शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

मध्यप्रदेशातील चौराईचे सहाही दरवाजे उघडले; नागपूरची पाणीकपात संपण्याचे संकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2019 12:08 IST

चौराई प्रकल्प तुडुंब भरला असून, धरणाचे सहाही दरवाजे उघडण्यात आले आहेत. त्यामुळे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या दोन्ही प्रकल्पात पाणीसाठा वाढणार आहे.

ठळक मुद्दे८० ते ८५ दलघमी पाणी पोहचणार तोतलाडोहमध्ये

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या प्रकल्पाची पाणी पातळी घटल्याने नागपूरच्या इतिहासात पहिल्यांदा पावसाळ्यातही शहरात पाणीकपात करावी लागत आहे. विशेष म्हणजे हे प्रकल्प मध्य प्रदेशातील चौराई धरणावर अवलंबून आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, चौराई तुडुंब भरला असून, धरणाचे सहाही दरवाजे उघडण्यात आले आहेत. त्यामुळे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या दोन्ही प्रकल्पात पाणीसाठा वाढणार आहे. परिणामी पाण्याची होणारी कपातही बंद करण्यात येण्याचे संकेत मिळताहेत.सध्या शहरामध्ये एक दिवसाआड पाणी पुरवठा होत आहे. महापालिकेकडून सांगण्यात येत आहे की, शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या प्रकल्पाच्या पाणीसाठ्यात वाढ झालेली नाही. पावसाळ्यात पहिल्यांदाच पाणीकपात नागरिकांना सहन करावी लागत आहे. सणासुदीच्या दिवसात पाणीकपातीमुळे लोकांची डोकेदुखी वाढली आहे. शहराला तोतलाडोह आणि कामठी खैरी या प्रकल्पातून पाणीपुरवठा होतो. जिल्ह्यात २४ ऑगस्टपर्यंत ७०० मि. मी. पाऊस पडला आहे. जो सरासरीच्या ४३ मि. मी. ने कमी आहे. असे असले तरी पाणीपुरवठा करणारे तोतलाडोह येथे २३.१ टक्के पाणीसाठा आहे. त्यातील उपयुक्त पाणीसाठा १२.१ टक्के आहे. तोतलाडोह येथे आतापर्यंत २७३.०२ दलघमी पाणीसाठा आहे. त्यातून १२३.०२ दलघमी पाण्याचा उपयोग केल्या जाऊ शकतो. विशेष म्हणजे तोतलाडोहची क्षमता ११६६.९३ दलघमी आहे.कामठी खैरीमध्ये ७७.७४ दलघमी पाणीसाठा आहे. त्यापैकी ३८.७४ दलघमी उपयुक्त पाणीसाठा आहे. कामठी खैरीची पाणी क्षमता १८०.९८ दलघमी आहे. दोन्ही प्रकल्पात क्षमतेपेक्षा पाणीसाठा कमी असल्याने महापालिकेला पाणीकपात करावी लागत होती. विशेष म्हणजे महापालिकेने २२ ऑगस्टपर्यंत पाणीकपातीचा निर्णय घेतला होता. पण पाणीसाठ्यात अपेक्षित वाढ न झाल्याने हा निर्णय ३१ ऑगस्टपर्यंत घेण्यात आला आहे. पेंच जलशुद्धीकरण केंद्रातून शहरासाठी दररोज ४५० एमएलडी पाणी उचलण्यात येते. त्यातून शहराच्या ७० टक्के भागाला पाणीपुरवठा करण्यात येतो. पेंच जलशुद्धीकरण केंद्राला तोतलाडोह येथून पाणीपुरवठा होतो.ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात तोतलाडोहच्या डेड स्टॉक १५० दलघमी वरून ५० दलघमीच्या खाली आला होता. १५ ऑगस्टपर्यंत चौराई धरणात ९० टक्के स्टॉक जमा झाल्याने त्या धरणातून पाणी सोडण्यात सुरुवात झाली. चौराई धरणाची क्षमता ४२१ दलघमी असून चौराईचे जलस्तर सातत्याने वाढत आहे. २५ ऑगस्टला सकाळी ८.३० वाजतापर्यंत १२.०९ टक्के जलसाठा जमा झाल्याची नोंद करण्यात आली होती. ही क्षमता १२३ दलघमी आहे. गेल्या वर्षी या काळात २३.१ टक्के एवढा जलसाठा होता. तोतलाडोह धरणाची क्षमता ११६६.९३ दलघमी आहे व सध्या येथे २७२.०२ दलघमी पाणीसाठा आहे. यापैकी १२३.०२ दलघमी उपयुक्त साठा आहे. तसेच नवेगाव खैरीमध्ये २७.२८ टक्के पाणीसाठा आहे. गेल्यावर्षी हा साठा ३६.१९ टक्के एवढा होता. सध्या नवेगाव खैरीमध्ये ७७.७४ दलघमी पाणीसाठा आहे. यापैकी ३८.७४ दलघमी उपयोगात आणला जाउ शकतो. या डॅमची एकूण क्षमता १८० दलघमी आहे. १५ ऑगस्ट रोजी मध्य प्रदेशातील चौराई धरण ९० टक्के भरल्याने दोन दरवाजे उघडण्यात आले होते. पुन्हा चौराईच्या धरणाची पाणी पातळी वाढल्याने आता सहाही दरवाजे उघडण्यात आले आहे. त्यामुळे चौराईतून ८० ते ८५ दलघमी पाण्याचा दररोज विसर्ग होणार आहे. त्यामुळे तोतलाडोह धरणाच्या पाणी पातळीत वाढ होणार आहे. परिणामी पाणी कपातीवरही अंकुश बसण्याचे चिन्ह आहे.

टॅग्स :Waterपाणी