शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

‘माफसू’ला घ्याव्या लागणार सर्वच वर्षांच्या परीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2020 10:32 IST

‘माफसू’तील नियमानुसार पदवीसाठी सर्व वर्षांचे गुण पाहण्यात येतात. त्यामुळे ‘माफसू’ला सर्वच वर्षांच्या परीक्षा घेणे अनिवार्य आहे.

ठळक मुद्देअंतिम वर्षात धरले जातात अगोदरचे गुण आंतरराष्ट्रीय पातळीवर विद्यार्थी मागे पडण्याची भीती

योगेश पांडे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ‘कोरोना’मुळे ‘माफसू’तर्फे (महाराष्ट्र अ‍ॅनिमल अ‍ॅन्ड फिशरीज सायन्स युनिव्हर्सिटी) सर्व उन्हाळी परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. सध्याची स्थिती लक्षात घेता इतर अकृषी विद्यापीठांप्रमाणे अंतिम वर्ष सोडून इतर सर्व परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. परंतु ‘माफसू’तील नियमानुसार पदवीसाठी सर्व वर्षांचे गुण पाहण्यात येतात. त्यामुळे ‘माफसू’ला सर्वच वर्षांच्या परीक्षा घेणे अनिवार्य आहे. अद्यापपर्यंत परीक्षांबाबतची नेमकी स्थिती स्पष्ट न झाल्यामुळे विद्यार्थ्यांसोबतच शिक्षकांमधील संभ्रमदेखील वाढला आहे. तर देशातील इतर पशुवैद्यकीय विद्यापीठांप्रमाणे ‘माफसू’ प्रशासनानेदेखील ‘वेट अ‍ॅन्ड वॉच’ची भूमिका घेतली आहे.‘माफसू’मधील अभ्यासक्रम हे भारतीय पशुवैद्यक परिषदेच्या किमान मापदंडावर आधारित आहे. त्यामुळे परीक्षा प्रणालीत बदल करण्यासाठी परिषदेतर्फे सुधारित दिशानिर्देश जारी झाल्याशिवाय पुढील पावले उचलता येणार नाही. यासंदर्भात देशभरातील विद्यापीठांनी परिषदेला पत्र लिहिले आहे. मात्र दिशानिर्देश जारी करण्यात आलेले नाही. दुसरीकडे विद्यार्थी काळजीत पडले आहेत. अखेरचे वर्ष वगळता इतर वर्षांच्या परीक्षा न घेता थेट विद्यार्थ्यांना ‘प्रमोट’ करण्यात यावे, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. परंतु ‘माफसू’च्या नियमानुसार सर्वच वर्षांच्या गुणांना सारखे महत्त्व आहे. त्यामुळे एखाद्या वर्षाची परीक्षा झाली नाही तर पुढे भविष्यात विद्यार्थ्यांना अडचण जाऊ शकते. अशास्थितीत सर्वच वर्षांची परीक्षा घेणे क्रमप्राप्त असल्याचा शिक्षकांचा सूर आहे. ‘माफसू’तील काही अधिकाऱ्यांनी इतर विद्यापीठांशीदेखील संपर्क केला. इतर विद्यापीठांनीदेखील सध्या कुठलाही अंतिम निर्णय न घेता प्रतीक्षा करण्याचाच निर्णय घेतला आहे. स्थितीत सुधारणा झाल्यानंतर परीक्षा घेता येतील, असा सूर आहे.

विद्यार्थ्यांचे नुकसान नको‘माफसू’च्या निकालात सर्व वर्षांच्या गुणांना महत्त्व आहे. त्यामुळे सर्व वर्षांच्या परीक्षा होणे गरजेचे आहे. अनेक विद्यार्थी आंतरराष्ट्रीय पातळीवरदेखील काम करतात, तसेच विविध आंतरराष्ट्रीय संस्थांशी जुळतात. तेथेदेखील विद्यार्थ्यांच्या या सर्व वर्षांच्या गुण व श्रेणीला महत्त्व असते. विद्यार्थ्यांचे कुठल्याही परिस्थितीत नुकसान व्हायला नको, हीच आमची भूमिका आहे. त्यामुळे भारतीय पशुवैद्यक परिषदेच्या सुधारित दिशानिर्देशांची प्रतीक्षा आहे, असे पशुवैद्यकीयशास्त्र अधिष्ठाता व ‘डायरेक्टर आॅफ इन्स्ट्रक्शन्स’ डॉ. ए.पी. सोमकुंवर यांनी सांगितले.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्र