शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
4
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
5
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
6
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
7
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
8
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
9
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
10
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
11
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
12
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
13
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
14
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
15
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
16
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
17
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
18
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

कापूस खरेदीत शेतकºयांची लूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2017 23:08 IST

तालुक्यातील दोन्ही ठिकाणी उद्यापर्यंत शासकीय कापूस खरेदी केंद्र सुरु करण्यात आले नाही. त्यामुळे नाईलाजास्तव शेतकºयांना आपला कापूस खुल्या बाजारात विकावा लागत आहे.

ठळक मुद्देशेतकरी संतप्त : दारव्हा तालुक्यात शासकीय कापूस खरेदीचा मुहूर्तच नाही

लोकमत न्यूज नेटवर्कदारव्हा : तालुक्यातील दोन्ही ठिकाणी उद्यापर्यंत शासकीय कापूस खरेदी केंद्र सुरु करण्यात आले नाही. त्यामुळे नाईलाजास्तव शेतकºयांना आपला कापूस खुल्या बाजारात विकावा लागत आहे. आता संपूर्ण कापूस व्यापाºयांकडे गेल्यानंतर ही केंद्रे सुरु करणार का असा संतप्त सवाल शेतकºयांनी उपस्थित केला आहे.ही केंद्रे सुरू करण्याबाबत पणन महासंघाकडे संपर्क साधला तर दारव्हा सीसीआयकडे असल्याचे सांगण्यात येते तर सीसीआयचे अधिकारी स्टाफ नसल्याचे कारण पुढे करतात. या दोन्ही एजंसीकडून अशा प्रकारे टोलवाटोलवी सुरू असून यात शेतकºयांचे मोठे नुकसान होत आहे. शासनाने चालू हंगामातील शेतमालाची किमान आधारभूत किंमत जाहीर केल्यानंतर या किंमतीने माल विकण्याकरतिा मोठ्या प्रमाणात जाहीरातबाजी करून मालाची आॅन लाईन नोंदणी करण्याचे आवाह केले होते. त्यानुसार शेतकरी नोंदणीसाठी गर्दी करीत आहे.दारव्हा तालुक्यात दारव्हा व बोरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सेंटरवर यापूर्वी ही खरेदी केली जात होती मात्र यावर्षी हे दोनही सेंटर सुरु झाले नाही.यासंदर्भात राज्य कापुस उत्पादक पणन महासंघाच्या यवतमाळ येथील कार्यालयात विचारणा केली असता दारव्हा सेंटर सीसीआयकडे असल्याचे सांगून त्यांनी हात झटकले आणि सीसीआयचे अधिकारी त्यांच्याकडे पुरेसा स्टाफ नाही असे सांगतात. त्यांनी पूर्वीच अधिकारी, कर्मचारी इतर राज्यातील सेंटरवर पाठविल्याचे समजते. त्यामुळे दारव्हा तालुक्यातील कापुस केंद्र की राज्य सरकारच्या एजंसीने खरेदी करावा असा पेच निर्माण झाला आहे. इकडे शासकीय खरेदी केंद्र उघडण्यास मोठव विलंब होत असल्यामुळे शेतकºयांसमोर अडचण निर्माण झाली आहे. नाईलाजास्तर शेतकरी खाजगी व्यापाºयाकडे कापुस विक्रीला आणत आहे. व्यापारी अशावेळी मनमानी भावाने शेतकºयांकडून कापसाची खरेदी करतात.काही दिवसांपासून कापसाची आवक वाढल्याने खुल्या बाजारात तेजी असून व्यापारी वर्गाची चांगली मौज आहे. शेतकºयांचे मात्र नुकसान होत आहे. यामुळे तात्काळ शासकीय कापुस खरेदी केंद्र सुरु करण्यात यावे अशी मागणी आहे.कापसाची आॅनलाईन नोंदणी नाहीशासनातर्फे एकीकडे शेतमाल विक्रीकरिता आॅनलाईन नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले. मात्र बाजार समितीने अद्याप नोंदणी सुरु केली नाही. बाजार समिती प्रशासनाने सीसीआयच्या अधिकाºयांकडे नोंदणी संदर्भात विचारणा केली असता त्यांना नोंदणी करून घ्या मात्र शेतकºयांना कापूस विकायला आर्णीच्या केंद्रावर पाठवा असे सांगण्यात आले.त्यामुळे ही नोंदणी सुरु झाली नाही.