शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्ही भारत आणि पाकिस्तानला शस्त्रे टाकण्यास सांगू शकत नाही' : जेडी व्हेन्स
2
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
3
Robert Prevost: काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
4
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
5
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
7
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
8
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
9
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल
10
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
11
Operation Sindoor Live Updates: एलओसीवर स्फोटांचे आवाज, जम्मूमध्ये पूर्णपणे ब्लॅकआऊट
12
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद
13
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
14
JF 17 लढाऊ विमानासह हद्दीत घुसलेला पायलट भारताच्या ताब्यात
15
नियंत्रण रेषेवर गोळीबार, एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले, भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाला तोंड फुटलंय की...
16
पठाणकोट, राजौरीमध्ये दहशतवाद्यांनी खरंच आत्मघाती हल्ला केला का? भारतीय लष्कराने दिली माहिती
17
पाकिस्तानने अमेरिका, चीनचे नाक कापले! भारताने जैसलमेरमध्ये आणखी एक एफ-१६ पाडले
18
"...तर पाकिस्तान जगाच्या नकाशावरही दिसणार नाही"; एकनाथ शिंदे यांचे सडेतोड वक्तव्य
19
India Pakistan War: 'आताच लाहोर सोडा', अमेरिकेने पाकिस्तानात राहणाऱ्या नागरिकांना सूचना दिल्या
20
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच

रिपब्लिकन निष्ठा गमावल्याने आंबेडकरी राजकारणाची वाताहत ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2020 04:08 IST

नागपूर : डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रारूप तयार करून दिलेल्या रिपब्लिकन पक्षाबद्दलची निष्ठा गमावल्यानेच आंबेडकरी राजकारणाची पुरती वाताहत झाली, ...

नागपूर : डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रारूप तयार करून दिलेल्या रिपब्लिकन पक्षाबद्दलची निष्ठा गमावल्यानेच आंबेडकरी राजकारणाची पुरती वाताहत झाली, अशी खंत ज्येष्ठ पत्रकार व आंबेडकरी विचारवंत प्रा. रणजित मेश्राम यांनी व्यक्त केली. सामाजिक कार्यकर्ता अनिल वासनिक यांनी लिहिलेल्या ‘नागपूर महानगरातील आंबेडकरी राजकारण : ताैलनिक विश्लेषण’ या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात ते बाेलत हाेते.

प्रेस क्लब येथे झालेल्या या समारंभात मिलिंद फुलझेले, अशाेक सरस्वती, उष:काल प्रकाशनचे प्रा. रत्नाकर मेश्राम उपस्थित हाेते. प्रा. रणजित मेश्राम म्हणाले, कधीकाळी रिपब्लिकन विचारधारेचे नागपूरसह राज्याच्या राजकारणात प्राबल्य हाेते. नागपूर महापालिकेच्या सत्तेत या पक्षाचे वर्चस्व हाेते. एखादी संघटना किंवा पक्ष खंडित करण्यासाठी त्याच्या विचारधारेवरील निष्ठा संपवावी लागते. इतर पक्षांनी त्याचे प्रयत्न जाेरात केले पण दुर्दैवाने दलित नेत्यांनीच त्याचा कळस घातला. आधी यांनी रिपब्लिकन संकल्पना साेडून वेगळ्या संघटना व पक्ष काढले व लाेकांच्या मनातील या विचारधारेची निष्ठा संपवली. त्यानंतर हे नेते पुन्हा रिपब्लिकन झेंडे घेऊन आले पण उशीर झाला. ताेपर्यंत राजकारणातील रिपब्लिकन वर्चस्वच संपले आणि आंबेडकरी चळवळ अनाथालयात गेली. १९५२ पासूनचा आनंददायी आलेख २०२० येतायेता क्लेषदायक झाला. आंबेडकरी समाजाची ही वेदना वासनिक यांनी व्यवहारिकपणे या पुस्तकात मांडल्याची भावना प्रा. मेश्राम यांनी व्यक्त केली.

अशाेक सरस्वती म्हणाले, बुद्धिजीवी समाजाचे नियंत्रण राहिले नसल्याने राजकारणाचा साैदा करणाऱ्यांकडे आंबेडकरी चळवळीची सूत्रे गेली. आज बहुजन समाज भयंकर परिस्थितीतून जात आहे. संविधानाचा खाेका केला जात आहे. आरक्षण संपवले जात आहे व बहुजनांना शिक्षणातून बाद केले जात आहे. अशावेळी भावनिक राजकारण साेडून मुद्द्यावरील आंदाेलनाची, चांगल्या नेतृत्वाची व याेजनाबद्ध राजकारणाची गरज आहे. हे पुस्तक निवडणुकांचे विश्लेषण नाही तर आंबेडकरी राजकारणाचा मार्गदर्शक दस्तावेज आहे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. मिलिंद फुलझेले यांनी राजकारणात दलित नेत्यांनी आंबेडकरी समाजाचा फुटबाॅल केल्याची टीका केली. रिपब्लिकन अस्तित्व कुणाच्याही दावणीला बांधले आहे. समतेची एवढी महान विचारधारा असलेल्या पक्षाचो दुरावस्था का झाली, याचे चिंतन करावे लागेल, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. कार्यक्रमाचे संचालन गझलकार कवी हृदय चक्रधर यांनी केले.