शहरं
Join us  
Trending Stories
1
'घराणेशाहीचे राजकारण लोकशाहीसाठी घातक', गांधी कुटुंबाचे नाव घेत शशी थरुरांचे मोठे वक्तव्य
2
"खास अशिशुद्दीन यांच्यासाठी..."; भाजपा नेत्यांचा फोटो शेअर करत मनसेचं 'व्होट जिहाद'ला प्रत्युत्तर
3
MHADA Lottery: पुणेकरांसाठी सुवर्णसंधी! 'म्हाडा'च्या लॉटरीत वाकड-हिंजवडीत फक्त २८ लाखांत घर; ६० लाखांची थेट बचत!
4
कारच्या बंद दरवाजात गुदमरले जीव, ५ जणांचा मृत्यू; Tesla कारविरोधात खटला दाखल, काय आहे प्रकरण?
5
मेसेजची रिंग वाजली? लाडकी बहीण योजनेचे आज पैसे येणार; eKYC न केलेल्या महिलांचे काय?
6
लाडकी बहीण योजना ज्यांनी राबविली, ते म्हणाले 'आम्ही कर्जात आहोत'; MSP वेळी हात वर केले, केंद्राला पत्र
7
"सांगा, ही मतचोरी आहे की व्होट जिहाद?"; भाजपाचा विरोधी पक्षांना खोचक सवाल, दिली आकडेवारी
8
शनी ग्रहाच्या चंद्राने केमिस्ट्रीला देखील फेल केले; तेल आणि पाणी...
9
ट्रम्प यांच्या धमक्यांचा परिणाम; रशियाकडून भारताला होणारा तेल पुरवठा झाला कमी, नव्या पुरवठादाराचा शोध घ्यावा लागणार?
10
वर्षभरापासून सेलिनाचा भाऊ दुबईच्या तुरुंगात कैद, भारत सरकारकडे मागितली मदत; प्रकरण काय?
11
हर'मन' जीत लिया! Will to Win मुळे जगज्जेतेपदाचं स्वप्न साकार, आता थांबायचं नाय...
12
५० लाखांचं पॅकेज असूनही दुःखी; कितीही कमावले तरी 'ते पुरेसे' का वाटत नाही? चार्टर्ड अकाउंटंटची पोस्ट Viral!
13
Tejashwi Yadav : "प्रत्येक महिलेला ३० हजार, शेतकऱ्यांना बोनस, मोफत वीज..."; तेजस्वी यादव यांच्या मोठ्या घोषणा
14
Tripuri Purnima 2025: त्रिपुरी पौर्णिमा हीच 'मनोरथ पौर्णिमा'; ५ नोव्हेंबरला 'या' वस्तूंचे दान ठरेल वरदान!
15
'तुझ्यासाठी बायकोला संपवलं'; दुसऱ्या लग्नासाठी डॉक्टरने केली पत्नीची हत्या; मेसेजमुळे 'डबल गेम'चा पर्दाफाश
16
...म्हणून त्या डंपरचालकाने ५० जणांना चिरडलं, धक्कादायक कारण समोर आलं
17
ऐतिहासिक अंदाज: निफ्टी ५४,००० अंकांचा टप्पा गाठणार; काय म्हणाले एक्सपर्ट?
18
आई-वडिलांशिवाय लेकाची पहिली फ्लाईट, जिनिलिया देशमुखने शेअर केला व्हिडीओ; म्हणाली...
19
Reliance Anil Ambani: अनिल अंबानींची ७,५०० कोटींची संपत्ती जप्त; नवी मुंबईतील १३२ एकर जागा, पाली हिलमधील घरासह ४० संपत्त्यांवर टाच
20
Tripuri Purnima 2025: दिवाळीनंतर येणारी त्रिपुरी पौर्णिमा का महत्त्वाची? कशी करावी शिवउपासना?

