शहरं
Join us  
Trending Stories
1
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
2
"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, जर त्यांनी ऐकलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी
3
वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात दीप्ती शर्मानं रचला इतिहास; अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय
4
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
5
World Cup की सौंदर्य स्पर्धा... 'या' ८ महिला क्रिकेटर्सना बघून म्हणाल- हिरोईन दिसते हिरोईन!
6
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश
7
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
8
ग्राहक न्यायालयाच्या लाचखाेर लिपिकास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा; ठाण्यातील प्रकरण
9
कापूस खरेदीस ‘पणन’ला परवानगी; लवकरच सीसीआयसोबत करार; आर्थिक मदतीची मागणी
10
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
11
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
12
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
13
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
14
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
15
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
16
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
17
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
18
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
19
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
20
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?

‘माफसू’ला घ्याव्या लागणार सर्वच वर्षांच्या परीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2020 10:32 IST

‘माफसू’तील नियमानुसार पदवीसाठी सर्व वर्षांचे गुण पाहण्यात येतात. त्यामुळे ‘माफसू’ला सर्वच वर्षांच्या परीक्षा घेणे अनिवार्य आहे.

ठळक मुद्देअंतिम वर्षात धरले जातात अगोदरचे गुण आंतरराष्ट्रीय पातळीवर विद्यार्थी मागे पडण्याची भीती

योगेश पांडे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ‘कोरोना’मुळे ‘माफसू’तर्फे (महाराष्ट्र अ‍ॅनिमल अ‍ॅन्ड फिशरीज सायन्स युनिव्हर्सिटी) सर्व उन्हाळी परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. सध्याची स्थिती लक्षात घेता इतर अकृषी विद्यापीठांप्रमाणे अंतिम वर्ष सोडून इतर सर्व परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. परंतु ‘माफसू’तील नियमानुसार पदवीसाठी सर्व वर्षांचे गुण पाहण्यात येतात. त्यामुळे ‘माफसू’ला सर्वच वर्षांच्या परीक्षा घेणे अनिवार्य आहे. अद्यापपर्यंत परीक्षांबाबतची नेमकी स्थिती स्पष्ट न झाल्यामुळे विद्यार्थ्यांसोबतच शिक्षकांमधील संभ्रमदेखील वाढला आहे. तर देशातील इतर पशुवैद्यकीय विद्यापीठांप्रमाणे ‘माफसू’ प्रशासनानेदेखील ‘वेट अ‍ॅन्ड वॉच’ची भूमिका घेतली आहे.‘माफसू’मधील अभ्यासक्रम हे भारतीय पशुवैद्यक परिषदेच्या किमान मापदंडावर आधारित आहे. त्यामुळे परीक्षा प्रणालीत बदल करण्यासाठी परिषदेतर्फे सुधारित दिशानिर्देश जारी झाल्याशिवाय पुढील पावले उचलता येणार नाही. यासंदर्भात देशभरातील विद्यापीठांनी परिषदेला पत्र लिहिले आहे. मात्र दिशानिर्देश जारी करण्यात आलेले नाही. दुसरीकडे विद्यार्थी काळजीत पडले आहेत. अखेरचे वर्ष वगळता इतर वर्षांच्या परीक्षा न घेता थेट विद्यार्थ्यांना ‘प्रमोट’ करण्यात यावे, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. परंतु ‘माफसू’च्या नियमानुसार सर्वच वर्षांच्या गुणांना सारखे महत्त्व आहे. त्यामुळे एखाद्या वर्षाची परीक्षा झाली नाही तर पुढे भविष्यात विद्यार्थ्यांना अडचण जाऊ शकते. अशास्थितीत सर्वच वर्षांची परीक्षा घेणे क्रमप्राप्त असल्याचा शिक्षकांचा सूर आहे. ‘माफसू’तील काही अधिकाऱ्यांनी इतर विद्यापीठांशीदेखील संपर्क केला. इतर विद्यापीठांनीदेखील सध्या कुठलाही अंतिम निर्णय न घेता प्रतीक्षा करण्याचाच निर्णय घेतला आहे. स्थितीत सुधारणा झाल्यानंतर परीक्षा घेता येतील, असा सूर आहे.

विद्यार्थ्यांचे नुकसान नको‘माफसू’च्या निकालात सर्व वर्षांच्या गुणांना महत्त्व आहे. त्यामुळे सर्व वर्षांच्या परीक्षा होणे गरजेचे आहे. अनेक विद्यार्थी आंतरराष्ट्रीय पातळीवरदेखील काम करतात, तसेच विविध आंतरराष्ट्रीय संस्थांशी जुळतात. तेथेदेखील विद्यार्थ्यांच्या या सर्व वर्षांच्या गुण व श्रेणीला महत्त्व असते. विद्यार्थ्यांचे कुठल्याही परिस्थितीत नुकसान व्हायला नको, हीच आमची भूमिका आहे. त्यामुळे भारतीय पशुवैद्यक परिषदेच्या सुधारित दिशानिर्देशांची प्रतीक्षा आहे, असे पशुवैद्यकीयशास्त्र अधिष्ठाता व ‘डायरेक्टर आॅफ इन्स्ट्रक्शन्स’ डॉ. ए.पी. सोमकुंवर यांनी सांगितले.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्र