शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
2
राहुल गांधी यांचा सर्वात मोठा आरोप; मतचोरीचा पुरावा देत 'त्या' लोकांना थेट स्टेजवर बोलावले अन्...
3
बेपत्ता महिला कॉन्स्टेबलची हत्या, कारमध्ये मृतदेह लपवला; आरोपी पोलिसाने सत्य सांगताच अधिकारी हैराण
4
दुचाकीला साईड न दिल्याचे किरकोळ कारण; कोथरूड परिसरात निलेश घायवळ टोळीकडून गोळीबार, एक गंभीर जखमी
5
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचं 'मत'चोरीला संरक्षण; राहुल गांधी यांचा गंभीर आरोप
6
'ऑपरेशन ३१३'चा भांडाफोड! ३००हून अधिक मदरसा कॅम्प बांधण्याची तयारी होती सुरू, जैशचा मोठा कट उघडकीस
7
सासऱ्याच्या मृत्यूनंतर सून ढसाढसा रडली, संशय येताच पोलखोल झाली; 'ते' सत्य लपवण्यासाठी...
8
महाराष्ट्रातील या मतदारसंघात झाली मतचोरी, हजारो मतदार वाढले, राहुल गांधींचा पुराव्यानिशी सनसनाटी आरोप 
9
सेफ्टीमध्ये 'TATA'च एक नंबर, सलग नवव्या गाडीला मिळालं 5 स्टार रेटिंग; कोणती आहे कार?
10
जगातील सर्वात महान कर्णधार कोण? किरॉन पोलार्डनं 'या' दिग्गजाचं घेतलं नाव!
11
VIDEO: पाकिस्तानी खेळाडूने अंपायरच्या डोक्याला मारला चेंडू, अक्रमने केली 'घाणेरडी' कमेंट
12
मंदीच्या खाईत जाणाऱ्या अमेरिकन अर्थव्यवस्थेला वाचवण्यासाठी फेडचा मोठा डाव! भारतावर होणार थेट परिणाम
13
'डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष, जगाचे सम्राट नाहीत, त्यांच्या चुकांची किंमत...'; ब्राझीलच्या राष्ट्रपतींनी सुनावले
14
अमेरिकेत ३० वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या भारतीयाला ग्रीन कार्ड असूनही अटक, कुटुंबीय हताश! नेमकं प्रकरण काय?
15
'यानं' केवळ ३.७७ रुपयांप्रमाणे घेतलेले Urban Company चे शेअर्स, IPO उघताच त्याचे झाले ३९० कोटी; कोणी केली ही कमाई?
16
पितृपक्षातल्या गुरुवारी घ्या दत्त गुरुंची 'ही' १२ नावं; पितरांना मिळेल मुक्ती, तुम्हाला मिळेल समाधान 
17
IND vs PAK: नीरज चोप्रा आज अर्शद नदीमशी भिडणार! भारत-पाकमध्ये आणखी एक 'हाय-व्होल्टेज' सामना
18
'साप चावला' म्हणत कळवळला, वांद्रे-वरळी सी-लिंकवर गाडी थांबवली अन्...; मुंबईतल्या व्यापाऱ्याने उचलले टोकाचे पाऊल
19
"पल्लेदार वाक्य बोलणारी प्रिया शेवटच्या क्षणी...", अभिजीतची प्रतिक्रिया ऐकून डोळ्यात येईल पाणी
20
ऐकावं ते नवलच! डिजिटल फ्रेंडली भिकारी; ऑनलाईन मागतो भीक, काही मिनिटांत बक्कळ कमाई

Maharashtra Assembly Election 2019 : खुल्या प्रवर्गासाठी आणखी जागा वाढविणार  : मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2019 23:33 IST

गुणवंत विद्यार्थ्यांची कुठलीही संधी हुकणार नाही. दरवर्षी या जागा वाढविण्यातच येतील, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

