शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प तोंडघशी पडले, कसले सीझफायर? इराणकडून इस्रायलवर मिसाईलचा वर्षाव; तिघांचा मृत्यू...
2
"मी विसरूनच गेलो होतो की..."; 'शतकवीर' केएल राहुलचा टीम मॅनेजमेंटला खोचक टोला?
3
Mumbai: मुंबईतील भांडूप परिसरात घराची भिंत कोसळली; दोन चिमुकल्यांसह वृद्ध महिला जखमी
4
युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं निवडीसाठी डेडलाईन वाढवली, का घेतला निर्णय?
5
"आमचा देश शरणागती पत्करणाऱ्यातला नाही"; युद्धबंदीच्या घोषणेनंतर खामेनी यांचे मोठे विधान
6
दहशतवादाविरोधात चीन देणार भारताला साथ?; अजित डोवाल यांनी घेतली चिनी परराष्ट्र मंत्र्यांची भेट
7
Pune Railway Station: पुणे रेल्वे स्थानकाच्या नामांतरावरून वाद, राजकारण्यांची चढाओढ, कोणी काय मागणी केली? वाचा
8
धक्कादायक! एकतर्फी प्रेम, तरुणाचं लग्न, तरुणीने १२ राज्याच्या पोलिसांना लावले कामाला, अहमदाबाद विमान क्रॅश केल्याचा दावा
9
Mumbai Local Train: कुर्ला स्थानकात तांत्रिक बिघाड; मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, गाड्या १० ते १५ मिनिटे उशिराने
10
६० वर्ष इराणमधून व्यवसाय चालवायचं हे भारतीय औद्योगिक घराणं; आता आहे ब्रिटनचं सर्वात श्रीमंत कुटुंब
11
Mumbai: दारूसाठी पैसे देण्यास नकार दिल्याने पती संतापला, मुलांसमोर पत्नीला संपवलं, मुंबईतील भयानक घटना
12
पंढरपूरला पुराचा धोका, उजनीतून भीमा नदीत ३१ हजार ६०० क्युसेकचा विसर्ग
13
"मला भीती वाटतेय...", 'रामायण'मध्ये हनुमानाच्या भूमिकेबाबत सनी देओलचं वक्तव्य, म्हणाला...
14
Iran-Israel Ceasefire: इराणच्या हल्ल्यानंतर बंद केलेले कतारचे हवाई क्षेत्र पुन्हा सुरू; इंडिगोने दिली माहिती
15
बीड: पालकांचे पैसे वाचणार; गावातच शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या घरची घरपट्टी, नळपट्टी माफ
16
Stock Market Today: 'या' वृत्तानं शेअर बाजारात उत्साह; ६३२ अंकांच्या तेजीसह सेन्सेक्स खुला, Midcap शेअर्समध्ये खरेदी
17
सौरव गांगुलीला अजूनही खटकते करियमधली 'ती' एक गोष्ट; निवृत्तीच्या १७ वर्षानंतर व्यक्त केल्या भावना
18
"...तरच आम्ही हल्ले थांबवू’’, युद्धविरामावर इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
19
'ऑपरेशन सिंधू'ला गती, इराणमधून २९० भारतीयांना परत आणले; यादीत श्रीलंकेच्या महिलेचाही समावेश
20
इस्राइल-इराणमधील संघर्ष शिगेला, अमेरिकेच्या तळांवरही हल्ले, मग अचानक युद्धविराम कसा झाला? पडद्यामागे काय घडलं, अशी आहे Inside Story

प्रस्तावित वीज प्रकल्पामुळे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2019 01:08 IST

आधीच्या प्रकल्पामुळे प्रदूषणाची पातळी झपाट्याने वाढून पर्यावरण व आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण झाल्या असताना नवा औष्णिक प्रकल्प नागपूरकरांच्या जीवावर उठणार, अशी भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली.

ठळक मुद्देजनमंच जनसंवादमध्ये तज्ज्ञांनी व्यक्त केली भीती

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : विदर्भात आधीच विविध औष्णिक प्रकल्पातून १७,००० मेगावॅट वीजनिर्मिती केली जाते. लोकांची गरज व मागणी नसताना १३२० मेगावॅटचा आणखी एक विद्युत प्रकल्प कोराडी येथे सुरू करण्यात येत आहे. जळणाऱ्या कोळशामुळे अत्यंत धोकादायक सल्फरडाय ऑक्साईड आणि रेडिओअ‍ॅक्टीव्ह कणांचे मोठ्या प्रमाणात उत्सर्जन होते. आधीच्या प्रकल्पामुळे प्रदूषणाची पातळी झपाट्याने वाढून पर्यावरण व आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण झाल्या असताना नवा प्रकल्प नागपूरकरांच्या जीवावर उठणार, अशी भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली.जनमंचतर्फे जनसंवाद कार्यक्रमांतर्गत शनिवारी बाबुराव धनवटे सभागृहात कोराडीचा प्रस्तावित औष्णिक वीज प्रकल्प नागपूरकरांच्या जीवावर उठणार काय, या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. यात विदर्भ पर्यावरण कृती समितीचे संयोजक सुधीर पालीवाल आणि महाविदर्भ जनजागरण समितीचे संयोजक नितीन रोंघे यांनी या प्रकल्पामुळे होणाऱ्या धोक्याचे संकेत दिले. जनमंचचे अध्यक्ष प्रमोद पांडे, उपाध्यक्ष राजीव जगताप व्यासपीठावर उपस्थित होते. पालीवाल म्हणाले, जगात कुठेही नसतील एवढे वीज प्रकल्प नागपूरच्या आसपास आहेत. १० वर्षांपूर्वी हरित लवादाने प्रदूषण नियंत्रणासाठी सिस्टीम लावण्याचे निर्देश देऊनही कोराडीत ते बसविण्यात आले नाही. यामुळे अनेक आजार आणि मृत्यू ओढविल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी नितीन रोंघे यांनीही प्रकल्पाला कडाडून विरोध दर्शविला. प्रास्ताविक राजीव जगताप यांनी तर संचालन अ‍ॅड. मनोहर रडके यांनी केले.

टॅग्स :electricityवीजnagpurनागपूर