठोकून असणाऱ्या २५० बांगलादेशींना घरचा रस्ता; २ दिवसांत पोलिसांची मोठी धडक कारवाई
14
राजकीय नेत्यांना चढला महापालिका निवडणुकीचा ज्वर! स्थानिक प्रश्नांकडे लक्ष, भेटीगाठी सुरू
15
...आता सहपोलिस आयुक्त गुप्तवार्ता; आयपीएस डॉ. आरती सिंह यांच्याकडे जबाबदारी
16
तिन्ही मार्गावर मुंबईत उद्या ‘मेगा ब्लॉक डे’; पश्चिम, मध्य, हार्बरवरील वेळापत्रक कसे असेल?
17
मुंबई सेंट्रल स्थानकावर पहिले डिजिटल लाउंज; केवळ प्रवासी नाही तर नागरिकांनाही लाभ मिळणार
18
दारूच्या नशेत बेभान कंटेनर चालकाने वाहनांसह २० नागरिकांना उडविले; बीडमधील थरार, महिला ठार
19
भारताच्या नीरज चोप्राची ऐतिहासिक कामगिरी; दोहा डायमंड लीगमध्ये भालाफेकीत ९० मीटरचा टप्पा सर
20
पाकला आणखी एक दणका! अफगाणिस्तानातून मिळणारे पाणीही थांबणार? भारताची पावले उचलण्यास सुरुवात

विदर्भाचा विकास करा महाराष्ट्राचे तुकडे नाही

By admin | Updated: December 19, 2015 03:01 IST

मेक इन इंडिया, स्टार्ट अप इंडिया अशा शब्दांचा बागुलबुवा उभारून लाखो रोजगार निर्माण करण्याची वल्गना सरकारने केली होती.

जयंत पाटील : मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करावीकमलेश वानखेडे नागपूर मेक इन इंडिया, स्टार्ट अप इंडिया अशा शब्दांचा बागुलबुवा उभारून लाखो रोजगार निर्माण करण्याची वल्गना सरकारने केली होती. मात्र विदर्भ आणि मराठवाड्यातील परिस्थिती पाहता हे सर्व कागदावरच राहिल्याचे दिसते. एक आणे, दोन आणे, चार आणे यांच्या नादाला लागून विदर्भाचे वेगळे राज्य निर्माण करण्याचे स्वप्न न पाहता अखंड महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून विदर्भाच्या विकासाचे स्वप्न पहा. विदर्भाचा विकास करा, महाराष्ट्राचे तुकडे नाही, अशी रोखठोक भूमिका राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी शुक्रवारी विधानसभेत मांडली. विदर्भ-मराठ्यातील अनुशेषाबाबत नियम २९३ अन्वये उपस्थित करण्यात आलेल्या चर्चेत भाग घेताना जयंत पाटील यांनी वर्षभरात सरकारने विदर्भ-मराठवाड्यासाठी केलेल्या कामाचा हिशेब मागितला. पाटील म्हणाले, बऱ्याच काळानंतर महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झाल्यामुळे विदर्भवासीयांना हर्षवायू झाला होता. मात्र वर्षभरातच विदर्भातील जनतेचा भ्रमनिरास झाला. विदर्भात ४४ ठिकाणी भाजपचे कमळ फुलले, पण त्या कमळांचा विकासरूपी सुगंध मात्र विदर्भवासीयांना भेटला नाही. उरलेल्या काळात तरी विकासकामे पूर्ण करा नाहीतर याच ४४ ठिकाणी राष्ट्रवादीच्या घडाळ्याचा गजर आणि हाताचा छाप पडल्याशिवाय राहणार नाही, असा चिमटा त्यांनी काढला. वर्षभरापूर्वी मुख्यमंत्री, वित्तमंत्री यांनी सभागृहात केलेली भाषणे वाचून दाखवित त्यावेळी केलेल्या घोषणांचे पुढे काय झाले, याचा लेखाजोखा सादर करण्याची मागणी केली. विदर्भात पाच ठिकाणी आधुनिक फळे व भाजीपाला सुविधा केंद्रासाठी १२ कोटी खर्च करून हे काम मार्च २०१५ पर्यंत कार्यान्वित करायचे होते, वर्धा, भंडारा, नागपूर आणि अमरावती या चार जिल्ह्यांत सात निर्यात केंद्रे उभी करायची होती, नागपूर येथे टर्मिनल मार्केटसाठी १०० एकर जमीन संपादित केली होती, या सर्वांचे पुढे काय झाले, अशी विचारणा त्यांनी केली. मिहानची प्रगती मंदगतीने आहे. गडकरी यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या टास्क फोर्सची आतापर्यंत केवळ एकच बैठक झाली. रिलायन्सने १०४ एकर जमीन मिहानमध्ये घेतली त्याचे केवळ ५० टक्केच पैसे भरले. ही सूट कशासाठी, असा सवाल त्यांनी केला. परदेशी वाऱ्या करून ६५ हजार कोटींची गुंतवणूक आणण्याचा दावा मुख्यमंत्र्यांनी केला. त्यातला एकही प्रकल्प मुख्यमंत्री विदर्भात आणू शकले नाहीत. जो येईल तो प्रकल्प मुंबई-पुण्यात गेला. विदर्भाचे चित्र पालटण्यासाठी प्रकल्प कधी आणणार, असा सवाल करीत तुमच्या हातात असलेल्या सत्तेचा वापर विदर्भाच्या विकासासाठी करा, असा सल्ला पाटील यांनी दिला. वाघाची झाली बकरी, रावते मात्र गप्पचजयंत पाटील यांनी या वेळी शिवसेनेलाही लक्ष्य केले. ते म्हणाले, अ‍ॅड. अणेंचे वक्तव्य १५ दिवस होऊनही मुख्यमंत्र्यांना कळले नाही का. महाराष्ट्राच्या अस्मितेच्या मुद्यावरून शिवसेनेचे सदस्य सभागृहात मध्यपर्यंत आले, मात्र मुख्यमंत्र्यांच्या उत्तरावर समाधान मानूम माघारी गेले. वाघाची बकरी झाल्यावर काय होते, हे आम्ही पाहिले, असा चिमटा त्यांनी शिवसेनेला काढला. मुख्यमंत्री म्हणाले होते, वाघाच्या जबड्यात हात घालून दात मोजणारी जात आमुची. कारण मुख्यमंत्र्यांना हे माहीत आहे की हे वाघ नाहीत, शेळी आहेत, अशी बोचरी टीका त्यांनी केली. या वेळी शिवसेनेचे बहुतांश सदस्य सभागृहात नव्हते. परिवहन मंत्री दिवाकर रावते समोरच्या बाकावर बसले होते. मात्र, त्यांनीही पाटील यांना रोखण्याचा प्रयत्न केला नाही.