शहरं
Join us  
Trending Stories
1
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
2
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
3
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
4
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
5
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
6
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ
7
Plane Crash : इरफान बेटा, उठ... मुझसे बात कर..! विमान अपघातातील मृताच्या आईने फोडला हंबरडा
8
ENG vs IND : ३ शतकवीर अन् मग ४१ धावांत ७ विकेट्स! टीम इंडिया पहिल्या डावात ४७१ धावांवर All Out
9
केव्हा पूर्ववत होणार पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार? अमित शाह स्पष्टच बोलले, दिलं असं उत्तर की शाहबाज यांची झोप उडेल
10
इस्त्रायल युद्धावेळीच इराणमध्ये मोठा भूकंप; इराणनं केली अणु चाचणी? चर्चांना उधाण
11
'ऑपरेशन सिंधू' केवळ भारतीयच नव्हे, 'या' देशाच्या विद्यार्थ्यांनाही इराणमधून सुखरूप बाहेर आणणार!
12
"डियर क्रिकेट गिव्ह मी वन मोअर चान्स" वाल्या करुण नायरच्या पदरी भोपळा! (VIDEO)
13
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
14
Yogini Ekadashi 2025: योगिनी एकादशीला विष्णुकृपा; त्रिपुष्कर योगात ५ राशींना धनलाभाची संधी
15
"माझ्या भांगेत कुंकू भर..." आत्महत्येआधी तिने चिठ्ठीत लिहिलं होते; नैराश्यामागचे कारण काय?
16
इस्रायलचा दावा, वरिष्ठ इराणी लष्करी कमांडर सईद इजादी ठार; हमासशी संबंध असल्याचा आरोप!
17
शाहरुख खानच्या मन्नतवर बीएमसीची कारवाई! नूतनीकरणाच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप
18
जिओ, एअरटेलची तयारी! दर दिवसाच्या हिशेबा सारखाच दर तासाला डेटा मिळणार...; रिचार्ज मात्र...
19
Ashadhi Wari 2025: दिंडीतून जाताना वारकरी महिला डोईवर तुळशी वृंदावन नेतात; पण का? वाचा!
20
"देवेंद्रजीसुद्धा योगीच, ते कसरत नाही पण..', अमृता फडणवीस यांचं विधान

लुप्त झालेले रेशीम वाण पुन्हा अवतरणार कशिद्यात; नागपूरकर प्राध्यापकाचे प्रयत्न फळाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2022 07:40 IST

Nagpur News गडचिरोली जिल्ह्यातून जवळपास लुप्तप्राय झालेले ‘इको रेस भंडारा’ नावाचे टसर रेशीम वाण आता नव्याने फुलणार आहे.

ठळक मुद्देगडचिराेलीच्या आदिवासींचे भविष्य बदलेल

उदय अंधारे

नागपूर : गडचिरोली जिल्ह्यातून जवळपास लुप्तप्राय झालेले ‘इको रेस भंडारा’ नावाचे टसर रेशीम वाण आता नव्याने फुलणार आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील प्राणिशास्त्र विभागाचे माजी प्रमुख डॉ. दीपक बारसागडे आणि संशोधकांच्या प्रयत्नांमुळे हे वाण ना केवळ पुनरुज्जीवित झाले, तर वाढलेसुद्धा. या संशाेधकांनी वाणाची लागवड पाच टक्क्यांवरून साठ टक्क्यांपर्यंत वाढवली आहे.

कधीकाळी हे टसर मागासलेल्या जिल्ह्यातील आदिवासींचे उत्पन्नाचे साधन हाेते. मात्र, काळानुसार ते लयाला गेले. डाॅ. बारसागडे व त्यांच्या टीमने राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान मिशनअंतर्गत मंजूर प्रकल्पातून परिवर्तन घडविले. गडचिराेलीच्या शिरपूर, पेंढरी, सूर्याडाेंगरी आणि जंगलातील इतर गावांतील आदिवासींकडून अर्जुन व येन झाडावर टसर रेशीम अळ्यांची निर्मिती केली जाते.

टसर रेशीम संवर्धनाचे चार टप्पे

- जनजागृतीच्या अभावामुळे आदिवासी लाेक १०० टक्के रेशीम कोष बाजारात विक्रीला नेत हाेते. यामुळेच टसर रेशीम अळ्यांच्या प्रजाती धाेक्यात आल्या.

- संवर्धनाचे पहिले पाऊल म्हणून आदिवासींना केवळ ७० टक्के कोष विक्रीला नेऊन उर्वरित ३० टक्के संतती वाढविण्यासाठी राखून ठेवण्यास सांगितले.

- दुसऱ्या टप्प्यात टसर कोष आणून विद्यापीठाच्या प्रयाेगशाळेत ठेवून पालणपाेषण केल्यानंतर रेशमाचे पतंग मुक्त करण्यात आले.

- प्रयाेगशाळेत प्रजनन घडवून अंडी शेतकऱ्यांना पुरविली. अर्जुन व येन झाडावर अंडी साेडल्यावर अळ्या बाहेर पडल्या. त्यांनी स्वत:भोवती केलेल्या कोषमधील धाग्याची लांबी १ हजार मिमी आहे.

- तिसऱ्या टप्प्यात लाेकांना नैसर्गिक परिस्थितीत अळ्यांचे शत्रू कीटकांपासून संरक्षण करण्याबाबत प्रशिक्षण देण्यात आले. बांबू बास्केटमध्ये कोष व अळ्यांचे जतन व संवर्धनासाठी प्रशिक्षण देण्यात आले.

शेतकरी दरवर्षी २० हजार कमावू शकतात

एक रुपया प्रतिकोष यानुसार आदिवासी कुटुंबांनी वर्षाला २० हजार कोष जमा केले, तर २० हजार रुपयांचे उत्पन्न हाेऊ शकते. सध्या भंडारा जिल्ह्यातील १०० आदिवासींनी या प्रकल्पातून लाभ मिळविला आहे.

इकाे रेस भंडारा वाणाला सुगीचे तीन हंगाम असतात. जून ते ऑगस्टमध्ये पहिला, सप्टेंबर ते नाेव्हेंबरमध्ये दुसरा, तर हिवाळ्याची सुरुवात व अंतापर्यंत तिसरा हंगाम असताे. नैसर्गिक परिस्थितीत एक पतंग १५० ते २०० अंडी घालते. मात्र, प्रयाेगशाळेत एका पतंगाच्या २०० अंड्यांमधून १६० अळ्या व ८० कोषांची निर्मिती शक्य आहे.

- डाॅ. दीपक बारसागडे, माजी प्रमुख, प्राणिशास्त्र विभाग, नागपूर विद्यापीठ

टॅग्स :agricultureशेती