महाजनकोचा विदर्भावर अन्याय : प्रशांत पवार यांचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2019 21:50 IST

राज्य शासनाचे स्थानिकांना रोजगार देण्याचे धोरण आहे. परंतु महाजनकोने कोल वॉश करण्याच्या कामात विदर्भातील व्यावसायिकांना डावलून महाराष्ट्राबाहेरील कंपन्यांना काम दिले आहे.

ठळक मुद्देरोजगाराच्या संधीवर गारपीट

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्य शासनाचे स्थानिकांना रोजगार देण्याचे धोरण आहे. परंतु महाजनकोने कोल वॉश करण्याच्या कामात विदर्भातील व्यावसायिकांना डावलून महाराष्ट्राबाहेरील कंपन्यांना काम दिले आहे. यामुळे विदर्भातील तरुण इंजिनिअर व बेरोजगारांवर अन्याय केला असून रोजगारांच्या संधीवर गारपीट आणली आहे, असा आरोप जय जवान, जय किसान संघटनेचे अध्यक्ष प्रशांत पवार यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत केला.महाराष्ट्रात वीज निर्मिती करणाऱ्या राज्य शासनाच्या महाजनको या कंपनीकडून वीज निर्मितीसाठी डब्ल्यू.सी.एल.,एस.ई.सी.एल.(कोरबा छत्तीसगड) व एम.सी.एल.(संबलपूर-ओडिशा) येथून कोळसा विकत घेतला जातो. महाजनको यांच्याकडून दरवर्षी सुमारे २२ मिलियन मेट्रिक टन कोळसा विकत घेते. २०११ पूर्वी महाजनको वीज निर्मितीसाठी न धुतलेला कोळसा वापरत होती. परंतु पर्यावरण विभागाने निर्बंध घातल्याने वॉशरीजचा कोळसा वापरण्याचा निर्णय घेतला. यासाठी नोडल एजन्सी म्हणून महाराष्ट्र स्टेट मायनिंग कार्पोरेशन यांची नियुक्ती केली आहे. त्यानुसार या कंपनीने वॉशरीजमधील कोळसा पुरववठ्यासाठी निविदा मागविल्या होत्या. यासाठी एम.एस.एम.सी. च्या मुख्यालयात प्री -बिडिंग मिटींग घेण्यात आली. यामध्ये ११ कंपन्यांनी सहभाग नोंदविला होता. परंतु निविदेतील जाचक अटी व शर्थीमुळे फक्त दोन कंपन्यांनी निविदा प्रक्रियेत सहभाग घेतला. दरम्यान उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार टेक्निकल व फायनान्शियल बीड उघडण्यात आले. यात विदर्भातील व्यावसायिकांना डावलून महाराष्ट्राच्या बाहेरील कंपन्यांना काम देण्यात आल्याचा आरोप पवार यांनी केला. महाजनकोने वॉश कोळसा वापरण्यासाठी डिझाईन केले आहे का, यामुळे वीज निर्मितीत वाढ झाली आहे का, पर्यावरण विभागाने वॉशरिजची परवानगी देताना पाणी वापराचा अभ्यास केला आहे का, जगात पाण्याचा वापर न करता ळसा स्वच्छ केला जातो. असा करार का  करण्यात आला नाही. वॉश कोळशामुळे वीज निर्मितीत काही प्रमाणात वाढ होत असली तरी त्यामुळे आर्थिक भूर्दंड हा सर्वसामान्य नागरिकांनाच सोसावा लागणार आहे. सर्वबाबींचा विचार करता कोलवॉशचा निर्णय चुकीचा आहे. याकडे राज्यकर्त्यांनी लक्ष द्यावे अशी मागणी प्रशांत पवार यांनी केली. यावेळी विजय शिंदे,अरुण वनकर, मिलींद महादेवकर, शेखर शिरभाते, हरीष नायडू , रवींद्र इटकेलवार आदी उपस्थित होते.

टॅग्स :Prashant Pawarप्रशांत पवारMediaमाध्यमे