शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

धुक्यात हरवली वाट; १९ दिवस बंद राहणार काही उड्डाणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2019 10:12 IST

गो एअरची दोन विमाने सिस्टिममधून काढून टाकण्यात आली आहेत. ११ ते ३० नोव्हेंबरपर्यंत ऑनलाईल बुकिंग करणाऱ्यांना ही विमाने रद्द असल्याचे दिसून येत आहे.

ठळक मुद्देपाच विमानांना विलंब दाट धुके चिंतेचा विषय

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : रविवारी दिल्ली येथे दाट धुके असल्यामुळे विमानांच्या हवाई वाहतुकीवर विपरीत परिणाम झाला. दिल्ली येथून उड्डाण केलेली विमाने देशाच्या विविध भागात उशिरा पोहोचली. यामध्ये नागपुरातील तीन विमानांचा समावेश आहे.दिल्ली येथून नागपुरात उशिरा पोहोचणाऱ्या विमानांमध्ये इंडिगो एअरलाईन्सचे ६ई १३५ दिल्ली-नागपूर विमान २.२० मिनिटे उशिरा अर्थात निर्धारित वेळ दुपारी १२ ऐवजी २.२० वाजता पोहोचले. ६ई-२०१७ दिल्ली-नागपूर विमान जवळपास अर्धा तास विलंबाने सकाळी ९.०७ वाजता उतरले. याशिवाय गो एअरचे २५१९ दिल्ली-नागपूर विमान १.४५ मिनिटे उशिरा रात्री ८.२० ऐवजी १०.४० वाजता आले. इंडिगोचे ६ई ५३२५ मुंबई-नागपूर विमान अर्धा तास विलंबाने सकाळी १०.२९ वाजता पोहोचले. याशिवाय एअर इंडियाचे एआय-६२९ मुंबई-नागपूर विमान एक तास विलंबाने रात्री जवळपास ९.३० वाजता आले. दिल्ली आणि आसपासच्या शहरांमध्ये रविवारला वायू प्रदूषण वाढल्याने जास्त धुके दाटले होते. माहितीनुसार धुक्याची दृश्यता अत्यंत कमी झाली होती. धुक्यामुळे दृश्यतेवर अधिक परिणाम झाला. दिल्लीत अशाप्रकारे धुके नेहमीच दाटत असल्यामुळे चिंतेचा विषय झाला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार विमान कंपन्यासुद्धा आता विमानाच्या वेळेच्या संदर्भात विचार करीत आहे. रविवारी धुक्यामुळे दिल्लीला येणाºया ३७ विमानांना इतरत्र वळविण्यात आले.

१९ दिवस बंद राहणार उड्डाण!गो एअरची दोन विमाने सिस्टिममधून काढून टाकण्यात आली आहेत. ११ ते ३० नोव्हेंबरपर्यंत ऑनलाईल बुकिंग करणाऱ्यांना ही विमाने रद्द असल्याचे दिसून येत आहे. यामध्ये जी८-२५१५ दिल्ली-नागपूर विमान (उड्डाण सकाळी ६.५५ वाजता) आणि जी८-२५१६ नागपूर-दिल्ली (उड्डाण सकळी ९.०५ वाजता) या विमानांचा समावेश आहे. एअरलाईन्स सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ही विमाने रद्द करण्यामागे कंपनीला नागपूर कार्यालयाला अजूनही स्पष्टीकरण पाठविले नाही. पण सिस्टिमवर ‘ऑपरेशनल रिझन’ एवढेच दिसून येत आहे. जास्त प्रवासी मिळविण्याच्या काळात अर्थात ‘विंटर सीझन’मध्ये विमाने रद्द करण्याचे कारण का असावे, हे स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे कंपनीला दिल्ली मार्गावर १९ दिवसांसाठी उड्डाण रद्द करावे लागलेआहे.

रायपूरला धुके, विमान नागपुरात वळविले एअर इंडियाच्या दिल्ली-रायपूर विमानाला धुक्याचा सामना करावा लागला. धुक्यामुळे विमान रायपूरला उतरू शकले नाही. अखेर नागपूरला वळवून उतरविण्यात आले. एअर इंडियाचे एआय ४७७ दिल्ली-रायपूर विमान रविवारी पहाटे ५.२५ वाजता दिल्लीहून रवाना झाले. सकाळी ७.३० च्या सुमारास रायपूर येथे पोहोचल्यानंतर दृश्यता कमी असल्यामुळे एटीसीकडून उतरण्यासाठी हिरवी झेंडी मिळाली नाही. त्यानंतर वैमानिकांने नागपूरच्या हवाई नियंत्रण कक्षाशी (एटीसी) संपर्क साधून विमान उतरण्याची परवानगी मागितली. अखेर हे विमान (एअरबस ३१९) नागपुरात सकाळी ८.२५ वाजता उतरले. नागपुरात एक तास थांबल्यानंतर सकाळी ९.२० वाजता पुन्हा रायपूरकडे रवाना झाले. प्राप्त माहितीनुसार रायपूर येथे सकाळी ९.३० पर्यंत येणारी सर्व विमाने उशिरा पोहोचली आणि धुक्यामुळे काही विमानांना इतरत्र वळवावे लागले.

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkar International Airportडॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ नागपूर