शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

मध्यप्रदेशात भाजपची पिछेहाट, तर काँग्रेसचे जोरदार कमबॅक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2018 14:54 IST

मध्य प्रदेशात भाजपाला ‘अ‍ॅन्टीइन्कम्बन्सी’ चा चांगलाच फटका बसत आहे. पदाधिकाऱ्यांची नाराजी, बंडखोरांनी पक्षविरोधी केलेल्या कारवायांमुळे भाजपची पिछेहाट झाल्याचे चित्र आहे.

गजानन चोपडेलोकमत न्यूज नेटवर्कभोपाळ : मध्य प्रदेशात भाजपाला ‘अ‍ॅन्टीइन्कम्बन्सी’ चा चांगलाच फटका बसत आहे. पदाधिकाऱ्यांची नाराजी, बंडखोरांनी पक्षविरोधी केलेल्या कारवायांमुळे भाजपची पिछेहाट झाल्याचे चित्र आहे. मतगणनेची प्रक्रिया सुरू असून सध्या भाजपने ११० जागांवर आघाडी घेतली आहे. मागील निवडणुकीच्या तुलनेत तब्बल ५५ जागांचे नुकसान भाजपला होत आहे. तर काँग्रेसने १०९ जागांवर आघाडी घेत जोरदार कमबॅक केले आहे. विशेष म्हणजे ही निवडणूक भाजपाला महागात पडू शकते, असा सल्ला खुद्द मुख्यमंत्री शिवराज सिंह चव्हाण यांचे राजकीय गुरू आणि ज्येष्ठ संघ प्रचारक सूर्यकांत केळकर यांनी यापूर्वीच दिले होते. आजच्या निकालानंतर त्यावर शिक्कामोर्तब होताना दिसत आहे.व्यापंम घोटाळ्यामुळे मध्य प्रदेश सरकारवर काँग्रेसने आधीच टीकेची झोड उठवली होती. शेतकऱ्यांच्या आंदोलनात झालेला गोळीबार त्यात ठार झालेले सहा शेतकरी, हेदेखील भाजपच्या ढासळत्या जनाधाराचे मुख्य कारण मानले जात आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्र्यांचे मेव्हणे संजय मसानी यांनी भाजपला रामराम ठोकत कॉग्रेस प्रवेश केला. मुख्यमंत्र्यांसाठी हा पहिला मोठा धक्का होता. याशिवाय अनेक महत्त्वाच्या नेत्यांनी केलेली बंडखोरी भाजपला भोवली. पक्षाकडून त्यांच्या मनधरणीचा प्रयत्न झाला असला तरी नाराजीचा सूर कायम होता, हेच या निकालावरून स्पष्ट होत आहे. भाजपला बहुमताचा आकडा गाठता येईल? किंवा नाही, याबाबत खुद्द भाजप नेत्यांमध्येच साशंकता आहे. त्यामुळे कुठलाही मोठा नेता आतापर्यंत माध्यमांपुढे आला नाही. शिवाय ‘मीच सर्वात मोठा सर्वेयर’ असे म्हणणारे मुख्यमंत्रीही निकाल बघून अवाक् झाले आहेत. तिकडे गेली १५ वर्षे गटबाजीमुळे मध्यप्रदेशात तळाला आलेल्या काँग्रेसमध्ये उत्साह संचारला आहे. कमलनाथ, ज्योतिरादित्य सिंधिया आणि दिग्विजय सिंह यांची एकजूट काँग्रेसला लाभकारी ठरली. भाजपला अपेक्षित मतांचे विभाजनही झालेले दिसत नाहीे.

 

 

 

टॅग्स :Electionनिवडणूक