शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
5
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
6
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
7
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
8
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
9
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
10
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
11
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
12
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
13
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
14
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
15
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
16
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
17
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
18
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
19
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
20
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश

राज्य सरकारचा 'यू-टर्न'; अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबईत घेणे हा विदर्भावर अन्याय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2022 11:02 IST

नागपूर करारानुसार एक अधिवेशन नागपूरला होणे आवश्यक आहे. परंतु शासनाने परत शब्द फिरविण्याची तयारी सुरू केली असून, मुंबईतच हे अधिवेशन घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

ठळक मुद्देविदर्भावर अन्याय

नागपूर : २०२२चे अर्थसंकल्पीय अधिवेशन नागपुरात घेण्यात येईल, असे आश्वासन राज्य शासनाने दिले होते. परंतु शासनाने परत शब्द फिरविण्याची तयारी सुरू केली असून, मुंबईतच हे अधिवेशन घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. जर मुंबईत हे अधिवेशन झाले तर तो विदर्भावर अन्याय ठरेल, अशी भूमिका भाजपतर्फे मांडण्यात आली आहे.

भाजपचे प्रदेश सरचिटणीस आ. चंद्रशेखर बावनकुळे यांनी या मुद्द्यावरून राज्य शासनाविरोधात प्रश्न उपस्थित केले आहेत. नागपूर करारानुसार एक अधिवेशन नागपूरला होणे आवश्यक आहे. मागील वर्षी कोरोनाच्या संकटात पावसाळी व हिवाळी अधिवेशन मुंबईत झाले. प्रारंभी अधिवेशनाच्या तारखा जाहीर होतात अन् अखेरच्या क्षणी अधिवेशन मुंबईत घेण्याचा पोरखेळ राज्य सरकारकडून होतोय. विदर्भाबाबतच्या द्वेषापोटीच असे प्रकार सुरू असल्याचा आरोप बावनकुळे यांनी लावला.

सुरेश भट सभागृहात राज्यपालांचे अभिभाषण घ्यावे

राज्यपालांचे अभिभाषण घेण्यासाठी सभागृह नसल्याचे व आमदार निवास विलगीकरण कक्ष म्हणून वापरले जात असल्याचे कारण राज्य शासनाकडून पुढे करण्यात आले आहे. राज्यपालांचे अभिभाषण नागपूर येथील कविवर्य सुरेश भट सभागृहातही होणे शक्य आहे. तसेच मुंबईप्रमाणे नागपुरातदेखील सरकारने आमदारांची राहण्याची खासगी व्यवस्था करावी, अशी मागणी बावनकुळे यांनी केली.

सहा वेळा नागपुरात अधिवेशन झाले नाही

आतापर्यंत नागपूर सहावेळा अधिवेशनापासून वंचित राहिले आहे. १९६२, १९६३, १९७९, १९८५, २०२० व २०२१ मध्ये अधिवेशन नागपुरात झालेले नाही. तर, आता अर्थसंकल्पीय अधिवेशन टाळले जात आहे. 

हिवाळी अधिवेशनाच्या सांगता प्रसंगी अर्थसंकल्पीय अधिवेशन नागपूरला घेण्याच्या घोषणेनंतर आनंद व्यक्त करण्यात आला होता. परंतु, आता अधिवेशन पुन्हा मुंबईत घेण्याबाबत मंत्रिमंडळात चर्चा झाली. त्यावेळी विदर्भातील एकही मंत्र्याने विरोध दर्शविला नसल्याचे सांगण्यात येत आहे. 

टॅग्स :PoliticsराजकारणBudget Sessionअर्थसंकल्पीय अधिवेशनMaharashtra Budgetमहाराष्ट्र बजेट