ठळक मुद्देगुणवंत विद्यार्थ्यांची कुठलीही संधी हुकणार नाही

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : सर्व समाजातील मुलेमुली शिकली तर देशाला पुढे घेऊन जातील. विविध समाजाला सवलती मिळायच्या, मात्र खुल्या प्रवर्गाला कुठलेही आरक्षण नव्हते. २०१८ पूर्वी जेवढ्या जागा खुल्या प्रवर्गाला मिळत होत्या, तेवढ्याच जागा विविध संस्थांमध्ये वाढविण्याचा आमच्या सरकारने निर्णय घेतला. यामुळे कुणावरही अन्याय होणार नाही व गुणवंत विद्यार्थ्यांची कुठलीही संधी हुकणार नाही. दरवर्षी या जागा वाढविण्यातच येतील, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. दक्षिण-पश्चिम नागपूर मतदारसंघातून भाजपचे उमेदवार असलेल्या फडणवीस यांनी बुधवारी प्रतापनगर चौकाजवळ प्रचारसभेला संबोधित केले. यावेळी ते बोलत होते.यावेळी महापौर नंदा जिचकार, मनपातील सत्तापक्ष नेते संदीप जोशी प्रामुख्याने उपस्थित होते. सर्व समाजाला समान न्याय मिळाला पाहिजे ही आमची भूमिका आहे. ओबीसी समाजासाठी वेगळे मंत्रालय सुरु केले व ३५०० कोटींचा निधी दिला. तर खुल्या प्रवर्गासाठी आर्थिक विकास महामंडळ बनविण्यासाठी पावले उचलण्यात आली. या विद्यार्थ्यांनादेखील परदेशात शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देण्याचा निर्णय घेतला. खासगी महाविद्यालयांतील ५० टक्के शुल्क प्रतिपूर्ती होते. ६०२ अभ्यासक्रमांत सर्व समाजांतील विद्यार्थ्यांना मदत होत आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.‘मेट्रो’च्या तिसऱ्या टप्प्यालाही मंजुरी मिळणारयंदाच्या निवडणूका या ऐतिहासिक राहणार आहेत. कारण जनतेला याचा निर्णय अगोदरपासूनच माहीत आहे. विरोधकांची स्थिती अतिशय वाईट झाली आहे. महाराष्ट्रासोबतच नागपुरातही नितीन गडकरी यांच्या मार्गदर्शनात परिवर्तन झाले आहे व विकासाची मालिकाच सुरू झाली आहे. १९९५ मध्ये आम्ही ‘मिहान’ची संकल्पना मांडली. १९९९ नंतर १५ वर्षे काहीच झाले नाही. उद्योग यावेत यासाठी आम्ही विशेष ‘इन्सेन्टिव्ह’ देण्यास सुरुवात केली. त्यामुळे गुंतवणूक येत आहे. ‘मेट्रो’च्या तिसऱ्या टप्प्याचा प्रस्तावदेखील केंद्राकडे मंजुरीकडे पाठविला आहे, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.राहुल गांधी यांच्यामुळे भाजपचा फायदाचआपल्या भाषणात मुख्यमंत्र्यांनी कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनादेखील चिमटे काढले. कॉंग्रेसने राहुल गांधी यांची प्रत्येक मतदारसंघात सभा आयोजित करावी. कारण ते जेथे जातात तेथे भाजपचा विजय होतो व मताधिक्य दुप्पट होते. महाराष्ट्रातील कॉंग्रेसची स्थिती त्यांना माहीत आहे. कॉंग्रेसला यावेळी ४२ काय २४ जागादेखील मिळणार नाहीत. त्यामुळे ते प्रचारासाठी फारसे आले नाहीत, असे मुख्यमंत्री म्हणाले.

झुडपी जंगलांवरील रहिवाशांना मालकी मिळणारनागपुरातील एकात्मतानगर, तकिया येथील झुडपी जंगलांवर अनेकांची घरे आहेत. त्यांना मालकी हक्क मिळू शकत नव्हता. आम्ही केंद्राकडे गेलो व  निर्णय करून घेतला. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयातदेखील गेलो. लवकरच यासंबंधातील अहवाल सर्वोच्च न्यायालय स्वीकारणार आहे. यानंतर झुडपी जंगलांवरील रहिवाशांना मालकी हक्क पट्टे मिळतील. दक्षिण-पश्चिम नागपूर मतदारसंघामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील झुडपी जंगलांवर राहणारे आपल्या जमिनीचे मालक होतील, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसnagpur-south-west-acनागपूर दक्षिण पश्चिम