शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

प्रेक्षकांनी जाणले अक्षरांच्या शैलीचे चुंबकत्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2018 01:27 IST

जाहिरातीच्या युगात कुठलीही गोष्ट नेत्रसुखद असेल तर तिच्याकडे पटकन लक्ष वेधले जाते. त्यातील स्लोगन आणि नक्षीदार अक्षरे कुणालाही आकर्षित करणारे असतात. केवळ संवाद साधने अक्षरांचे काम राहत नाही, तर लक्ष वेधणारे, मोहात पाडणारे चुंबकत्व निर्माण करण्याचे काम अशा शैलीदार अक्षरांमुळे होते. म्हणूनच सर्वांचे लक्ष वेधण्यासाठी अक्षरांच्या वेगवेगळ्या शैलीची नितांत गरज असते. मराठी भाषेत ४०० प्रकारच्या शैलीची अक्षरे निर्माण करणारे चित्रकार जयंत गायकवाड यांनी अक्षरांचे हे चुंबकत्व प्रेक्षकांसमोर उलगडले.

ठळक मुद्देजयंत गायकवाड यांचे मार्गदर्शन : अनादी चित्रप्रदर्शनातील उपक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जाहिरातीच्या युगात कुठलीही गोष्ट नेत्रसुखद असेल तर तिच्याकडे पटकन लक्ष वेधले जाते. त्यातील स्लोगन आणि नक्षीदार अक्षरे कुणालाही आकर्षित करणारे असतात. केवळ संवाद साधने अक्षरांचे काम राहत नाही, तर लक्ष वेधणारे, मोहात पाडणारे चुंबकत्व निर्माण करण्याचे काम अशा शैलीदार अक्षरांमुळे होते. म्हणूनच सर्वांचे लक्ष वेधण्यासाठी अक्षरांच्या वेगवेगळ्या शैलीची नितांत गरज असते. मराठी भाषेत ४०० प्रकारच्या शैलीची अक्षरे निर्माण करणारे चित्रकार जयंत गायकवाड यांनी अक्षरांचे हे चुंबकत्व प्रेक्षकांसमोर उलगडले.यशवंतराव चव्हाण सोशल फोरमतर्फे आयोजित अनादी या कलासृजन चित्रप्रदर्शनात शनिवारी जयंत गायकवाड यांनी अक्षरांच्या निर्मितीचे कलाभाष्य केले. मध्यवर्ती संग्रहालयाच्या कलादालनात लागलेल्या चित्रप्रदर्शनात सहभागी असलेले चित्रकार अरुण मोरघडे, नाना मिसाळ व दीनानाथ पडोळे यांच्यासह प्रसिद्ध नकलाकार राजाभाऊ चिटणीस, अ.भा. मराठी नाट्य परिषदेचे उपाध्यक्ष नरेश गडेकर, ललित कला विभागाच्या प्रमुख मुक्तीदेवी मोहिते, संयोजक दिलीप पनकुले, सहसंयोजक संजय पुंड यांच्यासह कलावंत आणि कला संस्थांचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.चित्रप्रदर्शनातील हे आयोजन खरोखर अनोखे ठरणारे होते. जयंत गायकवाड यांनी अतिशय मार्मिक शब्दात शैलीदार अक्षरांच्या निर्मितीची कथा मांडली. इंग्रजी भाषेत अक्षरांच्या शैलीची विपुलता आहे, मात्र मराठीत खूप कमी फॉन्ट असल्याची खंत होती. पुस्तकांच्या मुखपृष्ठ डिझाईनसाठी विविध शैलीच्या अक्षरांची गरज पडायची व यातून अशाप्रकारच्या शैली निर्माण झाल्या. माणूस म्हटला की राग, लोभ, मोह, माया लागून आहेत. अशा प्रत्येक भावनेनुसार अक्षरे वळली तर? क्रोध, आनंद व्यक्त करणारी, कधी नाजूक क्षण उलगडणारी, सावली पडलेली, धावणारी, अलंकारिक, एकमेकात गुंतलेली तर कधी साधी आणि सरळ अक्षरे पाहताना प्रत्येक जण त्याकडे ओढला जातो. अशा शैलीदार अक्षरांची कहाणी गायकवाड यांनी मांडली. चित्रप्रदर्शन पाहण्यासाठी कलाप्रेमींचा भरघोस प्रतिसाद मिळत असून, हे आयोजनही सर्वांसाठी महत्त्वाचे ठरले आहे. विशेषत: चित्रकलेच्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक ठरणारे होते.बिजय बिस्वाल यांनी उधळले जलरंगचित्रप्रदर्शनात आलेल्या कलारसिक आणि कलेच्या विद्यार्थ्यांसाठी प्रसिद्ध चित्रकार बिजय बिस्वाल यांचे प्रात्यक्षिक आणखी एक आकर्षणाचे केंद्र ठरले. रेल्वेचा कर्मचारी राहिलेला हा कलावंत कोणत्याही प्रशिक्षणाशिवाय स्वयंप्रेरणेने घडला आहे. जलरंगातून (वॉटर कलर) तयार केलेली त्यांची चित्रे जागतिक पातळीवर स्तुत्य ठरली आहेत. विशेषत: रेल्वेशी संबंधित त्यांची कलाकृती मोहात पाडणारी आहे. शनिवारी बिस्वाल यांनी सर्वांसमक्ष एलोरा लेण्यांचे अगदी आकर्षक असे चित्र साकारले. कलारसिकांसाठी त्यांचे प्रात्यक्षिक पाहणे एक संधी होती, पण विद्यार्थ्यांसाठी ती एक प्रेरणा ठरली. 

 

टॅग्स :painitingsपेंटिंगnagpurनागपूर