शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B च्या तणावादरम्यान एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
3
IND vs PAK : भारताला हरवायचंय? मग सेना प्रमुखांसोबत ओपनिंग करा! इम्रान खानचा PCB अध्यक्षाला यॉर्कर
4
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
5
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
6
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
7
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
8
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
9
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
10
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
11
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
12
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
13
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
14
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
15
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
16
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
17
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
18
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
19
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
20
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना

राज्य सरकारचा 'यू-टर्न'; अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबईत घेणे हा विदर्भावर अन्याय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2022 11:02 IST

नागपूर करारानुसार एक अधिवेशन नागपूरला होणे आवश्यक आहे. परंतु शासनाने परत शब्द फिरविण्याची तयारी सुरू केली असून, मुंबईतच हे अधिवेशन घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

ठळक मुद्देविदर्भावर अन्याय

नागपूर : २०२२चे अर्थसंकल्पीय अधिवेशन नागपुरात घेण्यात येईल, असे आश्वासन राज्य शासनाने दिले होते. परंतु शासनाने परत शब्द फिरविण्याची तयारी सुरू केली असून, मुंबईतच हे अधिवेशन घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. जर मुंबईत हे अधिवेशन झाले तर तो विदर्भावर अन्याय ठरेल, अशी भूमिका भाजपतर्फे मांडण्यात आली आहे.

भाजपचे प्रदेश सरचिटणीस आ. चंद्रशेखर बावनकुळे यांनी या मुद्द्यावरून राज्य शासनाविरोधात प्रश्न उपस्थित केले आहेत. नागपूर करारानुसार एक अधिवेशन नागपूरला होणे आवश्यक आहे. मागील वर्षी कोरोनाच्या संकटात पावसाळी व हिवाळी अधिवेशन मुंबईत झाले. प्रारंभी अधिवेशनाच्या तारखा जाहीर होतात अन् अखेरच्या क्षणी अधिवेशन मुंबईत घेण्याचा पोरखेळ राज्य सरकारकडून होतोय. विदर्भाबाबतच्या द्वेषापोटीच असे प्रकार सुरू असल्याचा आरोप बावनकुळे यांनी लावला.

सुरेश भट सभागृहात राज्यपालांचे अभिभाषण घ्यावे

राज्यपालांचे अभिभाषण घेण्यासाठी सभागृह नसल्याचे व आमदार निवास विलगीकरण कक्ष म्हणून वापरले जात असल्याचे कारण राज्य शासनाकडून पुढे करण्यात आले आहे. राज्यपालांचे अभिभाषण नागपूर येथील कविवर्य सुरेश भट सभागृहातही होणे शक्य आहे. तसेच मुंबईप्रमाणे नागपुरातदेखील सरकारने आमदारांची राहण्याची खासगी व्यवस्था करावी, अशी मागणी बावनकुळे यांनी केली.

सहा वेळा नागपुरात अधिवेशन झाले नाही

आतापर्यंत नागपूर सहावेळा अधिवेशनापासून वंचित राहिले आहे. १९६२, १९६३, १९७९, १९८५, २०२० व २०२१ मध्ये अधिवेशन नागपुरात झालेले नाही. तर, आता अर्थसंकल्पीय अधिवेशन टाळले जात आहे. 

हिवाळी अधिवेशनाच्या सांगता प्रसंगी अर्थसंकल्पीय अधिवेशन नागपूरला घेण्याच्या घोषणेनंतर आनंद व्यक्त करण्यात आला होता. परंतु, आता अधिवेशन पुन्हा मुंबईत घेण्याबाबत मंत्रिमंडळात चर्चा झाली. त्यावेळी विदर्भातील एकही मंत्र्याने विरोध दर्शविला नसल्याचे सांगण्यात येत आहे. 

टॅग्स :PoliticsराजकारणBudget Sessionअर्थसंकल्पीय अधिवेशनMaharashtra Budgetमहाराष्ट्र बजेट