शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

प्रेक्षकांनी जाणले अक्षरांच्या शैलीचे चुंबकत्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2018 01:27 IST

जाहिरातीच्या युगात कुठलीही गोष्ट नेत्रसुखद असेल तर तिच्याकडे पटकन लक्ष वेधले जाते. त्यातील स्लोगन आणि नक्षीदार अक्षरे कुणालाही आकर्षित करणारे असतात. केवळ संवाद साधने अक्षरांचे काम राहत नाही, तर लक्ष वेधणारे, मोहात पाडणारे चुंबकत्व निर्माण करण्याचे काम अशा शैलीदार अक्षरांमुळे होते. म्हणूनच सर्वांचे लक्ष वेधण्यासाठी अक्षरांच्या वेगवेगळ्या शैलीची नितांत गरज असते. मराठी भाषेत ४०० प्रकारच्या शैलीची अक्षरे निर्माण करणारे चित्रकार जयंत गायकवाड यांनी अक्षरांचे हे चुंबकत्व प्रेक्षकांसमोर उलगडले.

ठळक मुद्देजयंत गायकवाड यांचे मार्गदर्शन : अनादी चित्रप्रदर्शनातील उपक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जाहिरातीच्या युगात कुठलीही गोष्ट नेत्रसुखद असेल तर तिच्याकडे पटकन लक्ष वेधले जाते. त्यातील स्लोगन आणि नक्षीदार अक्षरे कुणालाही आकर्षित करणारे असतात. केवळ संवाद साधने अक्षरांचे काम राहत नाही, तर लक्ष वेधणारे, मोहात पाडणारे चुंबकत्व निर्माण करण्याचे काम अशा शैलीदार अक्षरांमुळे होते. म्हणूनच सर्वांचे लक्ष वेधण्यासाठी अक्षरांच्या वेगवेगळ्या शैलीची नितांत गरज असते. मराठी भाषेत ४०० प्रकारच्या शैलीची अक्षरे निर्माण करणारे चित्रकार जयंत गायकवाड यांनी अक्षरांचे हे चुंबकत्व प्रेक्षकांसमोर उलगडले.यशवंतराव चव्हाण सोशल फोरमतर्फे आयोजित अनादी या कलासृजन चित्रप्रदर्शनात शनिवारी जयंत गायकवाड यांनी अक्षरांच्या निर्मितीचे कलाभाष्य केले. मध्यवर्ती संग्रहालयाच्या कलादालनात लागलेल्या चित्रप्रदर्शनात सहभागी असलेले चित्रकार अरुण मोरघडे, नाना मिसाळ व दीनानाथ पडोळे यांच्यासह प्रसिद्ध नकलाकार राजाभाऊ चिटणीस, अ.भा. मराठी नाट्य परिषदेचे उपाध्यक्ष नरेश गडेकर, ललित कला विभागाच्या प्रमुख मुक्तीदेवी मोहिते, संयोजक दिलीप पनकुले, सहसंयोजक संजय पुंड यांच्यासह कलावंत आणि कला संस्थांचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.चित्रप्रदर्शनातील हे आयोजन खरोखर अनोखे ठरणारे होते. जयंत गायकवाड यांनी अतिशय मार्मिक शब्दात शैलीदार अक्षरांच्या निर्मितीची कथा मांडली. इंग्रजी भाषेत अक्षरांच्या शैलीची विपुलता आहे, मात्र मराठीत खूप कमी फॉन्ट असल्याची खंत होती. पुस्तकांच्या मुखपृष्ठ डिझाईनसाठी विविध शैलीच्या अक्षरांची गरज पडायची व यातून अशाप्रकारच्या शैली निर्माण झाल्या. माणूस म्हटला की राग, लोभ, मोह, माया लागून आहेत. अशा प्रत्येक भावनेनुसार अक्षरे वळली तर? क्रोध, आनंद व्यक्त करणारी, कधी नाजूक क्षण उलगडणारी, सावली पडलेली, धावणारी, अलंकारिक, एकमेकात गुंतलेली तर कधी साधी आणि सरळ अक्षरे पाहताना प्रत्येक जण त्याकडे ओढला जातो. अशा शैलीदार अक्षरांची कहाणी गायकवाड यांनी मांडली. चित्रप्रदर्शन पाहण्यासाठी कलाप्रेमींचा भरघोस प्रतिसाद मिळत असून, हे आयोजनही सर्वांसाठी महत्त्वाचे ठरले आहे. विशेषत: चित्रकलेच्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक ठरणारे होते.बिजय बिस्वाल यांनी उधळले जलरंगचित्रप्रदर्शनात आलेल्या कलारसिक आणि कलेच्या विद्यार्थ्यांसाठी प्रसिद्ध चित्रकार बिजय बिस्वाल यांचे प्रात्यक्षिक आणखी एक आकर्षणाचे केंद्र ठरले. रेल्वेचा कर्मचारी राहिलेला हा कलावंत कोणत्याही प्रशिक्षणाशिवाय स्वयंप्रेरणेने घडला आहे. जलरंगातून (वॉटर कलर) तयार केलेली त्यांची चित्रे जागतिक पातळीवर स्तुत्य ठरली आहेत. विशेषत: रेल्वेशी संबंधित त्यांची कलाकृती मोहात पाडणारी आहे. शनिवारी बिस्वाल यांनी सर्वांसमक्ष एलोरा लेण्यांचे अगदी आकर्षक असे चित्र साकारले. कलारसिकांसाठी त्यांचे प्रात्यक्षिक पाहणे एक संधी होती, पण विद्यार्थ्यांसाठी ती एक प्रेरणा ठरली. 

 

टॅग्स :painitingsपेंटिंगnagpurनागपूर