शहरं
Join us  
Trending Stories
1
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
2
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
3
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
4
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
5
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
6
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
7
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
8
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
9
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
10
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
11
अग्रलेख: ‘ती’च्यावर गर्भाशय काढण्याची वेळ का येते?
12
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
13
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
14
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
15
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
16
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
17
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
18
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
19
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
20
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले

आकड्यांचा ‘महा’पूर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2015 02:09 IST

तिजोरीत पैसा नसल्याने विकास कामे रखडलेली आहेत. कर्मचाऱ्यांना वेळेवर वेतन देताना अडचणी येत आहेत.

मनपाचा अर्थसंकल्प १९६५.१२ क ोटींचानागपूर : तिजोरीत पैसा नसल्याने विकास कामे रखडलेली आहेत. कर्मचाऱ्यांना वेळेवर वेतन देताना अडचणी येत आहेत. उत्पन्नाच्या साधनात फारशी वाढ होईल अशी परिस्थिती नाही. असे असतानाही स्थायी समितीचे अध्यक्ष रमेश सिंगारे यांनी अनुदानाच्या बळावर कोटीची उड्डाणे घेत महापालिकेचा सन २०१५-१६ या वर्षाचा १९६५.१२ कोटीचा अर्थसंकल्प सोमवारी विशेष सभेत सादर केला.गेल्या वित्त वर्षात मनपाच्या तिजोरीत एक हजार कोटीच्या असपास महसूल गोळा झाला. या उत्पन्नाचा विचार करता याच्या दुप्पट रकमेचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. स्थानिक स्वराज्य संस्था कर आॅगस्ट महिन्यापासून रद्द होणार असला तरी या बदल्यात मनपाला सरकारकडून ४५० कोटीचे अनुदान गृहीत धरण्यात आले आहे. केंद्र व राज्य सरकारकडून ५३४.६१ कोटीचे अनुदान अपेक्षित आहे. तसेच नगररचना विभागाकडून प्रथमच १४४ कोटी तर लोककर्म विभागाच्या माध्यमातून तब्बल २०० कोटी गृहीत धरण्यात आल्याने अर्थसंकल्पाने हनुमान उडी मारली आहे.मर्यादित उत्पन्नाची साधने व एलबीटी समाप्त होणार असल्याने आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी २०१५-१६ या वर्षाचा १२९४.६७ कोटीचा वास्तव अर्थसंकल्प सादर केला होता. यात २०० ते ३०० कोटीची वाढ केली जाईल, अशी अपेक्षा होती. परंतु सिंगारे यांना कें द्रात व राज्यात भाजपची सत्ता असल्याने अनुदान मिळणार असल्याची खात्री असल्याने ६७०.४५ कोटीने अधिक रकमेचा अर्थसंकल्प सादर केला. गेल्या वर्षी तत्कालीन स्थायी समितीचे अध्यक्ष बाल्या बोरकर यांनी १६४५.५५ कोटीचा अर्थसंकल्प सादर केला होता. प्रत्यक्षात इतके उत्पन्न झाले नव्हते. नावीन्यपूर्ण कल्पनेतून नागरी सुविधा अंतर्गत आदर्श वस्ती सुधार व परिसर पालकत्व योजना वगळता अर्थसंकल्पात कोणत्याही स्वरूपाच्या नवीन घोषणा करण्यात आलेल्या नाही. जुन्याच योजनांचा प्रामुख्याने समावेश आहे. कर वगळता ९ विभागाकडून ५८२.५४ कोटीचे उत्पन्न अपेक्षित आहे. सविस्तर : पान/७उत्पन्नाची बाजूविभाग उत्पन्न(कोटीत)एलबीटी ४५०.००संपत्तीकर २७०.८५पाणीकर १५०.००नगररचना १४४.१०बाजार वसुली ६.५५स्थावर विभाग १४.१०अग्निशमन १२.७५आरोग्य ३.६६लोककर्म (बीओटी) २००विद्युत विभाग २६.००हॉटमिक्स प्लान्ट १५.३०महसुली अनुदान १५१.६६इतर विभागाकडून उत्पन्न ३१.२८भांडवली अनुदान ३८२.९५खर्चाची बाजू विभाग खर्च (कोटीत)आस्थापना ३८७.६९प्रशासकीय ४४.७२प्रवर्तन, दुरुस्ती ३०८.६२विकास योजना ८७.३९भांडवली खर्च ७९.४९भांडवली अनुदान २०६.३५कर्ज परतफेड ५२.३०अशंदान, अनुदान व्यय ४०.०५निरपेक्ष व ठेवी व्यय ३४.८०कार्यात्मक अग्रिम व्यय ८.०५